शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

'पवार आमचे मित्र; पण पाठिंबा घेण्याचा प्रश्नच नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 06:58 IST

पीयूष गोयल यानी स्पष्ट केली भूमिका

भाजपला किती जागा मिळतील?पूर्वीपेक्षा जास्त. ईशान्य, ओडिशा, पश्चिम बंगाल व दक्षिणेतील राज्यांत आमची ताकद वाढली आहे. पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियताही काम करीत आहे.या निवडणुकीतील मुद्दे काय आहेत?महागाई नियंत्रणात आहे. देश जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था बनला आहे. अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. मोदी सरकारने लष्कराला पूर्ण मोकळीक दिली आहे.

प्रज्ञासिंग यांच्या वक्तव्याविषयी?पक्षाने भूमिका जाहीर केली आहे. प्रज्ञा यांनीही स्पष्टिकरण दिले आहे.उत्तर प्रदेश, बिहारात महागठबंधनचे आव्हान आहे?नाही. आम्ही बिहारात आघाडी घेऊ. उत्तर प्रदेशातही पूर्वीपेक्षा जास्त जागा जिंकू. कदाचित रायबरेली व अमेठीही आम्ही जिंकू शकू. राहुल गांधी मैदान सोडून वायनाडला पळाले आहेत.
गेल्या वेळी मोदीही दोन ठिकाणांहून लढत होते?राहुल यांनी अमेठीत काम केलेले नाही. पंतप्रधानांची तेथील रॅली पाहा. राहुल गांधी यांना तेथून जिंकणे अशक्य होऊ शकते.प्रियांका गांधी भाजपवर जोरदार टीका करीत आहेत. पण भाजप गप्प आहे. कोणती भीती आहे? त्या वाराणसीतून लढणार असल्याचेही बोलले जाते. प्रियांका गांधी यांचे आम्ही स्वागत करतो, पण जनता स्वागतास तयार नाही. अयोध्येत त्यांच्या स्वागताला १00-२00 लोकही नव्हते. या निवडणुकीत गांधी परिवाराचा मुखवटा फाटेल. अमेठीत राहुल गांधी हरतील. वाराणसीत प्रियांका गांधी हरतील.बिहारमध्ये तुमचे मंत्री गिरीराज सिंह बेगूसराय येथून लढण्यास घाबरत आहेत. रविशंकर प्रसाद यांना शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात का उभे केले?गिरीराज घाबरले नाहीत. ते ताकदीनिशी लढत आहेत. निवडणुकीत मतदारसंघ बदलण्यावरून काही नाराजी असते. ती दूर झाली आहे. रविशंकर प्रसाद यांना मागील निवडणुकीतच पाटणासाहिबमधून तिकीट दिले जाणार होते. अखेरीस सिन्हा यांना दिले, पण बिहारमध्ये आमचा मोठा विजय होईल. त्यात पाटणासाहिबही असेल.राज ठाकरे यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीबद्दल काय म्हणाल?त्यांच्या सभांचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही. ते काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसचे स्टार कॅम्पेनर तर नाहीत ना? त्यांच्या सभांचा खर्च काँग्रेस-राष्टÑवादीच्या खात्यात गणला गेला पाहिजे. 

गेल्या वेळी नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये सभा घेतली होती. परंतु यावेळी ते तेथे जाणार नाहीत?पंतप्रधान १५० हून अधिक सभा घेणार आहेत. बारामतीची मला माहिती नाही, पण शक्यता अशी आहे की, त्याच्या जवळपासच्या एखाद्या मतदारसंघात सभा असल्याने ते बारामतीत जाणार नसावेत.
शरद पवार यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? ते वेळेवर मैत्री निभावतात. गुजरात विधानसभा निवडणुकीच्यावेळी हे पाहावयास मिळाले. गरज पडल्यास सरकार स्थापन करण्यासाठी त्यांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत भाजप घेईल का?राजकारणात तर सर्वच जण आमचे मित्र आहेत. कधी राजकीय स्पर्धा-प्रतिस्पर्धेतून आम्ही कोणाशीही व्यक्तिगत शत्रुत्वाच्या भावनेतून बघत नाही. तथापि, राष्टÑवादीची मदत घेण्याच्या मुद्द्यावर मला वाटते की, याचा प्रश्नच येणार नाही.मुलाखत : संतोष ठाकुर/विकास झाडे

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीpiyush goyalपीयुष गोयल