शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

भावगीताला डिस्कोचे संगीत, आंब्याच्या झाडाला लिंबू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 06:51 IST

भाजपमध्ये पक्षाच्या नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. वादग्रस्त वक्तव्ये सुरूच आहेत. कोणीही कोरसमध्ये गात नाही. त्यामुळे संगीतही बेसूर झाले आहे.

- यदु जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमतविधान परिषद निवडणुकीत भाजपने सपाटून मार खाल्ला. तिकिटे नेत्यांनी वाटली की वाटून घेतली हा प्रश्नच आहे. नागपूर, पुण्याची जहागिरी वाटून घेण्याच्या नादात इलेक्टिव्ह मेरीट असलेले उमेदवार दिले गेले नाहीत. ते दिले असते तर चित्र वेगळे राहिले असते. गोविंदाचे एक गाणे होते, मै चाहे ये करू, चाहे वो करू, मेरी मर्जी.. भाजपमध्ये सध्या तसे चालले आहे. पक्षातील नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला दिसत आहेत. कोरसमध्ये कोणीही गात नाही. भावगीताला डिस्कोचे संगीत दिले तर ते बेसूर होणारच. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे वादग्रस्त विधाने करण्याचे थांबलेले नाहीत. रामदास कदम यांनी एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोकाची टीका केली. त्यावेळी कदम हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात होते. 

कल्याणच्या सभेत फडणविसांनी सुनावले,  'भाई तुमचा पगार किती अन‌् तुम्ही बोलता किती?'. भाजपमधील काही नेत्यांनादेखील हे सांगण्याची आवश्यकता आहे. आपण एकटेच बोलण्यात प्रवीण आहोत असे दरेकरांना वाटते, पण त्यांच्यामुळे पक्षाला किती फायदा झाला याचा अभ्यास केला पाहिजे. सुमार नेत्यांची सद्दी संपली पाहिजे किंवा त्यांना आवर तरी घातला पाहिजे. प्रसाद लाड यांच्यासारखी माणसे भाजपचं तत्वज्ञान सांगू लागतात तेव्हा आंब्याच्या झाडाला लिंबू लागल्यासारखे वाटते.विधानपरिषद निवडणुकीत भाजपमध्ये जे काही अंतर्गत वाद, एकमेकांना फटाके लावणे, राजीनाराजी असे प्रकार घडले त्याचा हिशेब केला तर आत्मचिंतनाला भरपूर संधी आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची परवा जयंती झाली. भटाब्राह्मणांचा पक्ष ओबीसीपर्यंत नेणारा हा नेता होता. मुंडे-महाजन हे सत्तेशिवाय मोठे होते. सत्तेत कोणीही मोठे असते. ती गेल्यानंतरही मोठेपण, दबदबा, दरारा तसाच कायम राहिला तर ते नेतृत्वाचे खरे यश असते. भाजपमध्ये फडणवीस, मुनगंटीवार, पंकजा मुंडे असे ताकदीचे नेते आहेत, पण एकीचा आणि संवादाचा अभाव दिसतो. भाजपचे १०५ आमदार आहेत. 
अनेक महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये आजही भारतीय जनात पक्षाची सत्ता आहे. पक्षाचे केंद्रात सरकार आहे. फडणवीस यांच्यासारखा हेडऑन घेऊ शकणारा नेता आहे. संपूर्ण विरोधी पक्षाची स्पेस आज भाजपकडे आहे, असे असूनसुद्धा भाजप विरोधी पक्षाच्या मन:स्थितीत पूर्णतः गेलेला दिसत नाही. ऑपरेशन लोटस हा शब्द आतापर्यंत खूप वेळा वापरला गेला आहे. महाराष्ट्रात 'ऑपरेशन विदिन लोटस' करण्याची गरज आहे हे निश्चीत.
ग्रामपंचायत निवडणुकीतही महाविकास आघाडी एकत्र!विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध सत्तेतील तिन्ही पक्ष ही लढत झाली आणि त्यात महाविकास आघाडीने बाजी मारली. आता राज्यातील १४२५८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीतही अशीच लढत राहिली तर ॲडव्हान्टेज महाविकास आघाडी असेल. भाजपची कसोटी लागेल. ग्रामीण महाराष्ट्रावर पकड कोणाची याचा फैसला यानिमित्ताने होणार आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेला अमरावतीत दगाफटका झाला. ग्रामपंचायत निवडणुकीत होऊ नये म्हणून काळजी घेतली जाईल असे दिसते.पवारसाहेब, शंकरबाबा, अनिल देशमुखांचे कन्यादानअमरावती जिल्ह्याच्या वझ्झरमध्ये शंकरबाबा पापळकर नावाचा एक अवलिया राहतो.  अनेक अनाथ मुलामुलींची लग्न त्यांनी लावून दिली. त्यांच्या २४ व्या मानसकन्येचा म्हणजे अनाथ वर्षा या तरुणीचा विवाह त्यांच्याच संस्थेतील समीर या अनाथ तरुणाशी २० डिसेंबरला नागपुरात होणार आहे. या समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे राज्याचे गृहमंत्री आणि देशमुख आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आरती देशमुख वर्षाचे कन्यादान करणार आहेत. अनिल देशमुख यांच्या घरी हे लग्न होणार आहे. शंकरबाबांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चार दिवसांपूर्वी मुंबईत आपल्या घरी बोलावले. अनिलबाबू त्यांना घेऊन गेले. पवार साहेबांनी तासभर चर्चा, विचारपूस केली. अनाथांचे प्रश्न, त्यांच्या व्यथा त्यांनी शंकरबाबांकडून ऐकून घेतल्या. तुमच्या संस्थेत नक्की येईन असे ते म्हणाले. संत गाडगेबाबांची परंपरा आपल्या लोकसेवेतून चालविणारे शंकरबाबा भारावून गेले.yadu.joshi@lokmat.com

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलpravin darekarप्रवीण दरेकरPankaja Mundeपंकजा मुंडेSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपा