शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

"कॅप्टन हटवा,अन्यथा गेम ओव्हर," पंजाबमधील काँग्रेसच्या बड्या नेत्याचा पक्ष नेतृत्वाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 11:07 IST

राजस्थानमधील वाद मिटून काही दिवस उलटत नाहीत तोच आता अजून एका राज्यात काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राजस्थाननंतर आता कांग्रेसमधील अंतर्गत वादाची लाट पंजाबमध्ये पोहोचली आहे.

ठळक मुद्देपंजाबमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रताप सिंग बाजवा यांनी कॅप्ट्न अमरिंदर सिंग यांच्याविरोधात उघडली आघाडीमुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना पदावरून हटवण्यात यावे राज्यातील काँग्रेसचे ९० टक्क्यांहून अधिक आमदार हे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्याविरोधात, बाजवा यांचा दावा

चंदिगड - गेला महिनाभर चाललेल्या आरोप प्रत्यारोपांनंतर राजस्थान काँग्रेसमध्ये सुरू असलेला वाद प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्या यशस्वी हस्तक्षेपानंतर नुकताच मिटला आहे. मात्र राजस्थानमधील वाद मिटून काही दिवस उलटत नाहीत तोच आता अजून एका राज्यात काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राजस्थाननंतर आता कांग्रेसमधील अंतर्गत वादाची लाट पंजाबमध्ये पोहोचली आहे.पंजाबमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रताप सिंग बाजवा यांनी कॅप्ट्न अमरिंदर सिंग यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी पक्षनेतृ्वाकडे केली आहे. राज्यातील काँग्रेसचे ९० टक्क्यांहून अधिक आमदार हे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्याविरोधात आहेत. त्यामुळे पक्षनेतृत्वाने त्यांना पदावरून तत्काळ हटवावे, अन्यथा पंजाबमध्ये काँग्रेसचा गेम ओव्हर होईल, असा इशारा प्रताप सिंह बाजवा यांनी दिला आहे.बाजवा म्हणाले की, राज्यातील आमदार पक्षाच्या बाजूने पत्रके प्रसिद्ध करत आहेत. मात्र खरेतर ते सरकार आमि पक्षसंघटनेवर नाराज आहेत. कॅप्टन आणि जाखड यांचे नेतृत्व पंजाबमध्ये कायम राहावे, असे या आमदारांना वाटत नाही. त्यामुळे पक्षनेतृत्वाने याबाबत पक्षनेतृत्वाने लवकरच निर्णय घेतला पाहिजे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आमदारांना गटागटाने न बोलावता एकेकाला दिल्लीत बोलावून त्यांची व्यथा ऐकली पाहिजे.मात्र यादरम्यान, मुख्यमंत्री, प्रदेश प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांना बोलावू नये. आमदारांशी चर्चा करून जेव्हा पक्षश्रेष्ठी कॅप्टन आणि जाखड यांच्यावर नाराज असलेल्या काँग्रेस आमदारांची मोजणी करतील तेव्हा नाराज आमदारांची संख्या ही ९० टक्क्यांऐवजी ९५ टक्के एवढी भरेल. असा दावाही बाजवा यांनी केला. तसेच पक्षनेतृत्वाने सर्वांची बाजू ऐकून घेऊन लवकरच स्थिती स्पष्ट करावी. परिस्थितीचे गांभीर्य पाहून कुण्या एका व्यक्तीच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले पाहिजे. मात्र कॅप्टन यांच्याकडे नेतृत्व सोपवले गेल्यास २०२२ पर्यंत राज्यात काँग्रेसचा गेमओव्हर होईल. तसेच मी काही कॅप्टनच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार नाही.काही दिवसांपूर्वी झालेल्या विषारी दारूकांडानंतर बाजवा आणि राज्यसभा खासदार समशेर सिंग दुलो यांनी सीबीआय तपासासाठी राज्यपालांकडे पत्रक दिले होते. तेव्हापासूनच पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत लढाई शिगेला पोहोचली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसPunjabपंजाबPoliticsराजकारण