शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पलानीस्वामी भ्रष्टाचारामुळे अडकले आहेत सापळ्यात - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 05:23 IST

अखिल भारतीय अण्णा द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी हे भ्रष्टाचारामुळे सापळ्यात अडकले असल्यामुळे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर गुडघे टेकून आहेत

चेन्नई : अखिल भारतीय अण्णा द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी हे भ्रष्टाचारामुळे सापळ्यात अडकले असल्यामुळे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर गुडघे टेकून आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हल्ला केला.येथे रविवारी प्रचारसभेत बोलताना गांधी म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांवर नियंत्रण ठेवून शांतपणे त्यांंना आपल्या पाया पडायला लावतात हे मी पाहिले. मी हे अजिबात स्वीकारू शकत नाही.” उत्तर प्रदेशमध्ये नेत्याला अमित शहा यांच्यासमोर वाकायला लावले कारण तो नेता भ्रष्ट होता आणि भ्रष्टाचारामुळे त्याने स्वातंत्र्य गमावले होते. अशाच परिस्थितीला पलानीस्वामी यांनी तोंड दिले, असा दावा गांधी यांनी केला. उत्तर प्रदेशमधील नेत्याचे नाव गांधी यांनी घेतले नाही. गांधी म्हणाले, “शोकांतिका ही आहे की, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना अमित शहा यांच्यासमोर वाकावे, असे वाटत नाही आणि तामिळनाडूच्या कोणत्याही व्यक्तिला असेच वाटते. तथापि, पलानीस्वामी यांनी जो भ्रष्टाचार केला त्यामुळे त्यांना शहा यांच्यापुढे वाकणे भाग पडले.” तामिळनाडूच्या जनतेचा जो पैसा पलानीस्वामी यांनी चोरला त्यामुळे ते आता सापळ्यात अडकले आहेत, असे गांधी म्हणाले. महान तमिळ संस्कृतीशी नाळ जोडलेले पलानीस्वामी जेव्हा मोदी आणि शहा यांच्यासमोर वाकताना पाहिले तेव्हा मला संताप आला, असेही गांधी म्हणाले. मोदी आणि शहा यांच्या पाया पडा आणि त्यांच्यासमोर नतमस्तक व्हा मग ती व्यक्ती भाजपची असो किंवा आघाडीतील इतर पक्षांची भाजपला या नात्याशिवाय दुसरे नातेच समजले नाही, असा दावा गांधी यांनी केला. ते म्हणाले, आमच्या कल्पना वेगळ्या आहेत. आमच्यासाठी जे नाते समान नाही ते निरूपयोगी आहे. भारताच्या पायाचा भाग तामिळनाडू असल्याचे सांगून गांधी यांनी तमिळ भाषा शिकण्याची माझी इच्छा आहे, असे म्हटले. 

टॅग्स :Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१