शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

Cabinet Expansion: “चिराग नाही, मीच रामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारी”: पशुपती कुमार पारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 21:49 IST

Cabinet Expansion: पदभार स्वीकारल्यावर पशुपती कुमार पारस यांनी पुतणे चिरास पासवान यांना खडेबोल सुनावत, मीच रामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारी असल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देरामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारीचिराग पासवान यांनी आपल्या चुकांबाबत आत्मचिंतन करावेपशुपती कुमार पारस यांनी पुतणे चिरास पासवान यांना खडेबोल सुनावले

नवी दिल्ली: मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तारात ४३ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकारने काही नेत्यांना पदोन्नती तर काही मंत्र्यांना डच्चू दिला. डच्चू दिलेल्या मंत्र्यांमध्ये अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे. मोदी सरकारने कामगिरीच्या आधारावर नवीन मंत्रिमंडळ गठीत केल्याची चर्चा आहे. यामध्ये पशुपती कुमार पारस यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यावर पशुपती कुमार पारस यांनी पुतणे चिरास पासवान यांना खडेबोल सुनावत, मीच रामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारी असल्याचे म्हटले आहे. (pashupati kumar paras says i am the real political successor of ram vilas paswan)

दिवंगत केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतर लोक जनशक्ती पक्षात मोठ्या प्रमाणावर गटबाजी झाल्याचे समोर आले. चिराग पासवान आणि काका पशुपती कुमार पारस यांच्यातील वाद वाढले. मात्र, आता केंद्रात मंत्रिपद मिळालेल्या पारस यांनी चिराग पासवान यांना चांगलेच सुनावले आहे. मीच रामविलास पासवान यांना खरा राजकीय वारसदार आहे. चिराग नाही, असे पारस यांनी म्हटले आहे. 

पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणे शक्य!; RBI गव्हर्नरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

आपल्या चुकांबाबत आत्मचिंतन करावे

चिराग पासवान राम विलास पासवान यांच्या संपत्ती, मालमत्ताचे वारसदार असू शकतात. मात्र, खरा राजकीय उत्तराधिकारी मीच आहे. चिराग पासवान यांनी आपल्या चुकांबाबत आत्मचिंतन करावे. राम विलास पासवान माझे आदर्श आहेत, असे पारस यांनी स्पष्ट केले आहे. तसेच केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी देत विश्वास ठेवल्याबाबत पारस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. आगामी कालावधीत मंत्रालयाचे कामकाज समजून घेऊन व्हिजन आणि कार्यक्रमांची रुपरेषा तयार करणार असल्याचे पारस यांनी नमूद केले. 

“केंद्रातील फक्त मंत्री नव्हे तर पंतप्रधानच बदलण्याची गरज”

चेहरे बदल्यामुळे परिस्थिती बदलणार का?

मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, यामुळे देशभरात व्यापक प्रमाणात असलेली गरिबी, बेरोजगारी, महागाई, कुपोषण, आरोग्य सेवा आणि चांगल्या शिक्षणाचा अभाव, शेतकऱ्यांवरील संकट, भ्रष्टाचार, दलित आणि अल्पसंख्यांकावरील अत्याचार यांसारख्या समस्या दूर होणार आहेत का, याचे उत्तर नकारार्थीच आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार हे केवळ एक नाटक आहे, अशी टीका निवृत्त न्या. मार्कंडेय काटजू यांनी केली आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणBiharबिहारCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारCentral Governmentकेंद्र सरकार