शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

पुढील लोकसभेसाठी विरोधकांनी एकत्र यावे, काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 06:28 IST

Sonia Gandhi : काँग्रेससह २० बिगरभाजप पक्षाच्या नेत्यांच्या शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या.

- व्यंकटेश केसरी

नवी दिल्ली : स्वातंत्र्य चळवळीने देशाला दिलेली मूल्ये मानणारे सरकार २०२४च्या लोकसभा निवडणुकांनंतर सत्तेवर आणायचे आहे, असा निर्धार करून बिगरभाजप पक्षांनी आपली धोरणे आखावीत, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले आहे. हे ध्येय आपण एकजुटीने साध्य करू. त्याशिवाय आपल्याकडे अन्य पर्यायही नाही, असेही त्या म्हणाल्या.

काँग्रेससह २० बिगरभाजप पक्षाच्या नेत्यांच्या शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या. केंद्र सरकारने सहकार हे नवीन खाते स्थापन करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे त्या खात्याची जबाबदारी दिली आहे. केंद्राची ही कृती म्हणजे राज्यांच्या व राज्य सरकारांच्या अधिकारात ढवळाढवळ आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते.

बिगरभाजप राज्यांना लसपुरवठा करण्यात केंद्र सरकार पक्षपात करीत आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याचाही उल्लेख सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात केला.सोनिया गांधी म्हणाल्या की, सार्वजनिक महत्त्वाच्या व तातडीच्या विषयांवर संसदेमध्ये चर्चा न करण्याचा अत्यंत उद्धट पवित्रा केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे संसदीय पावसाळी अधिवेशन अक्षरश: वाया गेले. या अधिवेशनात विरोधकांनी दाखविलेली एकजूट संसदेच्या आगामी अधिवेशनांमध्येही कायम ठेवावी, असे आवाहन काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले.

बसप, सप बैठकीला अनुपस्थित२० बिगरभाजप पक्षांची संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर झालेली पहिलीच बैठक आहे. या बैठकीत समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष यांनी हजेरी लावली नव्हती. मात्र देशातील इतर प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावल्याने विरोधी आघाडीची चर्चा जोरात सुरू झाली आहे.

२०२४ जिंकण्यासाठी २० विरोधी पक्षांची बैठककाँग्रेससह २० बिगरभाजप पक्षाच्या नेत्यांशी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुक अब्दुल्ला, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव, काँग्रेस नेते राहुल गांधी आदी नेते हजर होते.

लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या पक्षांनी एकत्र यावे : शरद पवारदेशापुढील सर्व समस्या सोडविण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे सेक्युलर विचारसरणी व लोकशाहीवर विश्वास असलेल्या सर्व पक्षांनी सध्याच्या स्थितीचा विचार करून एकत्र येण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बिगरभाजप पक्षांच्या बैठकीत सांगितले. ते म्हणाले की, सर्व प्रश्नांवर एकत्रितरीत्या चर्चा करण्याऐवजी प्राधान्यक्रमाने एकेक प्रश्न घेऊन तो सोडवूया. त्यातून देशाला उत्तम भवितव्य देण्याचा प्रयत्न करूया, असेही आवाहन शरद पवार यांनी केले.बिगरभाजप पक्षांची आघाडी स्थापन व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेस