शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

'सर्व जाती-धर्मातील लोकांना घेऊन जनसेवा करणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 01:41 IST

सर्वधर्म समभाव शिकवणीच्या विचारसरणीचे पालन करून, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेच्या स्वराज्याची निर्मिती केली.

म्हसळा : भगवान श्रीकृष्णांनी महाभारतात सांगितलेल्या भगवद्गीतेप्रमाणे आणि शाहू, फुले, आंबेडकर यांच्या सर्वधर्म समभाव शिकवणीच्या विचारसरणीचे पालन करून, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेच्या स्वराज्याची निर्मिती केली. हाच आदर्श मानून सर्व जाती-धर्मातील लोकांना, समाज घटकांना सोबत घेऊनच अविरतपणे जनसेवा करीत राहणार आहे. आगामी काळात पाच वर्षे आघाडीचाच खासदार म्हणून काम करणार असल्याचे प्रतिपादन सुनील तटकरे यांनी केले आहे.म्हसळा येथील आयोजित आघाडीच्या प्रचारसभेत आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे बोलत होते. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गाववाडी-वस्तीवर आघाडी सरकारच्या काळात आमदार, राज्यमंत्री, जलसंपदामंत्री व दोन्ही जिल्ह्यांचा पालकमंत्री म्हणून काम करताना सहकारी मंत्र्यांना सोबत घेऊन शासनाच्या विविध योजनांतून कोट्यवधी रु पयांची विकासकामे केली आहेत याचा आनंद व अभिमान आहे, असे सांगून आतासुद्धा केंद्रात व राज्यात सत्ता नसतानादेखील विद्यमान युती सरकारमधील मंत्र्यांकडून कोट्यवधी रु पयांचा विकासनिधी मतदारसंघात उपलब्ध करून देण्यास यशस्वी झालो आहे, असे सांगून जिल्ह्यातील जनतेचे आणि माझे नाते अतूट आहे, असा विश्वास व्यक्त केला.तसेच माझे राजकारण किंवा समाजकारण फक्त एका समाजापुरते मर्यादित नसून आगरी, कोळी, कुणबी, मराठा, धनगर, आदिवासी अशा विविध जाती-जमातीच्या व बौद्ध, मुस्लीम अशा सर्व धर्मीयांच्या लोकांना सोबत घेऊन त्यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करणारे आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व समाज घटकातील लोकांना सरपंच, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक अशा विविध पदांवर लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून देता आली, याचे समाधान आहे. समाजाच्या नावावर मते मागणाऱ्या अनंत गीते यांनी समाजासाठी काय केले आहे, याचेही उत्तर दिले पाहिजे. त्याचबरोबर विकासकामे करता आली नाहीत त्यामुळे आता माझ्यावर वैयक्तिक टीका करण्याचा एकमेव मार्ग अवलंबिलेल्या गीतेंनी टीका करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर बोलावे, असे जाहीर आवाहन अनंत गीतेंना करून जे गीते स्वत:ला स्वत: मतदान करू शकत नाहीत ते जनतेचा काय विकास करणार, असा रोखठोक सवाल गीतेंना केला आहे.काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार माणिक जगताप यांनी आपल्या भाषणाच्या सुरु वातीपासून अनंत गीतेंवर आगपाखड के ली. फक्त भावनिक राजकारण करून गीतेंनी इतके वर्षे खासदारकी उपभोगली; परंतु त्यांनी मतदारसंघात कोणताही ठोस विकास केला नसल्याची टीका केली. या वेळी आमदार पंडित पाटील, आ.अनिकेत तटकरे, काँगेस महिला जिल्हा अध्यक्षा श्रद्धा ठाकूर, ज्येष्ठ नेते अली कौचाली, अल्पसंख्याक सेल जिल्हा अध्यक्ष नाझीम हसवारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड