शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

हे तर चर्चेपासून पळ काढणारे  पळपुटे सरकार - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 05:50 IST

अधिवेशनात जाब विचारणार असल्याचे केले स्पष्ट 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्यातील तीन पायांच्या सरकारला कुठलीच चर्चा नको आहे. चर्चेपासून पळ काढणारे हे इतिहासातील सर्वात छोटे अधिवेशन असल्याचा आरोप करतानाच या अधिवेशनात कोरोना काळातील भ्रष्टाचार, वीज बिलांची वसुली, महिला अत्याचार आणि शेतकऱ्यांच्या   प्रश्नावर सभागृहात आवाज उठविणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर विशेषतः शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. बदल्या हेच या सरकारचे एकमेव काम आहे. आयएएस आणि आयपीएस बदल्यांमध्येसुद्धा भ्रष्टाचार सुरू आहे. असा दुर्दैवी प्रकार राज्यात यापूर्वी नव्हता. शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. ना कर्जमाफी मिळाली, ना प्रोत्साहन रक्कम. बोंडअळीमुळे कापूस गेला, ९० टक्के सोयाबीन गेले, पण शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. कोरोना काळात न वापरलेल्या विजेची अव्वाच्या सव्वा बिले आली. दोन वेळा या सरकारने वीज दरवाढ केली. आतापर्यंत साडेतीन लाख वीज कनेक्शन या सरकारने कापली. ७५ लाख लोकांना नोटिसा पाठविल्या. वीजबिलांच्या वसुलीचा हा प्रकार म्हणजे मोगलाई आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी राज्य सरकारला फटकारले.

महिला अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सत्तापक्षाचे नेते आणि मंत्रीच या अत्याचारात आघाडीवर आहेत. सामान्यांसाठी आणि सत्तापक्षासाठी वेगवेगळे न्याय आहेत. स्वतःच्या नेत्यांना लैंगिक स्वैराचाराची मुभाच दिली गेली आहे. शक्ती कायदा एक फार्स आहे. त्यामुळे या कायद्यासाठीच्या संयुक्त समितीतून भाजप आमदार बाहेर पडणार असल्याचा इशाराही फडणवीसांनी दिला.

‘सत्तेसाठी इतकी लाचारी नको’काँग्रेसने कायमच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. त्यांच्या नादी लागून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सावरकरांचा अपमान करत आहेत. त्यांच्या पुण्यतिथीला ना अभिवादन केले, ना एक ट्विट. सत्ता येते, जाते. पण इतिहास सत्तेसाठी किती लाचारी स्वीकारतो त्याची नोंद करतो.  शिवसेनेने सत्तेसाठी इतकी लाचारी पत्करू नये, असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस