शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

Cabinet Expansion: “मोदी कॅबिनेटमधील फेरबदलामुळे जनतेच्या जीवनात काही फरक पडणार का”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 14:49 IST

Cabinet Expansion: सामान्य जनतेच्या आयुष्यात बदल घडणार आहे का, फेरबदलाची नौटंकी करण्यापेक्षा जनतेचे जीवन सुधारण्यावर भर हवा, अशी टीका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलावर टीकामोदी कॅबिनेटमधील फेरबदलामुळे जनतेच्या जीवनात काही फरक पडणार कानिवृत्त न्या. मार्कंडेय काटजू यांचा मंत्रिमंडळ विस्तारावर निशाणा

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात ४३ नव्या मंत्र्यांच्या समावेशासह अनेक मोठे फेरबदल करण्यात आले. यानंतर आता विरोधकांसह अनेक स्तरातून यासंदर्भात टीका करण्यात येत आहे. मोदी सरकारमधील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले. मात्र, त्याने सामान्य जनतेच्या आयुष्यात बदल घडणार आहे का, फेरबदलाची नौटंकी करण्यापेक्षा जनतेचे जीवन सुधारण्यावर भर हवा, अशी टीका करण्यात आली आहे. (rtd justice markandey katju says modi cabinet expansion is drama)

निवृत्त न्या. मार्कंडेय काटजू यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर निशाणा साधला आहे. एका वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या लेखात काटजू यांनी केंद्रीय कॅबिनेटमधील ताजा फेरबदलाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. अनेकांनी याचे कौतुक केले आहे. मात्र, वास्तविकता काय आहे, यामुळे सामान्य जनतेचे जीवन सुधारणार आहे का, लोकांना चांगले आयुष्य मिळणार का, अशी विचारणा काटजू यांनी केली आहे. 

चेहरे बदल्यामुळे परिस्थिती बदलणार का?

मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, यामुळे देशभरात व्यापक प्रमाणात असलेली गरिबी, बेरोजगारी, महागाई, कुपोषण, आरोग्य सेवा आणि चांगल्या शिक्षणाचा अभाव, शेतकऱ्यांवरील संकट, भ्रष्टाचार, दलित आणि अल्पसंख्यांकावरील अत्याचार यांसारख्या समस्या दूर होणार आहेत का, याचे उत्तर नकारार्थीच आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार हे केवळ एक नाटक आहे. 

जनक्रांती आणि जनसंघर्षाची गरज

भारतातील आर्थिक आणि सामाजिक सुधारणा घडवण्यासाठी आधुनिक विचारांच्या नेत्यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक जनसंघर्ष आणि जनक्रांती करण्याची गरज आहे. यासाठी मोठा कालावधी जावा लागेल. अनेक त्याग करावे लागतील. मात्र, प्रत्येक प्रामाणिक देशभक्ताने यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे काटजू यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर, १२ मंत्र्यांचे राजीनामेही घेण्यात आले आहेत. मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रीमंडळ विस्तारात ४३ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकारने काही नेत्यांना पदोन्नती तर काही मंत्र्यांना डच्चू दिला. डच्चू दिलेल्या मंत्र्यांमध्ये अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे. मोदी सरकारने कामगिरीच्या आधारावर नवीन मंत्रीमंडळ गठीत केल्याची चर्चा आहे.  

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण