शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात फूट पाडली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 04:44 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील समाजात फूट पाडली आणि समाजातील विविध घटकांमध्ये भांडणे लावून दिली

कन्नूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील समाजात फूट पाडली आणि समाजातील विविध घटकांमध्ये भांडणे लावून दिली, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. देशामधील वाढती बेकारी, शेतकरी करत असलेल्या आत्महत्या आदी गंभीर समस्यांना मोदीच जबाबदार आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.ते म्हणाले की, मोदींच्या कारभारामुळे रोज देशातील २७ हजार युवक बेकार होत आहेत. कृषी क्षेत्राची पुरती वाट लागली आहे. राफेल विमाने खरेदी व्यवहाराच्या निमित्ताने मोदी यांनी स्वत:चा उद्योगपती मित्र अनिल अंबानी यांना ३० हजार कोटी रुपये दिले. हे एकप्रकारे देशद्रोही वर्तनच आहे. या गैरकृत्यांबद्दल मोदींनी स्पष्टीकरण द्यायला हवे. आर्थिक मागासलेपण, शेतीच्या समस्या तसेच भ्रष्टाचार या तीन मुद्द्यांबद्दल देशात सर्वंकष चर्चा झाली पाहिजे. पण मोदी यांनी आजवर एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही.

केरळच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी काही ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. केरळमधील वायनाडमधूनही राहुल गांधी लोकसभा निवडणूक लढत असल्याने त्यांच्या या दौºयाला विशेष महत्त्व होते. लोकसभा निवडणुकांच्या तिसºया टप्प्यात केरळमध्ये २३ एप्रिलला मतदान होणार आहे. 
>‘खोटी आश्वासने देणार नाही’वायनाडमधील जनतेला मी खोटी आश्वासने देणार नाही. त्यांचे प्रश्न सोडविण्यावर माझा भर राहील असे राहुल गांधी यांनी प्रचारसभेत सांगितले. मी इथे ‘मन की बात‘ सांगायला नव्हे, तर लोकांच्या मनातले जाणून घ्यायला आलो आहे असा टोला त्यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला. राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांच्या अस्थींचे तीस वर्षांपूर्वी वायनाड परिसरातील तिरूनेल्ली मंदिराजवळ पापनाशिनी नदीत विसर्जन करण्यात आले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKerala Lok Sabha Election 2019केराला लोकसभा निवडणूक 2019