शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

Remedesivir issue: आता रेमडेसीवीरवरून आरोप-प्रत्यारोप; केंद्रात अन् राज्यात जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 06:39 IST

Remedesivir issue after corona Vaccine shortage: महाराष्ट्राला रेमडेसिविर देण्यास केंद्राची बंदी; मंत्री नवाब मलिक; पुरवठा अडकलेला नाही, केंद्र सरकारचे प्रत्युत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई / नवी दिल्ली : राज्यात रेमडेसिविर आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून राज्य व केंद्र सरकार आमनेसामने आले आहे. राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर आराेप केल्यानंतर केंद्रीय मंत्री पीयूष गाेयल व मनसुख मांडविया यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

रेमडेसिविर या औषधाची आवश्यकता असताना आणि उपलब्धतादेखील असताना तात्काळ निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे आणि राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांना ताबडतोब रेमडेसिविरच्या कुपी पुरवल्या जाव्यात, अशी मागणी नवाब मलिक केली आहे.

राज्य सरकारने १६ निर्यात कंपन्यांकडे रेमडेसिविरबाबत विचारणा केली असता महाराष्ट्रात रेमडेसिविर पुरवठा करण्यास  केंद्र सरकारने बंदी घातली आहे. रेमडेसिविर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली आहे, असे सांगितले आहे. हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचे मलिक यांनी म्हटले. त्यामुळे या परिस्थितीत राज्य सरकारकडे या निर्यातदारांकडून रेमडेसिविरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

१६ निर्यातदारांना परवानगी मिळेनाकेंद्र सरकारकडून रेमडेसिविर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिविरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाही. केंद्र सरकार त्यास नकार देत असल्याचा आक्षेप अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी घेतला. हे उत्पादन करणाऱ्या ७ कंपन्यांमार्फतच रेमडेसिविर विकले जावे, असे केंद्राचे म्हणणे आहे. मात्र, या ७ कंपन्या जबाबदारी घेण्यास नकार देत असल्याने आता केंद्रापुढे निर्णय घेण्याचा पेच निर्माण झाला आहे, असेही मलिक म्हणाले. 

त्या १६ कंपन्यांची यादी द्यावीकेंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी नवाब मलिक अर्धसत्य आणि खाेटे बाेलत असल्याची टीका केली. ते म्हणाले, केंद्राकडून राज्याला रेमडेसिविरचा पुरवठा करण्यास सर्वताेपरी प्रयत्न सुरू आहेत. उत्पादन दुप्पट करण्यासाठी २० कारखान्यांना परवानगी दिली आहे. सर्व उत्पादकांना संपर्क केला आहे. काेणताही माल अडकलेला नाही. मलिक यांनी नकार देणाऱ्या १६ कंपन्यांची यादी, उपलब्ध साठा ही माहिती द्यावी.

महाराष्ट्राला भ्रष्ट सरकारने ग्रासले महाराष्ट्राला अयाेग्य आणि भ्रष्ट सरकारने ग्रासले आहे. केंद्र सरकारने राज्याला सर्वाधिक ऑक्सिजनचा पुरवठा केला, तसेच राज्य सरकारसाेबत दरराेज संपर्कात आहे. मात्र, राज्य सरकारकडून ऑक्सिजनवरून राजकारण सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा आणि जबाबदारी घ्यावी, असे गाेयल म्हणाले. सध्या औद्याेगिक वापराचा ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी वळविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या