शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

प्रणव मुखर्जींचे चिरंजीव अडचणीत, जांगीरपूरमध्ये यशाचा मार्ग कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 4:22 AM

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजित मुखर्जी यांच्यासाठी यशाचा मार्ग खूपच कठीण आहे.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : भाजपने पश्चिम बंगालमध्ये जांगीरपूर लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेस आणि माकपच्या मतांना फाटे फोडण्यासाठी मुस्लिम महिलेला उमेदवारी दिली असली तरी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजित मुखर्जी यांच्यासाठी यशाचा मार्ग खूपच कठीण आहे.जांगीरपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला. कधी तेथून प्रणव मुखर्जी, तर कधी त्यांचा मुलगा जिंकला. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात कट्टर वैर असतानाही मुखर्जी यांना अनेक दशके त्रास झाला नाही. आता मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील ४२ मतदारसंघांमागे आपली शक्ती लावण्याचे ठरवल्यामुळे परिस्थिती बदलली आहे. २०१४ च्या निवडणुकीत अभिजित मुखर्जींनी चौरंगी लढतीत फक्त ८ हजार मतांनी विजय मिळवला होता. तेव्हा भाजप राज्यात अजिबात महत्त्वाचा नव्हता, तरीही त्याचे उमेदवार सम्राट घोष यांना ११ लाखांपैकी जवळपास एक लाख मते मिळाली. या मतदारसंघात मतदारांची संख्या खूपच वाढून ती १६ लाखांपेक्षा जास्त झाली आहे व त्यातील ७० टक्के मुस्लिम आहेत. येथे २३ एप्रिल रोजी मतदान होईल.मुखर्जी यांनी मोदी सरकारशी चांगले संबंध निर्माण केले. मोदी सरकारने मुखर्जी यांचा भारतरत्न देऊन सन्मान केला व मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यानंतर भाजपने माकपमधून आलेल्या मुस्लिम महिलेला जांगीरपूरमध्ये उमेदवारी दिली. राज्यात माकपची घसरण वेगाने झाली. त्याचे कार्यकर्ते एक तर भाजपमध्ये किंवा तृणमूल काँग्रेसमध्ये गेले. माकपने तुलनेने नवा चेहरा झुल्फीकार अली यांना, तर तृणमूल काँग्रेसने खलीऊल रेहमान यांना उमेदवारी दिली आहे.भाजपने मुस्लिम मते विभागली जावीत यासाठी मफुजा खातूम यांना उमेदवारी दिली आहे. भाजप सर्व ४२ जागा लढवत आहे. अभिजित मुखर्जी यांना मदत व्हावी यासाठी भाजपने मुस्लिम महिलेला उभे केले. दुसरा एकच मुस्लिम उमेदवार भाजपने दिला, ते तृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री हुमायून कबीर. हे दोन अपवाद वगळता देशात भाजपने ४६०पैकी एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही.>काय आहेत अडचणी?काळजीत पडलेल्या प्रणव मुखर्जी यांनी आता स्वत: लक्ष घातले आहे. ममता बॅनर्जी यांनी अभिजित मुखर्जी यांना मदत न करण्याची ठाम भूमिका घेतली. काँग्रेसला माकपबरोबर निवडणूक युती करण्यात अपयश आल्यामुळे यावेळी अभिजित मुखर्जी यांचे भवितव्य संकटात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019jangipur-pcजंगीपूर