शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Cabinet Expansion: “चिराग नाही, मीच रामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारी”: पशुपती कुमार पारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 21:49 IST

Cabinet Expansion: पदभार स्वीकारल्यावर पशुपती कुमार पारस यांनी पुतणे चिरास पासवान यांना खडेबोल सुनावत, मीच रामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारी असल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देरामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारीचिराग पासवान यांनी आपल्या चुकांबाबत आत्मचिंतन करावेपशुपती कुमार पारस यांनी पुतणे चिरास पासवान यांना खडेबोल सुनावले

नवी दिल्ली: मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तारात ४३ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकारने काही नेत्यांना पदोन्नती तर काही मंत्र्यांना डच्चू दिला. डच्चू दिलेल्या मंत्र्यांमध्ये अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे. मोदी सरकारने कामगिरीच्या आधारावर नवीन मंत्रिमंडळ गठीत केल्याची चर्चा आहे. यामध्ये पशुपती कुमार पारस यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यावर पशुपती कुमार पारस यांनी पुतणे चिरास पासवान यांना खडेबोल सुनावत, मीच रामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारी असल्याचे म्हटले आहे. (pashupati kumar paras says i am the real political successor of ram vilas paswan)

दिवंगत केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतर लोक जनशक्ती पक्षात मोठ्या प्रमाणावर गटबाजी झाल्याचे समोर आले. चिराग पासवान आणि काका पशुपती कुमार पारस यांच्यातील वाद वाढले. मात्र, आता केंद्रात मंत्रिपद मिळालेल्या पारस यांनी चिराग पासवान यांना चांगलेच सुनावले आहे. मीच रामविलास पासवान यांना खरा राजकीय वारसदार आहे. चिराग नाही, असे पारस यांनी म्हटले आहे. 

पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणे शक्य!; RBI गव्हर्नरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

आपल्या चुकांबाबत आत्मचिंतन करावे

चिराग पासवान राम विलास पासवान यांच्या संपत्ती, मालमत्ताचे वारसदार असू शकतात. मात्र, खरा राजकीय उत्तराधिकारी मीच आहे. चिराग पासवान यांनी आपल्या चुकांबाबत आत्मचिंतन करावे. राम विलास पासवान माझे आदर्श आहेत, असे पारस यांनी स्पष्ट केले आहे. तसेच केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी देत विश्वास ठेवल्याबाबत पारस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. आगामी कालावधीत मंत्रालयाचे कामकाज समजून घेऊन व्हिजन आणि कार्यक्रमांची रुपरेषा तयार करणार असल्याचे पारस यांनी नमूद केले. 

“केंद्रातील फक्त मंत्री नव्हे तर पंतप्रधानच बदलण्याची गरज”

चेहरे बदल्यामुळे परिस्थिती बदलणार का?

मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, यामुळे देशभरात व्यापक प्रमाणात असलेली गरिबी, बेरोजगारी, महागाई, कुपोषण, आरोग्य सेवा आणि चांगल्या शिक्षणाचा अभाव, शेतकऱ्यांवरील संकट, भ्रष्टाचार, दलित आणि अल्पसंख्यांकावरील अत्याचार यांसारख्या समस्या दूर होणार आहेत का, याचे उत्तर नकारार्थीच आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार हे केवळ एक नाटक आहे, अशी टीका निवृत्त न्या. मार्कंडेय काटजू यांनी केली आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणBiharबिहारCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारCentral Governmentकेंद्र सरकार