शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Cabinet Expansion: “डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे सिद्ध!”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 14:51 IST

Cabinet Expansion: केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हटले जात आहे.

ठळक मुद्देडॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे विरोधकांचे आरोप योग्यरविशंकर प्रसाद यांचा राजीनामा घेणे काहीसे धक्कादायककेंद्र सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरल्याची टीका

नवी दिल्ली: मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तारात ४३ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकारने काही नेत्यांना पदोन्नती तर काही मंत्र्यांना डच्चू दिला. डच्चू दिलेल्या मंत्र्यांमध्ये अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे. मोदी सरकारने कामगिरीच्या आधारावर नवीन मंत्रिमंडळ गठीत केल्याची चर्चा आहे. यामध्ये रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन आणि प्रकाश जावडेकर यांच्या राजीनाम्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, यावरून अद्यापही उलट-सुलट चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. यातच आता माजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हटले जात आहे. (ravish kumar react on modi cabinet expansion)

ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली असून, यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उहापोह केला आहे. रविशंकर प्रसाद यांचा राजीनामा घेणे काहीसे धक्कादायक होते. कारण ट्विटरसारख्या बड्या अमेरिकी कंपनीला ते थेटपणे भिडत होते. काही झाले, तरी कायदे पाळावे लागतील, असे निर्भिडपणे सांगत होते. मात्र, त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. रविशंकर प्रसाद यांना पदावर कायम ठेवले असते, तर अमेरिकेला एक स्पष्ट संदेश गेला असता की, मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री कुणालाही घाबरत नाही. 

डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा योग्यच निर्णय

डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा घेणे म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे स्पष्ट होत असल्याचे रवीश कुमार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी कोणतीही तयारी केली नव्हती. अन्यथा लाखोंच्या संख्येत नागरिक मृत्युमुखी पडले नसते. या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नाही. हे दुर्दैवी असून, हे केवळ भारतातच होऊ शकते. यामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मलीन झाली. तर, दुसरीकडे पंतप्रधान मोदी स्वतः निवडणूक कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते. लोकांना मरण्यासाठी सोडून दिले होते, अशी बोचरी टीका रवीश कुमार यांनी केली आहे. 

दरम्यान, केंद्र सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. शिक्षण क्षेत्राची परिस्थिती योग्य नाही. यावर पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था ढासळली आहे. मात्र, अर्थमंत्री बदलले गेले असते, तर तो चुकीचा संदेश गेला असता, यासाठी तसे केले नाही, असा दावा रवीश कुमार यांनी केला आहे.  

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारRavish Kumarरवीश कुमारCentral Governmentकेंद्र सरकारRavi Shankar Prasadरविशंकर प्रसाद