शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कुणबीसेनेच्या भूमिकेने राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 01:10 IST

कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेला पाठिंबा देत आगामी विधानसभेसाठी नवी खेळी खेळल्याचे चित्र दिसत आहे.

- जनार्दन भेरे भातसानगर : कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेला पाठिंबा देत आगामी विधानसभेसाठी नवी खेळी खेळल्याचे चित्र दिसत आहे. या खेळीमुळे भविष्यात राष्ट्रवादीसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या शहापूर विधानसभा मतदारसंघात कधी शिवसेना, तर कधी राष्ट्रवादीचे प्राबल्य दिसून येते. गेल्या २५ वर्षांचा इतिहास पाहता, या मतदारसंघात तीनवेळा शिवसेनेचे दौलत दरोडा, एकवेळा कै. महादू बरोरा निवडून आले.सध्या राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. गेल्या आठवड्यात कुणबीसेनेच्या सभेत पांडुरंग बरोरा यांनी व्यासपीठावर उपस्थिती लावून, भविष्यातील राजकीय समीकरणांचे संकेत दिले. काँग्रेसने सुरेश टावरे यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केलेली असतानाही हा प्रकार घडला होता. त्यामुळे नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यानच्या काळात कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी सहा कलमी कार्यक्र मास मुख्यमंत्र्यांचा होकार घेऊन महायुतीला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली आहे.शहापूर विधानसभा मतदारसंघ हा कुणबीबहुल मतदारसंघ आहे. कुणबीसेना स्थापन झाल्यापासून आजपर्यंत या मतदारसंघातील मतदार कुणबीसेनेबरोबर उभे राहिलेत. त्यांनी अनेकदा सेनेलाच पाठिंबा दिला.२०१४ मध्ये भिवंडी लोकसभेसाठी शहापूर विधानसभेतून एकूण दोन लाख ३० हजार २५९ मतदानापैकी एक लाख ४२ हजार ५५६ मतदान झाले. त्यापैकी भाजपचे कपिल पाटील यांना ५३ हजार २७०, काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना ४९ हजार ८०९, तर मनसेने तिसऱ्या क्र मांकाची २२ हजार ४४२ मते मिळवली होती. कुणबीसेनेचा जोर पाहता, विश्वनाथ पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी देऊनही ते शहापुरात आघाडी घेऊ शकले नाही. या मतदारसंघात कपिल पाटील यांनी तीन हजार ४६१ ची आघाडी घेऊन विजय मिळवला. तो कदाचित मोदीलाटेचा परिणाम होता. कारण, त्यानंतर लगेचच झालेल्या शहापूर विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार पांडुरंग बरोरा हे ५४४४ मतांनी विजयी झाले. त्यावेळी भाजप-शिवसेना युती नसल्याने भाजपचे अशोक इरनक यांना तिसºया क्र मांकाची १८ हजार २२२, तर शिवसेनेचे दौलत दरोडा यांना ५१ हजार १७४ मते मिळाली होती. पांडुरंग बरोरा हे ५६ हजार ७०२ मते घेऊन विजयी झाले होते.सद्य:स्थितीत या विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे येथील मतदार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. तालुक्यातील शहापूर नगरपंचायतीवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे. १७ सदस्यीय या नगरपंचायतीत शिवसेनेचे ११, तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी तीन नगरसेवक आहेत; मात्र नगरपंचायतीच्या सत्तेमध्ये शिवसेनेने भाजपला बाजूला सारण्याचा सतत प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा जाधव या शिवसेनेच्या, तर उपाध्यक्ष सुभाष पवार हे राष्ट्रवादीचे आहेत. शहापूर पंचायत समितीमध्येही हीच परंपरा कायम ठेवण्यात आली आहे.>कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम : भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारसभेच्या वेळी शिवसैनिकांच्या रोषाला पालकमंत्र्यांसह सर्वांना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आयात उमेदवार नको, असा ठराव मंजूर करून तो शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवल्याने आयारामांची गोची झाली. एकूणच प्रकारामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते गोंधळून गेले आहेत.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणbhiwandi-pcभिवंडीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019