शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पाकबद्दल नव्हे, भारताविषयी बोला - प्रियंका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 04:02 IST

भाजपचे नेते फक्त स्वत:लाच राष्ट्रवादी समजतात. ते खरे असेल, तर देशातील साऱ्या शहीद जवानांचा सन्मान करावा.

फतेहपूर सिक्री : भाजपचे नेते फक्त स्वत:लाच राष्ट्रवादी समजतात. ते खरे असेल, तर देशातील साऱ्या शहीद जवानांचा सन्मान करावा. जर ते राष्ट्रवादी असतील तर निवडणुकांच्या काळात पाकिस्तानविषयी नव्हे, भारताविषयी बोलावे, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केले. काँग्रेसचे उमेदवार राज बब्बर यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मार्गदर्शन केले.

प्रियांका यांनी महिला, युवक, शेतकरी आणि जवानांसाठी काय केले, आणि काय करणार आहेत, याबाबत भाजपने सांगितले पाहिजे, असे सांगून तुमच्या दारात उघड्या पायांनी आलेल्या शेतकऱ्यांना तुम्ही का भेटला नाही, त्यांची दु:खे का समजून घेतली नाहीत, असा प्रश्न प्रियांका यांनी विचारला.
मोदी सरकारला लोकशाहीबद्दल ना अभिमान आहे, ना जनतेबद्दल.ते खरे राष्ट्रवादी असते तर त्यांनी सत्याचा मार्ग स्वीकारला असता, अशी टीकाही त्यांनी केली. ज्यांनी ज्यांनी हक्क व अधिकार मागितला, त्यांना मारहाण केली गेली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्यांना देशद्रोही ठरवण्यात आले. काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही अनेक मोठ्या योजना कार्यान्वित करु, ज्याचा जनतेला फायदा होईल. काँॅग्रेसने नेहमी जनतेचाच फायदा पाहिला, त्यांना वाचवले आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी