शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

नितीशकुमार राहणार नाहीत फार काळ मुख्यमंत्री : राजद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 05:15 IST

रालोआने विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार केले आहेत. रालोआ आणि महाआघाडी यांच्यात फार कमी जागांचे अंतर आहे.

पाटणा : नितीशकुमार यांची रालोआने मुख्यमंत्रीपदी फेरनिवड केली असली तरी ते या पदावर फार काळ राहणार नाहीत, असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा यांनी केला आहे. जनतेने नितीश यांच्याविरोधात कौल दिला असून, ते तो पायदळी तुडवत असल्याची टीकाही झा यांनी केली. 

रालोआने विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार केले आहेत. रालोआ आणि महाआघाडी यांच्यात फार कमी जागांचे अंतर आहे. असे असताना ४० आमदार असलेल्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी बसविण्यात येत असल्याचे झा म्हणाले. नितीश यांना लोकांनी नाकारले आहे. लोकांच्या इच्छेचा त्यांनी मान राखायला हवा. तरीही ते हट्टाने मुख्यमंत्रीपदाला चिकटून राहिले असल्याचे झा म्हणाले. नितीशकुमार फार काळ मुख्यमंत्रिपदी राहणार नाहीत, असा दावाही त्यांनी अखेरीस केला.

सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मानबिहारमधील कुर्मी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नितीशकुमार चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. बिहारमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मान आता त्यांच्याकडे जाणार आहे. यापूर्वी हा बहुमान श्रीकृष्ण सिन्हा यांच्याकडे होता.समाजवादी नेते म्हणून ओळख असलेल्या नितीशकुमार यांना त्यांच्या राजकीय जीवन प्रवासात जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया, श्रीकृष्ण सिन्हा, कर्पुरी ठाकूर आणि विश्वनाथ प्रतापसिंह यांच्यासारख्या राजकीय दिग्गजांचा सहवास लाभला. जयप्रकाश नारायण यांच्या जनआंदोलनात नितीशकुमार सहभागी झाले होते.  अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या नितीशकुमार यांनी काही काळ बिहार वीज मंडळात नोकरीही केली; परंतु तिथे ते फारसे रमले नाहीत. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक