शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

“सुशांत सिंग प्रकरणात मुंबई पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या मंत्र्याची माहिती सीबीआयला देण्यास तयार”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 09:06 IST

मुंबई पोलिसांच्या चौकशीत हस्तक्षेप करुन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु होता. या नेत्यांची भूमिका आणि सर्व गोष्टींचा खुलासा सीबीआयद्वारे तपासात केला जावा अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पत्रात केली आहे.

ठळक मुद्देमुंबई पोलिसांनी राजकीय दबावामुळे २ महिन्यानंतरही एफआयआर दाखल केला नाहीसत्ताधारी पक्षातील मोठा नेता एका मंत्र्यांचा पोलिसांना फोन करुन दबाव टाकण्याचा प्रयत्नही सर्व माहिती आम्ही सीबीआयला देण्यास तयार आहोत - भाजपा आमदार

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा सध्या सीबीआयकडून तपास सुरु आहे. या तपासादरम्यान सुशांत सिंग राजपूत ड्रग्स घेत असल्याचंही समोर आलं. त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड आणि ड्रग्सचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आता या प्रकरणात भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहून बॉलिवूड, ड्रग्स आणि पॉलिटिशन यांची सीबीआयकडून चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

या पत्रात अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे की, सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयपूर्वी मुंबई पोलीस दोन महिन्यांपासून करत होती. या काळात तपास भरकटवण्याचा प्रयत्न केल्याचं समोर येत आहे. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर राज्याच्या गृहमंत्र्यांनी ३ तासाच्या आत ही आत्महत्या आहे असं विधान केले. त्यानंतर वेगवेगळी विधाने आणि ट्विट पाहिलं तर यातून स्पष्ट दिसून येते की, या प्रकरणात काहीही गडबड नाही फक्त आत्महत्या आहे अशाप्रकारे भासवण्यात येत होतं. मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी कोणत्या दिशेने चौकशी घेऊन जावी याचे संकेत या ट्विट आणि वक्तव्यावरुन मिळत होते असा आरोप त्यांनी केला.

मुंबई पोलिसांनी राजकीय दबावामुळे आत्महत्येच्या २ महिन्यानंतरही एक एफआयआर दाखल केला नाही किंवा Inquest Enquiry च्या अंतर्गत मुंबई पोलीस तपासाचं नाटक करत राहिली. ही चौकशी करताना बॉलिवूडमधील प्रसिद्ध ५० पेक्षा अधिक लोकांना पोलिसांनी बोलावून चौकशी केली. जेव्हा बॉलिवूडच्या लोकांना बोलावलं जात होतं तेव्हा सत्ताधारी पक्षातील मोठा नेता एक मंत्री पोलिसांना फोन करुन या कलाकाराचा जबाब नोंदवू नका, त्याचे स्टेटमेंट घेऊ नका अशाप्रकारे पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता असं अतुल भातखळकर यांनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, ही सर्व माहिती आम्ही सीबीआयला देण्यास तयार आहोत. सुशांत सिंग राजपूत आत्महत्येमागील सत्य,  बॉलिवूड, पॉलिटिशन्स आणि ड्रग्स यांचा भांडाफोड होऊ नये यासाठी राज्यातील गृह विभाग आणि महाविकास आघाडी सरकारमधील मोठा नेता प्रयत्न करत होते. त्यासाठी मुंबई पोलिसांच्या चौकशीत हस्तक्षेप करुन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु होता. या नेत्यांची भूमिका आणि सर्व गोष्टींचा खुलासा सीबीआयद्वारे तपासात केला जावा अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पत्रात केली आहे.

सुशांत सिंग राजपूतचा संशयास्पद मृत्यू हा गेले दोन महिने संपूर्ण देशात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणात पाटण्यात नोंदविलेल्या गुन्ह्याचा तपास ‘सीबीआय’कडे सोपविण्याचा निर्णय बिहार सरकारने ४ ऑगस्ट रोजी घेतला होता. यानंतर पूर्वी कधीही पाहायला मिळाली नाहीत अशी अतिशय वेगाने चक्रे फिरली. तो दिवस उलटायच्या आत केंद्रीय गृह मंत्रालयाने बिहार सरकारची विनंती मान्य करून प्रकरणाची फाइल सीबीआयकडे देण्याचे ठरविले.

दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयास तसे कळविले होते. पण गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गुरुग्राममधील मेदान्त इस्पितळात पूर्ण ‘बेड रेस्ट’ घेत असताना व सीबीआय हा विषय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील नसूनही हे एवढे झटपट झाले तरी कसे? सीबीआय थेट पंतप्रधानांच्या अखत्यारीत येते व त्या दिवशी तर पंतप्रधान मोदी राममंदिराच्या भूमिपूजनाला अयोध्येस जाण्याच्या तयारीत होते. ‘भिंतीला कान’ लावले असता असे कळले होते की, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर बोलले व इस्पितळात असलेल्या शहा यांनी तेथूनच चक्रे फिरविली. अमित शहा सीबीआयचे संचालक आर. के. शुक्ला यांच्याशी बोलले व अवघ्या पाच तासांत हे प्रकरण सीबीआयच्या ताब्यात गेलं.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतCBIगुन्हा अन्वेषण विभागBJPभाजपा