शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

Cabinet Expansion: “चिराग नाही, मीच रामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारी”: पशुपती कुमार पारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 21:49 IST

Cabinet Expansion: पदभार स्वीकारल्यावर पशुपती कुमार पारस यांनी पुतणे चिरास पासवान यांना खडेबोल सुनावत, मीच रामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारी असल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देरामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारीचिराग पासवान यांनी आपल्या चुकांबाबत आत्मचिंतन करावेपशुपती कुमार पारस यांनी पुतणे चिरास पासवान यांना खडेबोल सुनावले

नवी दिल्ली: मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तारात ४३ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकारने काही नेत्यांना पदोन्नती तर काही मंत्र्यांना डच्चू दिला. डच्चू दिलेल्या मंत्र्यांमध्ये अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे. मोदी सरकारने कामगिरीच्या आधारावर नवीन मंत्रिमंडळ गठीत केल्याची चर्चा आहे. यामध्ये पशुपती कुमार पारस यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यावर पशुपती कुमार पारस यांनी पुतणे चिरास पासवान यांना खडेबोल सुनावत, मीच रामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारी असल्याचे म्हटले आहे. (pashupati kumar paras says i am the real political successor of ram vilas paswan)

दिवंगत केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतर लोक जनशक्ती पक्षात मोठ्या प्रमाणावर गटबाजी झाल्याचे समोर आले. चिराग पासवान आणि काका पशुपती कुमार पारस यांच्यातील वाद वाढले. मात्र, आता केंद्रात मंत्रिपद मिळालेल्या पारस यांनी चिराग पासवान यांना चांगलेच सुनावले आहे. मीच रामविलास पासवान यांना खरा राजकीय वारसदार आहे. चिराग नाही, असे पारस यांनी म्हटले आहे. 

पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणे शक्य!; RBI गव्हर्नरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

आपल्या चुकांबाबत आत्मचिंतन करावे

चिराग पासवान राम विलास पासवान यांच्या संपत्ती, मालमत्ताचे वारसदार असू शकतात. मात्र, खरा राजकीय उत्तराधिकारी मीच आहे. चिराग पासवान यांनी आपल्या चुकांबाबत आत्मचिंतन करावे. राम विलास पासवान माझे आदर्श आहेत, असे पारस यांनी स्पष्ट केले आहे. तसेच केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी देत विश्वास ठेवल्याबाबत पारस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. आगामी कालावधीत मंत्रालयाचे कामकाज समजून घेऊन व्हिजन आणि कार्यक्रमांची रुपरेषा तयार करणार असल्याचे पारस यांनी नमूद केले. 

“केंद्रातील फक्त मंत्री नव्हे तर पंतप्रधानच बदलण्याची गरज”

चेहरे बदल्यामुळे परिस्थिती बदलणार का?

मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, यामुळे देशभरात व्यापक प्रमाणात असलेली गरिबी, बेरोजगारी, महागाई, कुपोषण, आरोग्य सेवा आणि चांगल्या शिक्षणाचा अभाव, शेतकऱ्यांवरील संकट, भ्रष्टाचार, दलित आणि अल्पसंख्यांकावरील अत्याचार यांसारख्या समस्या दूर होणार आहेत का, याचे उत्तर नकारार्थीच आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार हे केवळ एक नाटक आहे, अशी टीका निवृत्त न्या. मार्कंडेय काटजू यांनी केली आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणBiharबिहारCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारCentral Governmentकेंद्र सरकार