शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

Mamata Banerjee: १९६ सदस्यांच्या पाठिंब्यासह ममता बॅनर्जींनी घेतला मोठा निर्णय, सदस्यत्वाचा मार्गही मोकळा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 20:13 IST

Legislative Council in West Bengal: राज्यात विधान परिषदेची स्थापना करण्याचे आश्वासन तृणमूल काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यामधून दिले होते. दरम्यान, निवडणुकीनंतर ममता बॅनर्जींनी प्रस्तावाला मान्यता दिली होती.

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभेने मंगळवारी भारतीय राज्यघटनेतील कलम ३६९ अन्वये राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव पारित केला. सभागृहात उपस्थित असलेल्या एकूण २६५ सभासदांपैकी १९६ सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. ( Legislative Council in West Bengal) तर ६९ सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. (Mamata Banerjee) राज्यात विधान परिषदेची स्थापना करण्याचे आश्वासन तृणमूल काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यामधून दिले होते. दरम्यान, निवडणुकीनंतर ममता बॅनर्जींनी प्रस्तावाला मान्यता दिली होती. (Proposal for establishment of Legislative Council in West Bengal passed, 196 members supported)

राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विधानसभेच्या स्थापनेसाठी सभागृहात झालेल्या मतदानावेळी उपस्थित नव्हत्या. दरम्यान, देशामध्ये सहा राज्यांत विधान परिषदा अस्तित्वात आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सध्या विधान परिषदा आहेत. आता विधान परिषदेच्या स्थापनेसाठी विधानसभेने मंजुरी दिल्यानंतर आता त्यासाठी संसदेमध्येही विधेयक पारित करावे लागेल, अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये विधान परिषदेच्या स्थापनेमध्ये केंद्र सरकारची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

तत्पूर्वी ममता बॅनर्जी सभागृहात म्हणाल्या की, भाजपाचे आमदार हे शिष्टाचार आणि सभ्यता जाणत नाहीत. विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावेळी झालेल्या गोंधळामुळे हे सिद्ध झाले आहे. २ जुलै रोजी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी भाजपाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली होती. त्यामुळे राज्यपालांना अभिभाषणातील काही भाग वाचून भाषण आटोपते घ्यावे लागले होते. बंगालमध्ये निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचारावरून भाजपाचे आमदार घोषणाबाजी करत होते.

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सभागृहात आपल्या भाषणामध्ये म्हणाल्या की, राज्यामध्ये भाजपा आमदारांनी केंद्रातील भाजपा सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये अडथळा आणता कामा नये होता. मी राजनाथ सिंहांपासून ते सुषमा स्वराज यांच्यापर्यंत अनेक भाजपाच्या नेत्यांना पाहिले आहे. मात्र हा भाजपा वेगळा आहे. हे भाजपा सदस्य संस्कृती, शिष्टाचार, सभ्यपणा जाणत नाहीत. दरम्यान, पश्चिम बंगाल विधानभेचे अधिवेशन २ जुलै रोजी सुरू झाले होते. हे अधिवेशन आठ जुलैपर्यंत चालणार आहे. विधानसभेमध्ये २०२१-२२ साठी राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालPoliticsराजकारणVidhan Parishadविधान परिषद