शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

Oxygens: “केंद्र सरकारच्या खोट्या आत्मविश्वासामुळं देशावर ऑक्सिजन संकट; आरोग्यमंत्र्यांना काढून टाका”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 15:29 IST

कोरोनाचा संभावित धोका लक्षात घेता सरकारने १ लाख टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याची प्रक्रिया सुरु केल्याचं केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले होते.

ठळक मुद्देरुग्णालय आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्रत्येक मिनिटाला ऑक्सिजनसाठी फोन येत आहेत. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास नकार दिला जात आहे.देशात ऑक्सिजन नसल्याने अनेक ठिकाणी रुग्ण दगावल्याच्या बातम्या येत आहेत. १ लाख टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याच्या प्रक्रियेचं काय झालं? मागील ५ महिन्यात किती ऑक्सिजन आयात झाला?

मुंबई – देशात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे त्याला पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे. दिल्लीत ५ महिन्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य सचिवांनी मेडिकलच्या गरजेसाठी ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत चांगली स्थिती आहे असा दावा केला होता. मागील १० महिन्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासला नाही आणि यापुढेही कमी पडणार नाही असं सांगितले होतं असा आरोप काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केला आहे.(Congress Prithviraj Chavan Target Central government over Oxygens shortage in India) 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोरोनाचा संभावित धोका लक्षात घेता सरकारने १ लाख टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याची प्रक्रिया सुरु केल्याचं केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले होते. सरकार ऑक्सिजनची पूर्तता करण्यास अयशस्वी ठरलं आहे. त्यामुळे देशावर अभूतपूर्व ऑक्सिजन संकट उभं राहिलं आहे. रुग्णालय आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्रत्येक मिनिटाला ऑक्सिजनसाठी फोन येत आहेत. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास नकार दिला जात आहे. देशात ऑक्सिजन नसल्याने अनेक ठिकाणी रुग्ण दगावल्याच्या बातम्या येत आहेत. दिल्लीच्या खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी हायकोर्टाचे दरवाजे ठोठवावे लागले. हे त्रासदायक चित्र आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच ही सगळी परिस्थिती पाहता केंद्र सरकारला काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. ऑक्सिजन पुरवठाबाबत आरोग्य मंत्रालयाने कशाच्या आधारे देशात चांगली स्थिती आहे असा दावा केला होता? १ लाख टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याच्या प्रक्रियेचं काय झालं? मागील ५ महिन्यात किती ऑक्सिजन आयात झाला? ही प्रक्रिया कोणी थांबवली? सध्याच्या स्थितीत १६२ पीएसए ऑक्सिजन उत्पादन यंत्रणेपैकी देशात केवळ ३३ हॉस्पिटलमध्ये हे यंत्र लावण्यात आले आहे हे खरं आहे का? असे प्रश्न पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केलेत.

दरम्यान, जागतिक आर्थिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:ची पाठ ठोपटून घेतली होती. कशारितीने भारताने कोरोनाला हरवलं? परंतु आज ५० पेक्षा अधिक देशांनी विमान वाहतूक थांबवली असून त्यांच्याकडे आपण मदतीसाठी याचना करत आहोत. देशाच्या अशा नेतृत्वामुळे मोठी किंमत मोजावी लागत आहे. निर्णय क्षमतेचा अभाव असल्यानं भारत या संकटात उभा आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे जीव गेलेल्यांचे नातेवाईकांना उत्तर हवं. या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या आरोग्य मंत्री आणि अन्य अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या