शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

नरेंद्र मोदींना 'मन की बात' कार्यक्रमापूर्वी राहुल गांधींचे आव्हान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 10:30 IST

Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्दे 'मन की बात' कार्यक्रमातून नरेंद्र मोदींनी रोजगार आणि शेतकऱ्यांबाबत भाष्य करावे, असे आव्हान राहुल गांधी यांनी केले आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 28 फेब्रुवारी रोजी देखील ते 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मन की बात' कार्यक्रमातून नरेंद्र मोदींनी रोजगार आणि शेतकऱ्यांबाबत भाष्य करावे, असे आव्हान राहुल गांधी यांनी केले आहे. (rahul gandhi challenged pm modi to talk on jobs and farmers before mann ki baat)

राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. " हिम्मत है तो करो - #KisanKiBaat #JobKiBaat", असे ट्विट करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे. दरम्यान, राहुल गांधी सतत विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेण्याचा प्रयत्न करत आहे. शनिवारी महागाईच्या मुद्द्यावरून काढण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर राहुल गांधींनी हल्लाबोल केला होता. 'अशी एखादी जागा आहे, जिथे आपल्याला दैनंदिन वस्तू मिळतात आणि तेथे जाऊन आपल्याला असे वाटू नये की सरकार आपल्याला लुटत आहे?' असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. 

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. यादरम्यान देशात पुन्हा वाढत असलेला कोरोना, कोरोना लसीकरण आणि नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन याबाबत नरेंद्र मोदी आज बोलण्याची शक्यता आहे. याआधीच्या 'मन की बात' कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनावेळी शेतकऱ्यांच्या रॅलीदरम्यान झालेले हिंसक आंदोलन आणि आंदोलनात जमावाकडून ज्या पद्धतीने तिरंग्याचा अपमान झाला, त्याचे दु:ख व्यक्त केले होते.

नरेंद्र मोदी म्हणाले होते की, "या सर्व घडामोडींमध्ये दिल्लीत 26 जानेवारी रोजी तिरंग्याचा अपमान पाहून देश अत्यंत दुखी झाला." याचबरोबर, देशातील कोरोना संकटावर भाष्य करताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की, "कोरोना विरोधात भारताची लढाई जगासमोर एक उदाहरण बनली आहे. अशा परिस्थितीत आपली लसीकरण मोहीमही जगभरात एक उदाहरण आहे. संकटकाळात भारत स्वतः आत्मनिर्भर असल्यामुळे इतर देशांचीही मदत करु शकला," असेही नरेंद्र मोदी म्हणाले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात