शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Remedesivir issue: आता रेमडेसीवीरवरून आरोप-प्रत्यारोप; केंद्रात अन् राज्यात जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 06:39 IST

Remedesivir issue after corona Vaccine shortage: महाराष्ट्राला रेमडेसिविर देण्यास केंद्राची बंदी; मंत्री नवाब मलिक; पुरवठा अडकलेला नाही, केंद्र सरकारचे प्रत्युत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई / नवी दिल्ली : राज्यात रेमडेसिविर आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून राज्य व केंद्र सरकार आमनेसामने आले आहे. राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर आराेप केल्यानंतर केंद्रीय मंत्री पीयूष गाेयल व मनसुख मांडविया यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

रेमडेसिविर या औषधाची आवश्यकता असताना आणि उपलब्धतादेखील असताना तात्काळ निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे आणि राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांना ताबडतोब रेमडेसिविरच्या कुपी पुरवल्या जाव्यात, अशी मागणी नवाब मलिक केली आहे.

राज्य सरकारने १६ निर्यात कंपन्यांकडे रेमडेसिविरबाबत विचारणा केली असता महाराष्ट्रात रेमडेसिविर पुरवठा करण्यास  केंद्र सरकारने बंदी घातली आहे. रेमडेसिविर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली आहे, असे सांगितले आहे. हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचे मलिक यांनी म्हटले. त्यामुळे या परिस्थितीत राज्य सरकारकडे या निर्यातदारांकडून रेमडेसिविरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

१६ निर्यातदारांना परवानगी मिळेनाकेंद्र सरकारकडून रेमडेसिविर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिविरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाही. केंद्र सरकार त्यास नकार देत असल्याचा आक्षेप अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी घेतला. हे उत्पादन करणाऱ्या ७ कंपन्यांमार्फतच रेमडेसिविर विकले जावे, असे केंद्राचे म्हणणे आहे. मात्र, या ७ कंपन्या जबाबदारी घेण्यास नकार देत असल्याने आता केंद्रापुढे निर्णय घेण्याचा पेच निर्माण झाला आहे, असेही मलिक म्हणाले. 

त्या १६ कंपन्यांची यादी द्यावीकेंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी नवाब मलिक अर्धसत्य आणि खाेटे बाेलत असल्याची टीका केली. ते म्हणाले, केंद्राकडून राज्याला रेमडेसिविरचा पुरवठा करण्यास सर्वताेपरी प्रयत्न सुरू आहेत. उत्पादन दुप्पट करण्यासाठी २० कारखान्यांना परवानगी दिली आहे. सर्व उत्पादकांना संपर्क केला आहे. काेणताही माल अडकलेला नाही. मलिक यांनी नकार देणाऱ्या १६ कंपन्यांची यादी, उपलब्ध साठा ही माहिती द्यावी.

महाराष्ट्राला भ्रष्ट सरकारने ग्रासले महाराष्ट्राला अयाेग्य आणि भ्रष्ट सरकारने ग्रासले आहे. केंद्र सरकारने राज्याला सर्वाधिक ऑक्सिजनचा पुरवठा केला, तसेच राज्य सरकारसाेबत दरराेज संपर्कात आहे. मात्र, राज्य सरकारकडून ऑक्सिजनवरून राजकारण सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा आणि जबाबदारी घ्यावी, असे गाेयल म्हणाले. सध्या औद्याेगिक वापराचा ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी वळविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या