शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

''जमिनी घेऊन भलतेच उद्योगपती होणार म्हणून प्रकल्पांना विरोध''

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 00:00 IST

शेतकऱ्यांना मात्र वा-यावर सोडणार म्हणूनच प्रकल्पांना विरोध केला, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगाव येथे बुधवारी केले.

माणगाव : प्रकल्पांसाठी माझ्या कोकणवासीयांच्या जमिनी घेऊन काही जण कारखानदार होणार आणि शेतकऱ्यांना मात्र वा-यावर सोडणार म्हणूनच प्रकल्पांना विरोध केला, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगाव येथे बुधवारी केले. रायगड लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. ठाकरे यांनी प्रचारसभेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर जोरदार टीका केली.ठाकरे यांनी सुनील तटकरे यांना त्यांच्याकडील संपत्तीवरून लक्ष्य केले. गीतेसाहेब तुमच्यात आणि तटकरे यांमध्ये खूप फरक आहे. त्यांनी किती प्रॉपर्टी जमवलेली आहे. गीतेसाहेब तुम्हाला ते इतके वेळेस खासदार करूनही जमले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे ठरलेले आहेत; पण काँग्रेसमध्ये त्यांचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.उद्धव ठाकरे म्हणाले, अंतुले यांनी कुलाबा जिल्ह्याचे रायगड असे नाव केले, असे आमचे जुने नाते आहे. पाकिस्तान आमचा दुश्मन आहे तसा तुमचा दुश्मन आहे. जर उद्या युद्ध झाले पाकिस्तानने टाकलेला बॉम्ब घर पाहून पडणार नाही, धर्म बघून पडणार नाही. म्हणून सर्व मुसलमान बांधवांना माझे आवाहन आहे की, देशासाठी एकत्र या. आमचे भाजपसोबत मतभेद होते ते वैयक्तिक नसून ते जनतेसाठी होते आणि आताही युतीसुद्धा जनतेसाठीच केलेली आहे. युतीही देव, देश आणि धर्मासाठी केल्याचे त्यांनी सांगितले.उद्योगमंत्री सुभाष देसाई या वेळी बोलताना म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्प कोकणच्या पर्यावरणाला हानिकारक होता म्हणून हद्दपार केला. १०० हून अधिक कंपन्या तटकरे यांच्या आहेत. ८०० एकर जमीन आपल्या नावाने आहे. धीरूभाई अंबानी यांच्या ३२ आणि तुमच्या १०० ही प्रगती नैसर्गिक आहे का? असा सवाल त्यांनी केला.

युतीचे उमेदवार अनंत गीते म्हणाले, जनतेने मला सहा वेळा खासदार बनवले. त्या जनता जनार्दनाला मी देव मानतो. मी सुरेश प्रभू यांना धन्यवाद देतो, त्यांनी कोकण रेल्वे ही एकपदरी रेल्वे दोनपदरी करण्याच्या कामात मोलाची मदत केली. नितीन गडकरी यांना विनंती केली, त्यांनी मुंबई ते गोवा महामार्ग चौपदरीकरण करण्यासाठी मोलाची मदत केली. माझा संपूर्ण मतदारसंघाचा दौरा झाला आहे. माझे मतदार माझ्यासोबत आहेत, मी उद्धवसाहेबांना वचन देतो की इथून जास्तीत जास्त मतांनी मी निवडून येईन, असे त्यांनी नमूद केले.
रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेला नेता म्हणजे अनंत गीते आहेत. ही निवडणूक देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली की, शेतकºयाची कर्जमाफी आणि कर्जमुक्ती झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना बोनस देण्याचे काम हे फक्त युती सरकारने केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ. भरत गोगावले, आ. प्रकाश सुर्वे, आ. प्रवीण दरेकर, तुकाराम काते, नावीद अंतुले, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड