शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

हिंगोलीत राजकीय चिखलफेक जोरात, दोन्ही प्रमुख उमेदवार बेजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 05:14 IST

लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आता प्रचाराला खरी गती आली आहे.

- विजय पाटीललोकसभा मतदारसंघात प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आता प्रचाराला खरी गती आली आहे. कमी दिवस हाती राहिल्याने उमेदवार, त्यांचे नातेवाईक पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत. प्रमुख पक्षांची एकेक मोठी सभाही झाली आहे. राजकीय वातावरण ढवळून निघाल्याने आता टक्कर आणखी काट्याची होणार असल्याचे चित्र आहे.हिंगोली लोकसभा मतदारसंघात दोन्ही प्रमुख उमेदवार नवीन असल्याने त्यांचा कार्यकर्त्यांशी सूर जुळायलाच पहिले काही दिवस लागले. शिवसेनेचे हेमंत पाटील व काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्यातच आता काट्याची लढत दिसू लागली आहे. त्यातही प्रचारयंत्रणा राबविताना सुरुवातीला काँग्रेसचे तेवढे नियोजन दिसत नव्हते. दुसरीकडे शिवसेनेची यंत्रणा मात्र नियोजनबद्ध राबविली जात आहे. आता दोन्हीकडेही नियोजनबद्ध प्रचार सुरू झाला आहे. गटातटाच्या भिंती गळून पडल्या आहेत. सोबत राहूनही कोण दगाफटका करेल, याची काहीच शाश्वती नाही. मात्र, कोणालाही दूर सारण्याची ताकद उमेदवारांत तरी नाही.आतापर्यंत केवळ कुणी उमेदवार दलबदलू, कुणी बाहेरचा तर कुणी कमकुवत असल्याचीच चर्चा होती. आता मात्र मोदी फॅक्टरही जाणवत असून, सेनेचा त्यावरच भर आहे. तर काँग्रेस या फॅक्टरमुळे झालेल्या नुकसानीची माहिती सांगून मतदारांना साद घालत आहे. दोन्हींकडूनही जोरदार राजकीय चिखलफेक होत आहे. यात मतदारांचे मनोरंजन होत आहे. सेनेसाठी पंकजा मुंडे तर राष्ट्रवादीसाठी धनंजय मुंडे यांची सभा झाली. सुरुवातीला काँग्रेस एकतर्फी मैदान मारणार, असे निर्माण झालेले चित्र आता सेनाही गर्दी खेचू लागल्याने धूसर होत चालले आहे. त्यात वंचित आघाडी व बसपामुळे काय गोंधळ होतो, याचे वेगळे कोडे आहे.वंचित आघाडीच्या मोहन राठोड यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनीही सभा घेतल्या.पुढील टप्प्यात आणखी मोठ्या नेत्यांच्या सभांचा फड रंगणार आहे. बसपाचाही एकखांबी तंबू डॉ. दत्ता धनवे राबवित आहेत. एक-दोन वगळता इतर पक्षीय अथवा अपक्ष उमेदवारांचा प्रचारात कुठे पत्ता नाही. त्या-त्या भागात फिरत असल्याचे सांगितले जाते.।भाजपचे फसवे सरकार आता जाणार आहे. जनतेचा या सरकारवरील विश्वास उडाला आहे. प्रचारात लोक हे बोलून दाखवतात. शिवसेनेनेही निष्ठावंतांना डावलून धुळ््याचे पार्सल शिवसैनिकांच्या बोकांडीवर टाकले आहे. आघाडीत मात्र सगळेजण एकदिलाने विजयासाठी झटत आहेत.- सुभाष वानखेडे, काँग्रेस>विकासासाठी जनतेला पुन्हा नरेंद्र मोदी यांचे सरकार यावे, असे वाटते. शिवसेना व भाजपची सर्व मंडळी जीव ओतून काम करीत आहेत. त्यामुळे शिवसेनेशी गद्दारी केलेल्या वानखेडेंना शिवसैनिक धडा शिकविणार आहे. खा.सातवही पराभवाच्या भीतीने पळून गेले. त्यामुळे विजय निश्चित आहे.- हेमंत पाटील, शिवसेना>कळीचे मुद्देकाँग्रेसच्या प्रचारात अनेक स्थानिक चेहरे अजूनही दिसत नाहीत. शिवाय वंचितही जोराने मैदानात उतरल्याने डोकेदुखी वाढली.हेमंत पाटील व त्यांच्या पत्नीने पायाला भिंगरी बांधली. तरीही कुठे सेना तर कुठे भाजपची मंडळी अजूनही जीव ओतत नाही.

टॅग्स :Hemant Patilहेमंत पाटीलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019hingoli-pcहिंगोली