शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दोस्त दोस्त ना रहा! NDA ची अवस्था; केंद्रीय मंत्रिमंडळात बिगर भाजपाचा एकच मंत्री, तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 08:29 IST

BJP, Narendra Modi Cabinet, Ramdas Athwale News: मित्रपक्ष झाले कमी । रालोआमध्ये प्रथमच ही स्थिती; भाजपचे जुने सहकारी होऊ लागले दूर

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतर व त्याआधी काही मतभेदांमुळे अकाली दल रालोआमधून बाहेर पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ५१ जणांच्या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाचे मंत्री रामदास आठवले वगळता बाकीचे सर्व मंत्री भाजपचेच आहेत.

देशात १९७७ साली पहिले आघाडी सरकार स्थापन झाले. तेव्हापासून अशी वेळ पहिल्यांदाच आली आहे. आठवले केंद्रीय सामाजिक कल्याण राज्यमंत्री आहेत. रालोआ २०१९ साली पुन्हा सत्तेत आल्यानंतर आपल्या घटक पक्षांना काही मंत्रीपदे देऊ केली होती. शिवसेनेच्या अरविंद सावंत यांना अवजड उद्योग, अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांना अन्नप्रक्रिया खात्याचे व रामविलास पासवान यांना ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण खात्याचे मंत्री केले होते.

गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये भाजपची साथ सोडून शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडीचे सरकार स्थापन केले. केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी पदाचा राजीनामा दिला. कृषी विधेयकांवरून मतभेद झाल्याने हरसिमरत कौर यांनीही मंत्रिपद सोडले. आता प्रदीर्घ आजारामुळे रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे.जनता दल (यु) बाहेरच2014 साली रालोआतून बाहेर पडलेले व कालांतराने पुन्हा परतलेल्या जनता दल (यु) या पक्षाने केंद्रीय मंत्रिमंडळात सामील न होण्याचा निर्णय घेतला.या पक्षाला दोन मंत्रिपदे हवी होती. ती मिळणार नसल्याने या पक्षाने हा पवित्रा घेतला. नितीशकुमार प्रमुख असलेल्या या पक्षाचे १५ खासदार आहेत.2019 च्या लोकसभा निवडणुकीत रालोआने ३४३ लोकसभेच्या जागा लढविल्या होत्या. त्यातील ३०३ जागा भाजप एकटा जिंकला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कारकीर्दीत रालोआतील पाच घटक पक्षांच्या खासदारांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाRamdas Athawaleरामदास आठवले