शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Cabinet Expansion: “मोदी कॅबिनेटमधील फेरबदलामुळे जनतेच्या जीवनात काही फरक पडणार का”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 14:49 IST

Cabinet Expansion: सामान्य जनतेच्या आयुष्यात बदल घडणार आहे का, फेरबदलाची नौटंकी करण्यापेक्षा जनतेचे जीवन सुधारण्यावर भर हवा, अशी टीका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलावर टीकामोदी कॅबिनेटमधील फेरबदलामुळे जनतेच्या जीवनात काही फरक पडणार कानिवृत्त न्या. मार्कंडेय काटजू यांचा मंत्रिमंडळ विस्तारावर निशाणा

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात ४३ नव्या मंत्र्यांच्या समावेशासह अनेक मोठे फेरबदल करण्यात आले. यानंतर आता विरोधकांसह अनेक स्तरातून यासंदर्भात टीका करण्यात येत आहे. मोदी सरकारमधील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले. मात्र, त्याने सामान्य जनतेच्या आयुष्यात बदल घडणार आहे का, फेरबदलाची नौटंकी करण्यापेक्षा जनतेचे जीवन सुधारण्यावर भर हवा, अशी टीका करण्यात आली आहे. (rtd justice markandey katju says modi cabinet expansion is drama)

निवृत्त न्या. मार्कंडेय काटजू यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर निशाणा साधला आहे. एका वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या लेखात काटजू यांनी केंद्रीय कॅबिनेटमधील ताजा फेरबदलाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. अनेकांनी याचे कौतुक केले आहे. मात्र, वास्तविकता काय आहे, यामुळे सामान्य जनतेचे जीवन सुधारणार आहे का, लोकांना चांगले आयुष्य मिळणार का, अशी विचारणा काटजू यांनी केली आहे. 

चेहरे बदल्यामुळे परिस्थिती बदलणार का?

मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, यामुळे देशभरात व्यापक प्रमाणात असलेली गरिबी, बेरोजगारी, महागाई, कुपोषण, आरोग्य सेवा आणि चांगल्या शिक्षणाचा अभाव, शेतकऱ्यांवरील संकट, भ्रष्टाचार, दलित आणि अल्पसंख्यांकावरील अत्याचार यांसारख्या समस्या दूर होणार आहेत का, याचे उत्तर नकारार्थीच आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार हे केवळ एक नाटक आहे. 

जनक्रांती आणि जनसंघर्षाची गरज

भारतातील आर्थिक आणि सामाजिक सुधारणा घडवण्यासाठी आधुनिक विचारांच्या नेत्यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक जनसंघर्ष आणि जनक्रांती करण्याची गरज आहे. यासाठी मोठा कालावधी जावा लागेल. अनेक त्याग करावे लागतील. मात्र, प्रत्येक प्रामाणिक देशभक्ताने यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे काटजू यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर, १२ मंत्र्यांचे राजीनामेही घेण्यात आले आहेत. मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रीमंडळ विस्तारात ४३ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकारने काही नेत्यांना पदोन्नती तर काही मंत्र्यांना डच्चू दिला. डच्चू दिलेल्या मंत्र्यांमध्ये अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे. मोदी सरकारने कामगिरीच्या आधारावर नवीन मंत्रीमंडळ गठीत केल्याची चर्चा आहे.  

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण