शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

नरेंद्र मोदींना 'मन की बात' कार्यक्रमापूर्वी राहुल गांधींचे आव्हान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 10:30 IST

Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्दे 'मन की बात' कार्यक्रमातून नरेंद्र मोदींनी रोजगार आणि शेतकऱ्यांबाबत भाष्य करावे, असे आव्हान राहुल गांधी यांनी केले आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 28 फेब्रुवारी रोजी देखील ते 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मन की बात' कार्यक्रमातून नरेंद्र मोदींनी रोजगार आणि शेतकऱ्यांबाबत भाष्य करावे, असे आव्हान राहुल गांधी यांनी केले आहे. (rahul gandhi challenged pm modi to talk on jobs and farmers before mann ki baat)

राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. " हिम्मत है तो करो - #KisanKiBaat #JobKiBaat", असे ट्विट करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे. दरम्यान, राहुल गांधी सतत विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेण्याचा प्रयत्न करत आहे. शनिवारी महागाईच्या मुद्द्यावरून काढण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर राहुल गांधींनी हल्लाबोल केला होता. 'अशी एखादी जागा आहे, जिथे आपल्याला दैनंदिन वस्तू मिळतात आणि तेथे जाऊन आपल्याला असे वाटू नये की सरकार आपल्याला लुटत आहे?' असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. 

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. यादरम्यान देशात पुन्हा वाढत असलेला कोरोना, कोरोना लसीकरण आणि नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन याबाबत नरेंद्र मोदी आज बोलण्याची शक्यता आहे. याआधीच्या 'मन की बात' कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनावेळी शेतकऱ्यांच्या रॅलीदरम्यान झालेले हिंसक आंदोलन आणि आंदोलनात जमावाकडून ज्या पद्धतीने तिरंग्याचा अपमान झाला, त्याचे दु:ख व्यक्त केले होते.

नरेंद्र मोदी म्हणाले होते की, "या सर्व घडामोडींमध्ये दिल्लीत 26 जानेवारी रोजी तिरंग्याचा अपमान पाहून देश अत्यंत दुखी झाला." याचबरोबर, देशातील कोरोना संकटावर भाष्य करताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की, "कोरोना विरोधात भारताची लढाई जगासमोर एक उदाहरण बनली आहे. अशा परिस्थितीत आपली लसीकरण मोहीमही जगभरात एक उदाहरण आहे. संकटकाळात भारत स्वतः आत्मनिर्भर असल्यामुळे इतर देशांचीही मदत करु शकला," असेही नरेंद्र मोदी म्हणाले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात