शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

नरेंद्र मोदींना 'मन की बात' कार्यक्रमापूर्वी राहुल गांधींचे आव्हान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 10:30 IST

Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्दे 'मन की बात' कार्यक्रमातून नरेंद्र मोदींनी रोजगार आणि शेतकऱ्यांबाबत भाष्य करावे, असे आव्हान राहुल गांधी यांनी केले आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 28 फेब्रुवारी रोजी देखील ते 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मन की बात' कार्यक्रमातून नरेंद्र मोदींनी रोजगार आणि शेतकऱ्यांबाबत भाष्य करावे, असे आव्हान राहुल गांधी यांनी केले आहे. (rahul gandhi challenged pm modi to talk on jobs and farmers before mann ki baat)

राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. " हिम्मत है तो करो - #KisanKiBaat #JobKiBaat", असे ट्विट करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे. दरम्यान, राहुल गांधी सतत विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेण्याचा प्रयत्न करत आहे. शनिवारी महागाईच्या मुद्द्यावरून काढण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर राहुल गांधींनी हल्लाबोल केला होता. 'अशी एखादी जागा आहे, जिथे आपल्याला दैनंदिन वस्तू मिळतात आणि तेथे जाऊन आपल्याला असे वाटू नये की सरकार आपल्याला लुटत आहे?' असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. 

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. यादरम्यान देशात पुन्हा वाढत असलेला कोरोना, कोरोना लसीकरण आणि नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन याबाबत नरेंद्र मोदी आज बोलण्याची शक्यता आहे. याआधीच्या 'मन की बात' कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनावेळी शेतकऱ्यांच्या रॅलीदरम्यान झालेले हिंसक आंदोलन आणि आंदोलनात जमावाकडून ज्या पद्धतीने तिरंग्याचा अपमान झाला, त्याचे दु:ख व्यक्त केले होते.

नरेंद्र मोदी म्हणाले होते की, "या सर्व घडामोडींमध्ये दिल्लीत 26 जानेवारी रोजी तिरंग्याचा अपमान पाहून देश अत्यंत दुखी झाला." याचबरोबर, देशातील कोरोना संकटावर भाष्य करताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की, "कोरोना विरोधात भारताची लढाई जगासमोर एक उदाहरण बनली आहे. अशा परिस्थितीत आपली लसीकरण मोहीमही जगभरात एक उदाहरण आहे. संकटकाळात भारत स्वतः आत्मनिर्भर असल्यामुळे इतर देशांचीही मदत करु शकला," असेही नरेंद्र मोदी म्हणाले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात