शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

पालघरातील समस्या कायमच, ७० वर्षांत अनेक लोकसभा निवडणुका झाल्या तरीही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 01:59 IST

प्रत्येक राजकीय पक्ष, संघटना व त्यांचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते आपण केलेल्या विकासाचे पाढे वाचायला सुरुवात करून विकासकामांचे श्रेय लाटतात

- पंकज राऊतबोईसर : लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपरिषद व ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हटले की प्रत्येक राजकीय पक्ष, संघटना व त्यांचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते आपण केलेल्या विकासाचे पाढे वाचायला सुरुवात करून विकासकामांचे श्रेय लाटतात परंतु वास्तवात पालघर जिल्ह्यात आता पर्यंत कितीतरी निवडणुका झाल्यात परंतु गेली सत्तर वर्षे तेच प्रश्न आजही कायम असून तीच ती आश्वासन देणाऱ्यांना आता या समस्या कधी सुटणार? असा संतप्त सवाल मतदार व नागरिक उमेदवारांना विचारत असूनही पुन्हा जुनीच आश्वासन घेऊन उमेदवार प्रचाराकरीता येत आहेत.प्रत्येक निवडणुकीमध्ये नागरिक समस्यांचा पाढा वाचून दाखवितात तेव्हा मात्र नेते मंडळी गाजरे दाखवून नंतर मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या बहुसंख्य भागात विकासाचे घोंगडे वर्षानुवर्ष भिजत पडले असून विकासाचे चित्र सर्वत्र विदारक आहे. याकडे कोण व केव्हा गंभीरपणे लक्ष देणार ?पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काही गावे ही वर्षानुवर्ष दुष्काळग्रस्त आहेत. आदिवासी रोजी- रोटीसाठी स्थलांतर करीत आहेत. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी व मजुरीसाठी आजही वणवण करावी लागते. आजही काही भागात शिक्षणाची पुरेशी सोय नाही. कुपोषण आश्रमशाळांची दुरवस्था, निकृष्ट दर्जाचे रस्ते, वाढीव वीज बिलांचा गोंधळ, विजेच्या टंचाईची प्रचंड समस्या, सार्वजनिक दळण वळणाचे भयावह वास्तव, वाहतूक कोंडी, प्रदूषण, अपुरी लोकल सेवा व आरोग्य सेवेचा उडालेला बोजवारा या मुळे आज शहरी, ग्रामीण व दुर्गम भागातील सर्वच नागरिक त्रस्त आहेत आदिवासी, शेतकरी, बागायतदार, मच्छिमार, कामगार, व्यवसायिक सर्वच मेटाकुटीला आल्याने हे भोग आम्ही अनेक पिढ्या सोसतोय किमान आमच्या पुढच्या पिढीच्या नशिबी तरी अशा वेदना येऊ देऊ नका अशी मागणी भोळे भाबडे मतदार आज करीत आहेत निवडणुकीत सर्वच पक्षांचे नेते हे करू ते करू अशी आश्वासने देतात. हे आश्वासनाचे गाजर अजून किती दिवस दाखविणार? असा प्रश्न सर्वत्र उपस्थित करून आजही रस्ते, वीज, पाणी या मूलभूत समस्या जैसे थे असून त्या लोकप्रतिनिधींना पूर्णपणे सोडविता आल्या नाहीत. फक्त कोणत्या कामांसाठी कशा पद्धतीने आणि किती निधी आणला हे पटवून देण्यात सर्व मग्न असतात गावोगावच्या समस्या कायम असून हे चित्र बदलण्याची अपेक्षा असतांना मात्र निवडणुकीच्या निमित्ताने आता गावोगाव निवडणुकीतील उमेदवारांसह कार्यकर्तेही फिरू लागले आहेत. त्याच आश्वासनांवर जनतेची बोळवण केली जात आहे.कुठे आहे विकास? कोणी, कधी, कसा केला विकास?गावपातळीपर्यंत तळागाळापर्यंत आम्ही विकासाची गंगा पोहोचविल्याची स्वप्ने भोळ्याभाबड्या मतदारांना दाखविली जात आहेत. तुरळक लोकप्रतिनिधी वगळले तर इतरांनी काय कामे केलीत. हा संशोधनाचा विषय ठरेल.झालेला विकास पाहायचा म्हटला तर गावात विकासाच्या खुणा बर्हिगोल भिंगातून शोधाव्या लागतील. एवढी सगळी बिकट परिस्थिती असताना प्रत्येक निवडणुकीत पक्षीय मंडळी आपल्या उमेदवाराला सोबत घेऊन आश्वासनाचे घोडे दामटत आहेत.जनताही निवडणुकीतील या गुळगुळीत आश्वासनांना बळी पडते. हा वारंवार येणारा अनुभव असतानाही पैसा आणि दारूच्या जोरावर मतदारांना भुरळ घातली जाते. त्यामुळे आगामी काळात तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर