शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Oxygens: “केंद्र सरकारच्या खोट्या आत्मविश्वासामुळं देशावर ऑक्सिजन संकट; आरोग्यमंत्र्यांना काढून टाका”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 15:29 IST

कोरोनाचा संभावित धोका लक्षात घेता सरकारने १ लाख टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याची प्रक्रिया सुरु केल्याचं केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले होते.

ठळक मुद्देरुग्णालय आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्रत्येक मिनिटाला ऑक्सिजनसाठी फोन येत आहेत. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास नकार दिला जात आहे.देशात ऑक्सिजन नसल्याने अनेक ठिकाणी रुग्ण दगावल्याच्या बातम्या येत आहेत. १ लाख टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याच्या प्रक्रियेचं काय झालं? मागील ५ महिन्यात किती ऑक्सिजन आयात झाला?

मुंबई – देशात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे त्याला पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे. दिल्लीत ५ महिन्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य सचिवांनी मेडिकलच्या गरजेसाठी ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत चांगली स्थिती आहे असा दावा केला होता. मागील १० महिन्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासला नाही आणि यापुढेही कमी पडणार नाही असं सांगितले होतं असा आरोप काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केला आहे.(Congress Prithviraj Chavan Target Central government over Oxygens shortage in India) 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोरोनाचा संभावित धोका लक्षात घेता सरकारने १ लाख टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याची प्रक्रिया सुरु केल्याचं केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले होते. सरकार ऑक्सिजनची पूर्तता करण्यास अयशस्वी ठरलं आहे. त्यामुळे देशावर अभूतपूर्व ऑक्सिजन संकट उभं राहिलं आहे. रुग्णालय आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्रत्येक मिनिटाला ऑक्सिजनसाठी फोन येत आहेत. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास नकार दिला जात आहे. देशात ऑक्सिजन नसल्याने अनेक ठिकाणी रुग्ण दगावल्याच्या बातम्या येत आहेत. दिल्लीच्या खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी हायकोर्टाचे दरवाजे ठोठवावे लागले. हे त्रासदायक चित्र आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच ही सगळी परिस्थिती पाहता केंद्र सरकारला काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. ऑक्सिजन पुरवठाबाबत आरोग्य मंत्रालयाने कशाच्या आधारे देशात चांगली स्थिती आहे असा दावा केला होता? १ लाख टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याच्या प्रक्रियेचं काय झालं? मागील ५ महिन्यात किती ऑक्सिजन आयात झाला? ही प्रक्रिया कोणी थांबवली? सध्याच्या स्थितीत १६२ पीएसए ऑक्सिजन उत्पादन यंत्रणेपैकी देशात केवळ ३३ हॉस्पिटलमध्ये हे यंत्र लावण्यात आले आहे हे खरं आहे का? असे प्रश्न पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केलेत.

दरम्यान, जागतिक आर्थिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:ची पाठ ठोपटून घेतली होती. कशारितीने भारताने कोरोनाला हरवलं? परंतु आज ५० पेक्षा अधिक देशांनी विमान वाहतूक थांबवली असून त्यांच्याकडे आपण मदतीसाठी याचना करत आहोत. देशाच्या अशा नेतृत्वामुळे मोठी किंमत मोजावी लागत आहे. निर्णय क्षमतेचा अभाव असल्यानं भारत या संकटात उभा आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे जीव गेलेल्यांचे नातेवाईकांना उत्तर हवं. या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या आरोग्य मंत्री आणि अन्य अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या