शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

Cabinet Expansion: “डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे सिद्ध!”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 14:51 IST

Cabinet Expansion: केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हटले जात आहे.

ठळक मुद्देडॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे विरोधकांचे आरोप योग्यरविशंकर प्रसाद यांचा राजीनामा घेणे काहीसे धक्कादायककेंद्र सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरल्याची टीका

नवी दिल्ली: मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तारात ४३ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकारने काही नेत्यांना पदोन्नती तर काही मंत्र्यांना डच्चू दिला. डच्चू दिलेल्या मंत्र्यांमध्ये अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे. मोदी सरकारने कामगिरीच्या आधारावर नवीन मंत्रिमंडळ गठीत केल्याची चर्चा आहे. यामध्ये रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन आणि प्रकाश जावडेकर यांच्या राजीनाम्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, यावरून अद्यापही उलट-सुलट चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. यातच आता माजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हटले जात आहे. (ravish kumar react on modi cabinet expansion)

ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली असून, यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उहापोह केला आहे. रविशंकर प्रसाद यांचा राजीनामा घेणे काहीसे धक्कादायक होते. कारण ट्विटरसारख्या बड्या अमेरिकी कंपनीला ते थेटपणे भिडत होते. काही झाले, तरी कायदे पाळावे लागतील, असे निर्भिडपणे सांगत होते. मात्र, त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. रविशंकर प्रसाद यांना पदावर कायम ठेवले असते, तर अमेरिकेला एक स्पष्ट संदेश गेला असता की, मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री कुणालाही घाबरत नाही. 

डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा योग्यच निर्णय

डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा घेणे म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे स्पष्ट होत असल्याचे रवीश कुमार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी कोणतीही तयारी केली नव्हती. अन्यथा लाखोंच्या संख्येत नागरिक मृत्युमुखी पडले नसते. या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नाही. हे दुर्दैवी असून, हे केवळ भारतातच होऊ शकते. यामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मलीन झाली. तर, दुसरीकडे पंतप्रधान मोदी स्वतः निवडणूक कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते. लोकांना मरण्यासाठी सोडून दिले होते, अशी बोचरी टीका रवीश कुमार यांनी केली आहे. 

दरम्यान, केंद्र सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. शिक्षण क्षेत्राची परिस्थिती योग्य नाही. यावर पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था ढासळली आहे. मात्र, अर्थमंत्री बदलले गेले असते, तर तो चुकीचा संदेश गेला असता, यासाठी तसे केले नाही, असा दावा रवीश कुमार यांनी केला आहे.  

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारRavish Kumarरवीश कुमारCentral Governmentकेंद्र सरकारRavi Shankar Prasadरविशंकर प्रसाद