शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

56 इंच छातीवाले रोजगार का देत नाहीत?, प्रियंका गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 12:24 IST

लोकसभा निवडणूक 2019ची रणधुमाळी सुरू झाली आहे.

प्रयागराजः लोकसभा निवडणूक 2019ची रणधुमाळी सुरू झाली आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनीही काँग्रेसच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. प्रयागराजमध्ये प्रियंका गांधींनी योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. योगी आदित्यनाथ मोठमोठ्या बाता मारतात, पण विकास काहीच दिसत नाही. जे 56 इंच छातीवाले आहेत, ते रोजगार का उपलब्ध करून देत नाही, असा सवालही प्रियंका गांधींनी उपस्थित केला आहे. सीतामढीमध्ये प्रियंका गांधींनी मोदींवरही निशाणा साधला आहे. तुम्ही शक्तिमान आहात, तुमची 56 इंचाची छाती आहे. मग रोजगार उपलब्ध करून का नाही दिलात, कारण हीच तुमची दुर्बलता आहे. हे कमकुवत सरकार आहे. पाच वर्षांत केंद्र सरकारनं काहीही केलेलं नाही.70 वर्षांच्या मुद्द्यावरही प्रियंका गांधींनी मोदी सरकारला घेरलं. 70 वर्षांच्या रडगाण्यालाही एक्सपायरी डेट असते, हे विसरू नका, असंही प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत. तर काल प्रियंका गांधींनी मोदींवर निशाणा साधला होता. चौकीदार हे गरीब शेतकऱ्यांचे नव्हे, तर श्रीमंत लोकांचे असतात. देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही, असं सांगत प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या मंत्र्यांनी रविवारपासून ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे चौकीदार या शब्दाचा उल्लेख केला आहे. त्यावर प्रियंका गांधी यांनी भाष्य केलं होतं. तसेच त्यांनी यावेळी सपा-बसपावरही निशाणा साधला आहे. काँग्रेसनं सपा-बसपाला 7 जागा सोडल्यानंतर मायावतींनी काँग्रेसवर टीका केली होती. त्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या, आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही. आम्हाला कोणावाचूनही काही समस्या नाही. आमचा उद्देश भाजपाला हरवण्याचा आहे. तोच उद्देश त्या लोकांचा आहे.काँग्रेसनं सपा-बसपाला 7 जागा सोडल्यानंतर मायावतींनी हल्लाबोल केला होता. आमचा आणि काँग्रेसचा काहीही संबंध नाही, सपा-बसपा आघाडी भारतीय जनता पार्टीशी लढण्यास सक्षम आहे. काँग्रेसने सपा-बसपा आघाडीसाठी सात जागांवर उमेदवार उभे करणार नसल्याची चर्चा आहे, त्यावर बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसने सपा-बसपा आघाडीसोबत असल्याच्या अफवा पसरवू नये, असा इशारा दिला आहे. मायावती यांनी ट्विट करत सांगितले की, काँग्रेसने 7 जागा सपा-बसपा आघाडीसाठी सोडल्याचं सांगण्यात येत आहे.  काँग्रेसने हा गैरसमज पसरवू नये तसेच आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या या अफवांना बळी पडू नये असं आवाहन केले आहे. मायावती यांनी काँग्रेसला 80 जागांवर लढावं, असं आव्हान दिलं आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक