शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Cabinet Expansion: “मोदी कॅबिनेटमधील फेरबदलामुळे जनतेच्या जीवनात काही फरक पडणार का”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 14:49 IST

Cabinet Expansion: सामान्य जनतेच्या आयुष्यात बदल घडणार आहे का, फेरबदलाची नौटंकी करण्यापेक्षा जनतेचे जीवन सुधारण्यावर भर हवा, अशी टीका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलावर टीकामोदी कॅबिनेटमधील फेरबदलामुळे जनतेच्या जीवनात काही फरक पडणार कानिवृत्त न्या. मार्कंडेय काटजू यांचा मंत्रिमंडळ विस्तारावर निशाणा

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात ४३ नव्या मंत्र्यांच्या समावेशासह अनेक मोठे फेरबदल करण्यात आले. यानंतर आता विरोधकांसह अनेक स्तरातून यासंदर्भात टीका करण्यात येत आहे. मोदी सरकारमधील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले. मात्र, त्याने सामान्य जनतेच्या आयुष्यात बदल घडणार आहे का, फेरबदलाची नौटंकी करण्यापेक्षा जनतेचे जीवन सुधारण्यावर भर हवा, अशी टीका करण्यात आली आहे. (rtd justice markandey katju says modi cabinet expansion is drama)

निवृत्त न्या. मार्कंडेय काटजू यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर निशाणा साधला आहे. एका वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या लेखात काटजू यांनी केंद्रीय कॅबिनेटमधील ताजा फेरबदलाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. अनेकांनी याचे कौतुक केले आहे. मात्र, वास्तविकता काय आहे, यामुळे सामान्य जनतेचे जीवन सुधारणार आहे का, लोकांना चांगले आयुष्य मिळणार का, अशी विचारणा काटजू यांनी केली आहे. 

चेहरे बदल्यामुळे परिस्थिती बदलणार का?

मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, यामुळे देशभरात व्यापक प्रमाणात असलेली गरिबी, बेरोजगारी, महागाई, कुपोषण, आरोग्य सेवा आणि चांगल्या शिक्षणाचा अभाव, शेतकऱ्यांवरील संकट, भ्रष्टाचार, दलित आणि अल्पसंख्यांकावरील अत्याचार यांसारख्या समस्या दूर होणार आहेत का, याचे उत्तर नकारार्थीच आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार हे केवळ एक नाटक आहे. 

जनक्रांती आणि जनसंघर्षाची गरज

भारतातील आर्थिक आणि सामाजिक सुधारणा घडवण्यासाठी आधुनिक विचारांच्या नेत्यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक जनसंघर्ष आणि जनक्रांती करण्याची गरज आहे. यासाठी मोठा कालावधी जावा लागेल. अनेक त्याग करावे लागतील. मात्र, प्रत्येक प्रामाणिक देशभक्ताने यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे काटजू यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर, १२ मंत्र्यांचे राजीनामेही घेण्यात आले आहेत. मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रीमंडळ विस्तारात ४३ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकारने काही नेत्यांना पदोन्नती तर काही मंत्र्यांना डच्चू दिला. डच्चू दिलेल्या मंत्र्यांमध्ये अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे. मोदी सरकारने कामगिरीच्या आधारावर नवीन मंत्रीमंडळ गठीत केल्याची चर्चा आहे.  

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण