शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र - नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 06:03 IST

आमदार फोडता येत नाही म्हणून आता अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे स्वतः करत आहेत

मुंबई : रश्मी शुक्ला या अनधिकृत फोन टॅप करत होत्या म्हणूनच त्यांना वेगळ्या प्रकारची शिक्षा देऊन बदलण्यात आले. महाविकास आघाडी सरकार बनत असताना सर्वात महत्त्वाचे जे नेते होते त्यांचे फोनसुद्धा टॅप करण्याचे उद्योग रश्मी शुक्ला यांनी केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

आमदार फोडता येत नाही म्हणून आता अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे स्वतः करत आहेत, असा आरोप करतानाच फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आल्याचे मलिक म्हणाले. राज्यपाल,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांची हालचाल, पोलीस रेकॉर्ड फडणवीस यांनी सादर केले. ते सादर करत असताना ही हालचाल होती की नाही हे मला माहिती नाही, असे सांगून फडणवीस जाणीवपूर्वक भ्रम निर्माण करत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे.

भाजपने या देशात कर्नाटकचे सरकार पाडले. उत्तराखंड, ईशान्य भारतात सरकार बदल केला. त्यांना महाराष्ट्रात आमदार फोडता येत नाही म्हणून त्यासाठी महाविकास आघाडी सरकारला बदनाम करून  हे सरकार बदलता येते का, हा प्रयत्न भाजप करत आहे. परंतु आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. जोपर्यंत सरकार फ्लोअरवर बहुमत सिद्ध करू शकत नाही तोवर कुठले सरकार सत्तेपासून दूर करता येत नाही. ते अधिकार राज्यपाल किंवा केंद्र सरकारला नाही, याची आठवण मलिक यांनी करून दिली.

सल्ल्याचे कागदही फडणवीस यांनी दाखवावेत सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी फडणवीस यांनी महाभियोक्ता यांचा सल्ला घेतला होता, असे सांगितले आहे. मग त्यांनी घेतलेल्या सल्ल्याचे कागदही फडणवीस यांनी दाखवले पाहिजेत. असे कुठलेही रेकॉर्ड सरकारमध्ये नाही, असा दावाही मलिक यांनी केला. पहिल्या दिवसापासून फडणवीस महाराष्ट्राची दिशाभूल करत होते. खोटे सांगून सरकारला बदनाम करण्याचे काम त्यांनी केले. परमबीरसिंग यांनी त्यांच्या चार अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत निर्णय घेऊन सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेतले, त्यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांचा आदेश नव्हता, असेही मलिक म्हणाले.

 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा