शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'सर्व जाती-धर्मातील लोकांना घेऊन जनसेवा करणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 01:41 IST

सर्वधर्म समभाव शिकवणीच्या विचारसरणीचे पालन करून, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेच्या स्वराज्याची निर्मिती केली.

म्हसळा : भगवान श्रीकृष्णांनी महाभारतात सांगितलेल्या भगवद्गीतेप्रमाणे आणि शाहू, फुले, आंबेडकर यांच्या सर्वधर्म समभाव शिकवणीच्या विचारसरणीचे पालन करून, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेच्या स्वराज्याची निर्मिती केली. हाच आदर्श मानून सर्व जाती-धर्मातील लोकांना, समाज घटकांना सोबत घेऊनच अविरतपणे जनसेवा करीत राहणार आहे. आगामी काळात पाच वर्षे आघाडीचाच खासदार म्हणून काम करणार असल्याचे प्रतिपादन सुनील तटकरे यांनी केले आहे.म्हसळा येथील आयोजित आघाडीच्या प्रचारसभेत आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे बोलत होते. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गाववाडी-वस्तीवर आघाडी सरकारच्या काळात आमदार, राज्यमंत्री, जलसंपदामंत्री व दोन्ही जिल्ह्यांचा पालकमंत्री म्हणून काम करताना सहकारी मंत्र्यांना सोबत घेऊन शासनाच्या विविध योजनांतून कोट्यवधी रु पयांची विकासकामे केली आहेत याचा आनंद व अभिमान आहे, असे सांगून आतासुद्धा केंद्रात व राज्यात सत्ता नसतानादेखील विद्यमान युती सरकारमधील मंत्र्यांकडून कोट्यवधी रु पयांचा विकासनिधी मतदारसंघात उपलब्ध करून देण्यास यशस्वी झालो आहे, असे सांगून जिल्ह्यातील जनतेचे आणि माझे नाते अतूट आहे, असा विश्वास व्यक्त केला.तसेच माझे राजकारण किंवा समाजकारण फक्त एका समाजापुरते मर्यादित नसून आगरी, कोळी, कुणबी, मराठा, धनगर, आदिवासी अशा विविध जाती-जमातीच्या व बौद्ध, मुस्लीम अशा सर्व धर्मीयांच्या लोकांना सोबत घेऊन त्यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करणारे आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व समाज घटकातील लोकांना सरपंच, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक अशा विविध पदांवर लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून देता आली, याचे समाधान आहे. समाजाच्या नावावर मते मागणाऱ्या अनंत गीते यांनी समाजासाठी काय केले आहे, याचेही उत्तर दिले पाहिजे. त्याचबरोबर विकासकामे करता आली नाहीत त्यामुळे आता माझ्यावर वैयक्तिक टीका करण्याचा एकमेव मार्ग अवलंबिलेल्या गीतेंनी टीका करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर बोलावे, असे जाहीर आवाहन अनंत गीतेंना करून जे गीते स्वत:ला स्वत: मतदान करू शकत नाहीत ते जनतेचा काय विकास करणार, असा रोखठोक सवाल गीतेंना केला आहे.काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार माणिक जगताप यांनी आपल्या भाषणाच्या सुरु वातीपासून अनंत गीतेंवर आगपाखड के ली. फक्त भावनिक राजकारण करून गीतेंनी इतके वर्षे खासदारकी उपभोगली; परंतु त्यांनी मतदारसंघात कोणताही ठोस विकास केला नसल्याची टीका केली. या वेळी आमदार पंडित पाटील, आ.अनिकेत तटकरे, काँगेस महिला जिल्हा अध्यक्षा श्रद्धा ठाकूर, ज्येष्ठ नेते अली कौचाली, अल्पसंख्याक सेल जिल्हा अध्यक्ष नाझीम हसवारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड