शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांचे नेत्यांना ‘पाव....पाव’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 15:07 IST

पितृपक्षातच रणधुमाळी : अर्ज भरण्याची प्रक्रियाही पितृपक्षात राहणार

- सुदाम देशमुखलोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : आता कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊ शकते. यंदा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ही पितृपक्षातच सुरू राहणार आहे. एरव्ही अर्ज दाखल करण्यासाठी पितृपक्ष कधी संपेल, याची इच्छुकांना प्रतीक्षा असते. यंदा मात्र कोणाची इच्छा असो की नसो, सर्वांना पितृपक्षातच अर्ज दाखल केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे इच्छुकांची थोडी धाकधूक वाढली आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणूक रणधुमाळीही पितृपक्षातच होती. २०१४ मध्ये १२ सप्टेंबरला आचारसंहिता लागू झाली होती. १५ आॅक्टोबरला मतदान आणि १९ आॅक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल लागला होता. त्यावेळी ९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीत पितृपक्ष होता. तशीच परिस्थिती यंदाही राहण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार १६ किंवा १९ सप्टेंबरला आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागल्यानंतर एक-दोन दिवसांनी अधिसूचना प्रसिद्ध होते. त्यानंतर ९ ते १० दिवसापर्यंत अर्ज दाखल करता येतात. १९ सप्टेंबरला किंवा त्याआधी अधिसूचना प्रसिद्ध झाली तर त्यानंतर दहा दिवसात २९ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील. तोपर्यंत पितृपक्ष संपलेला असेल. त्यामुळे पितृपक्ष संपल्यानंतर म्हणजे घटस्थापनेच्या पहिल्या दोन-तीन दिवसांमध्ये अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या तारखा असू शकतील.

२९ सप्टेंबरला घटस्थापना आहे. आतापासूनच इच्छुकांनी या पितृपक्षाची धास्ती घेतलेली आहे. आधीच पक्षांतरामुळे धास्तावलेले इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी मुहुर्ताच्या प्रतीक्षेत आहेत. पितृपक्षात नेमका कोणता मुहूर्त चांगला असेल, याची चाचणी इच्छुकांकडून सुरू झालेली दिसते.

पितृपक्षात पितर घरी जेवण्यासाठी यावेत, यासाठी ‘पाव पाव’ करीत कावळ््यांना आवाहन केले जाते. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी त्यांच्या नेत्यांकडे आता उमेदवारी मिळविण्यासाठी ठाण मांडलेले आहे. आता नेते कधी पावणार आणि तिकिट कधी मिळणार याचीच इच्छुकांना प्रतिक्षा लागली आहे.पितृपक्ष फलदायीचपितृपक्षामध्ये विवाह, मुंज आणि वास्तुशांती हे तीन कार्य करू नयेत. पितृपक्षात पितरांचा आशिर्वाद मिळतो. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासारखी कामांनाही पितृपक्षात अशुभ म्हणता येणार नाही. पितृपक्षात येणारी निवडणूक प्रक्रिया यामध्ये अशुभ समजण्याचे कारण नाही, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण