शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

हे तर चर्चेपासून पळ काढणारे  पळपुटे सरकार - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 05:50 IST

अधिवेशनात जाब विचारणार असल्याचे केले स्पष्ट 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्यातील तीन पायांच्या सरकारला कुठलीच चर्चा नको आहे. चर्चेपासून पळ काढणारे हे इतिहासातील सर्वात छोटे अधिवेशन असल्याचा आरोप करतानाच या अधिवेशनात कोरोना काळातील भ्रष्टाचार, वीज बिलांची वसुली, महिला अत्याचार आणि शेतकऱ्यांच्या   प्रश्नावर सभागृहात आवाज उठविणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर विशेषतः शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. बदल्या हेच या सरकारचे एकमेव काम आहे. आयएएस आणि आयपीएस बदल्यांमध्येसुद्धा भ्रष्टाचार सुरू आहे. असा दुर्दैवी प्रकार राज्यात यापूर्वी नव्हता. शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. ना कर्जमाफी मिळाली, ना प्रोत्साहन रक्कम. बोंडअळीमुळे कापूस गेला, ९० टक्के सोयाबीन गेले, पण शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. कोरोना काळात न वापरलेल्या विजेची अव्वाच्या सव्वा बिले आली. दोन वेळा या सरकारने वीज दरवाढ केली. आतापर्यंत साडेतीन लाख वीज कनेक्शन या सरकारने कापली. ७५ लाख लोकांना नोटिसा पाठविल्या. वीजबिलांच्या वसुलीचा हा प्रकार म्हणजे मोगलाई आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी राज्य सरकारला फटकारले.

महिला अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सत्तापक्षाचे नेते आणि मंत्रीच या अत्याचारात आघाडीवर आहेत. सामान्यांसाठी आणि सत्तापक्षासाठी वेगवेगळे न्याय आहेत. स्वतःच्या नेत्यांना लैंगिक स्वैराचाराची मुभाच दिली गेली आहे. शक्ती कायदा एक फार्स आहे. त्यामुळे या कायद्यासाठीच्या संयुक्त समितीतून भाजप आमदार बाहेर पडणार असल्याचा इशाराही फडणवीसांनी दिला.

‘सत्तेसाठी इतकी लाचारी नको’काँग्रेसने कायमच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. त्यांच्या नादी लागून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सावरकरांचा अपमान करत आहेत. त्यांच्या पुण्यतिथीला ना अभिवादन केले, ना एक ट्विट. सत्ता येते, जाते. पण इतिहास सत्तेसाठी किती लाचारी स्वीकारतो त्याची नोंद करतो.  शिवसेनेने सत्तेसाठी इतकी लाचारी पत्करू नये, असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस