शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
6
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
7
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
8
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
9
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
10
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
11
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
12
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
13
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
14
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
15
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
16
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
17
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
18
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
19
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
20
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता

"कॅप्टन हटवा,अन्यथा गेम ओव्हर," पंजाबमधील काँग्रेसच्या बड्या नेत्याचा पक्ष नेतृत्वाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 11:07 IST

राजस्थानमधील वाद मिटून काही दिवस उलटत नाहीत तोच आता अजून एका राज्यात काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राजस्थाननंतर आता कांग्रेसमधील अंतर्गत वादाची लाट पंजाबमध्ये पोहोचली आहे.

ठळक मुद्देपंजाबमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रताप सिंग बाजवा यांनी कॅप्ट्न अमरिंदर सिंग यांच्याविरोधात उघडली आघाडीमुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना पदावरून हटवण्यात यावे राज्यातील काँग्रेसचे ९० टक्क्यांहून अधिक आमदार हे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्याविरोधात, बाजवा यांचा दावा

चंदिगड - गेला महिनाभर चाललेल्या आरोप प्रत्यारोपांनंतर राजस्थान काँग्रेसमध्ये सुरू असलेला वाद प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्या यशस्वी हस्तक्षेपानंतर नुकताच मिटला आहे. मात्र राजस्थानमधील वाद मिटून काही दिवस उलटत नाहीत तोच आता अजून एका राज्यात काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राजस्थाननंतर आता कांग्रेसमधील अंतर्गत वादाची लाट पंजाबमध्ये पोहोचली आहे.पंजाबमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रताप सिंग बाजवा यांनी कॅप्ट्न अमरिंदर सिंग यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी पक्षनेतृ्वाकडे केली आहे. राज्यातील काँग्रेसचे ९० टक्क्यांहून अधिक आमदार हे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्याविरोधात आहेत. त्यामुळे पक्षनेतृत्वाने त्यांना पदावरून तत्काळ हटवावे, अन्यथा पंजाबमध्ये काँग्रेसचा गेम ओव्हर होईल, असा इशारा प्रताप सिंह बाजवा यांनी दिला आहे.बाजवा म्हणाले की, राज्यातील आमदार पक्षाच्या बाजूने पत्रके प्रसिद्ध करत आहेत. मात्र खरेतर ते सरकार आमि पक्षसंघटनेवर नाराज आहेत. कॅप्टन आणि जाखड यांचे नेतृत्व पंजाबमध्ये कायम राहावे, असे या आमदारांना वाटत नाही. त्यामुळे पक्षनेतृत्वाने याबाबत पक्षनेतृत्वाने लवकरच निर्णय घेतला पाहिजे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आमदारांना गटागटाने न बोलावता एकेकाला दिल्लीत बोलावून त्यांची व्यथा ऐकली पाहिजे.मात्र यादरम्यान, मुख्यमंत्री, प्रदेश प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांना बोलावू नये. आमदारांशी चर्चा करून जेव्हा पक्षश्रेष्ठी कॅप्टन आणि जाखड यांच्यावर नाराज असलेल्या काँग्रेस आमदारांची मोजणी करतील तेव्हा नाराज आमदारांची संख्या ही ९० टक्क्यांऐवजी ९५ टक्के एवढी भरेल. असा दावाही बाजवा यांनी केला. तसेच पक्षनेतृत्वाने सर्वांची बाजू ऐकून घेऊन लवकरच स्थिती स्पष्ट करावी. परिस्थितीचे गांभीर्य पाहून कुण्या एका व्यक्तीच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले पाहिजे. मात्र कॅप्टन यांच्याकडे नेतृत्व सोपवले गेल्यास २०२२ पर्यंत राज्यात काँग्रेसचा गेमओव्हर होईल. तसेच मी काही कॅप्टनच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार नाही.काही दिवसांपूर्वी झालेल्या विषारी दारूकांडानंतर बाजवा आणि राज्यसभा खासदार समशेर सिंग दुलो यांनी सीबीआय तपासासाठी राज्यपालांकडे पत्रक दिले होते. तेव्हापासूनच पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत लढाई शिगेला पोहोचली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसPunjabपंजाबPoliticsराजकारण