शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

हे तर चर्चेपासून पळ काढणारे  पळपुटे सरकार - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 05:50 IST

अधिवेशनात जाब विचारणार असल्याचे केले स्पष्ट 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्यातील तीन पायांच्या सरकारला कुठलीच चर्चा नको आहे. चर्चेपासून पळ काढणारे हे इतिहासातील सर्वात छोटे अधिवेशन असल्याचा आरोप करतानाच या अधिवेशनात कोरोना काळातील भ्रष्टाचार, वीज बिलांची वसुली, महिला अत्याचार आणि शेतकऱ्यांच्या   प्रश्नावर सभागृहात आवाज उठविणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर विशेषतः शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. बदल्या हेच या सरकारचे एकमेव काम आहे. आयएएस आणि आयपीएस बदल्यांमध्येसुद्धा भ्रष्टाचार सुरू आहे. असा दुर्दैवी प्रकार राज्यात यापूर्वी नव्हता. शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. ना कर्जमाफी मिळाली, ना प्रोत्साहन रक्कम. बोंडअळीमुळे कापूस गेला, ९० टक्के सोयाबीन गेले, पण शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. कोरोना काळात न वापरलेल्या विजेची अव्वाच्या सव्वा बिले आली. दोन वेळा या सरकारने वीज दरवाढ केली. आतापर्यंत साडेतीन लाख वीज कनेक्शन या सरकारने कापली. ७५ लाख लोकांना नोटिसा पाठविल्या. वीजबिलांच्या वसुलीचा हा प्रकार म्हणजे मोगलाई आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी राज्य सरकारला फटकारले.

महिला अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सत्तापक्षाचे नेते आणि मंत्रीच या अत्याचारात आघाडीवर आहेत. सामान्यांसाठी आणि सत्तापक्षासाठी वेगवेगळे न्याय आहेत. स्वतःच्या नेत्यांना लैंगिक स्वैराचाराची मुभाच दिली गेली आहे. शक्ती कायदा एक फार्स आहे. त्यामुळे या कायद्यासाठीच्या संयुक्त समितीतून भाजप आमदार बाहेर पडणार असल्याचा इशाराही फडणवीसांनी दिला.

‘सत्तेसाठी इतकी लाचारी नको’काँग्रेसने कायमच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. त्यांच्या नादी लागून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सावरकरांचा अपमान करत आहेत. त्यांच्या पुण्यतिथीला ना अभिवादन केले, ना एक ट्विट. सत्ता येते, जाते. पण इतिहास सत्तेसाठी किती लाचारी स्वीकारतो त्याची नोंद करतो.  शिवसेनेने सत्तेसाठी इतकी लाचारी पत्करू नये, असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस