शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

कुणबीसेनेच्या भूमिकेने राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 01:10 IST

कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेला पाठिंबा देत आगामी विधानसभेसाठी नवी खेळी खेळल्याचे चित्र दिसत आहे.

- जनार्दन भेरे भातसानगर : कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेला पाठिंबा देत आगामी विधानसभेसाठी नवी खेळी खेळल्याचे चित्र दिसत आहे. या खेळीमुळे भविष्यात राष्ट्रवादीसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या शहापूर विधानसभा मतदारसंघात कधी शिवसेना, तर कधी राष्ट्रवादीचे प्राबल्य दिसून येते. गेल्या २५ वर्षांचा इतिहास पाहता, या मतदारसंघात तीनवेळा शिवसेनेचे दौलत दरोडा, एकवेळा कै. महादू बरोरा निवडून आले.सध्या राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. गेल्या आठवड्यात कुणबीसेनेच्या सभेत पांडुरंग बरोरा यांनी व्यासपीठावर उपस्थिती लावून, भविष्यातील राजकीय समीकरणांचे संकेत दिले. काँग्रेसने सुरेश टावरे यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केलेली असतानाही हा प्रकार घडला होता. त्यामुळे नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यानच्या काळात कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी सहा कलमी कार्यक्र मास मुख्यमंत्र्यांचा होकार घेऊन महायुतीला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली आहे.शहापूर विधानसभा मतदारसंघ हा कुणबीबहुल मतदारसंघ आहे. कुणबीसेना स्थापन झाल्यापासून आजपर्यंत या मतदारसंघातील मतदार कुणबीसेनेबरोबर उभे राहिलेत. त्यांनी अनेकदा सेनेलाच पाठिंबा दिला.२०१४ मध्ये भिवंडी लोकसभेसाठी शहापूर विधानसभेतून एकूण दोन लाख ३० हजार २५९ मतदानापैकी एक लाख ४२ हजार ५५६ मतदान झाले. त्यापैकी भाजपचे कपिल पाटील यांना ५३ हजार २७०, काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना ४९ हजार ८०९, तर मनसेने तिसऱ्या क्र मांकाची २२ हजार ४४२ मते मिळवली होती. कुणबीसेनेचा जोर पाहता, विश्वनाथ पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी देऊनही ते शहापुरात आघाडी घेऊ शकले नाही. या मतदारसंघात कपिल पाटील यांनी तीन हजार ४६१ ची आघाडी घेऊन विजय मिळवला. तो कदाचित मोदीलाटेचा परिणाम होता. कारण, त्यानंतर लगेचच झालेल्या शहापूर विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार पांडुरंग बरोरा हे ५४४४ मतांनी विजयी झाले. त्यावेळी भाजप-शिवसेना युती नसल्याने भाजपचे अशोक इरनक यांना तिसºया क्र मांकाची १८ हजार २२२, तर शिवसेनेचे दौलत दरोडा यांना ५१ हजार १७४ मते मिळाली होती. पांडुरंग बरोरा हे ५६ हजार ७०२ मते घेऊन विजयी झाले होते.सद्य:स्थितीत या विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे येथील मतदार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. तालुक्यातील शहापूर नगरपंचायतीवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे. १७ सदस्यीय या नगरपंचायतीत शिवसेनेचे ११, तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी तीन नगरसेवक आहेत; मात्र नगरपंचायतीच्या सत्तेमध्ये शिवसेनेने भाजपला बाजूला सारण्याचा सतत प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा जाधव या शिवसेनेच्या, तर उपाध्यक्ष सुभाष पवार हे राष्ट्रवादीचे आहेत. शहापूर पंचायत समितीमध्येही हीच परंपरा कायम ठेवण्यात आली आहे.>कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम : भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारसभेच्या वेळी शिवसैनिकांच्या रोषाला पालकमंत्र्यांसह सर्वांना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आयात उमेदवार नको, असा ठराव मंजूर करून तो शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवल्याने आयारामांची गोची झाली. एकूणच प्रकारामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते गोंधळून गेले आहेत.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणbhiwandi-pcभिवंडीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019