शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

Cabinet Expansion: “डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे सिद्ध!”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 14:51 IST

Cabinet Expansion: केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हटले जात आहे.

ठळक मुद्देडॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे विरोधकांचे आरोप योग्यरविशंकर प्रसाद यांचा राजीनामा घेणे काहीसे धक्कादायककेंद्र सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरल्याची टीका

नवी दिल्ली: मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तारात ४३ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकारने काही नेत्यांना पदोन्नती तर काही मंत्र्यांना डच्चू दिला. डच्चू दिलेल्या मंत्र्यांमध्ये अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे. मोदी सरकारने कामगिरीच्या आधारावर नवीन मंत्रिमंडळ गठीत केल्याची चर्चा आहे. यामध्ये रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन आणि प्रकाश जावडेकर यांच्या राजीनाम्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, यावरून अद्यापही उलट-सुलट चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. यातच आता माजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हटले जात आहे. (ravish kumar react on modi cabinet expansion)

ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली असून, यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उहापोह केला आहे. रविशंकर प्रसाद यांचा राजीनामा घेणे काहीसे धक्कादायक होते. कारण ट्विटरसारख्या बड्या अमेरिकी कंपनीला ते थेटपणे भिडत होते. काही झाले, तरी कायदे पाळावे लागतील, असे निर्भिडपणे सांगत होते. मात्र, त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. रविशंकर प्रसाद यांना पदावर कायम ठेवले असते, तर अमेरिकेला एक स्पष्ट संदेश गेला असता की, मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री कुणालाही घाबरत नाही. 

डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा योग्यच निर्णय

डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा घेणे म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे स्पष्ट होत असल्याचे रवीश कुमार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी कोणतीही तयारी केली नव्हती. अन्यथा लाखोंच्या संख्येत नागरिक मृत्युमुखी पडले नसते. या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नाही. हे दुर्दैवी असून, हे केवळ भारतातच होऊ शकते. यामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मलीन झाली. तर, दुसरीकडे पंतप्रधान मोदी स्वतः निवडणूक कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते. लोकांना मरण्यासाठी सोडून दिले होते, अशी बोचरी टीका रवीश कुमार यांनी केली आहे. 

दरम्यान, केंद्र सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. शिक्षण क्षेत्राची परिस्थिती योग्य नाही. यावर पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था ढासळली आहे. मात्र, अर्थमंत्री बदलले गेले असते, तर तो चुकीचा संदेश गेला असता, यासाठी तसे केले नाही, असा दावा रवीश कुमार यांनी केला आहे.  

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारRavish Kumarरवीश कुमारCentral Governmentकेंद्र सरकारRavi Shankar Prasadरविशंकर प्रसाद