शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

Rajya Sabha: शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ; आपचे ३ खासदार निलंबित, मार्शलनं काढलं बाहेर

By प्रविण मरगळे | Updated: February 3, 2021 11:51 IST

आपच्या खासदारांना मार्शलच्या मदतीने सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले. या तिन्ही खासदारांना सभागृहाच्या कामकाजातून एक दिवसासाठी निलंबित करण्याचे आदेश सभापतींनी दिले.

ठळक मुद्दे३ कृषी विधेयकांना मागे घेण्यासाठी आणि शेतकरी मुद्द्यावरून राज्यसभेचे कामकाज ५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होतेगदारोळ घालणाऱ्या आपच्या संजय सिंह, सुशील गुप्ता आणि एनडी गुप्ता या ३ खासदारांना सदनाच्या बाहेर जाण्यास सांगितलेजेव्हा शेतकरी विषयावर चर्चा करण्याची वेळ आली आहे, तेव्हा ही घोषणाबाजी का केली जात आहे.?

नवी दिल्ली – दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद राज्यसभेत उमटले आहेत. बुधवारी राज्यसभेत शेतकरी मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं, सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर आम आदमी पार्टीच्या ३ खासदारांना निलंबित करण्यात आलं, आपचे खासदार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून वेलमध्ये पोहचले, आप खासदारांच्या घोषणाबाजी आणि गदारोळ पाहून अध्यक्षांनी त्यांना निलंबित केले.

त्यानंतर आपच्या खासदारांना मार्शलच्या मदतीने सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले. या तिन्ही खासदारांना सभागृहाच्या कामकाजातून एक दिवसासाठी निलंबित करण्याचे आदेश सभापतींनी दिले. तत्पूर्वी ३ कृषी विधेयकांना मागे घेण्यासाठी आणि शेतकरी मुद्द्यावरून राज्यसभेचे कामकाज ५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते, पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी आपच्या संजय सिंह, सुशील गुप्ता आणि एनडी गुप्ता या ३ खासदारांना सदनाच्या बाहेर जाण्यास सांगितले, परंतु खासदारांचा गोंधळ तसाच सुरू होता, अखेर या तिन्ही सदस्यांना एक दिवसासाठी निलंबित करत मार्शल बोलावून त्यांना सभागृहाच्या बाहेर काढले.

ही हुकूमशाही चालणार नाही, अध्यक्षांनी बजावलं

राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू म्हणाले की, जेव्हा शेतकरी विषयावर चर्चा करण्याची वेळ आली आहे, तेव्हा ही घोषणाबाजी का केली जात आहे.? ही हुकूमशाही चालणार नाही असं नायडू यांनी बजावलं, आम आदमी पक्षाच्या वतीने संजय सिंह, एनडी गुप्ता आणि सुशील गुप्ता राज्यसभेत खासदार आहेत.

शेतकर्‍यांच्या प्रश्नावर कामकाज तहकूब करण्याची नोटीस

तत्पूर्वी, कॉंग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर सभागृहाचं कामकाज तहकूब ठेवण्याची नोटीस सादर केली. बसपा, सीपीआय, टीएमसी, द्रमुक, सीपीआय-एम यांनीही तहकूब करण्याचा प्रस्ताव दिला.

 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाFarmerशेतकरीAAPआप