शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कुणबीसेनेच्या भूमिकेने राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 01:10 IST

कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेला पाठिंबा देत आगामी विधानसभेसाठी नवी खेळी खेळल्याचे चित्र दिसत आहे.

- जनार्दन भेरे भातसानगर : कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेला पाठिंबा देत आगामी विधानसभेसाठी नवी खेळी खेळल्याचे चित्र दिसत आहे. या खेळीमुळे भविष्यात राष्ट्रवादीसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या शहापूर विधानसभा मतदारसंघात कधी शिवसेना, तर कधी राष्ट्रवादीचे प्राबल्य दिसून येते. गेल्या २५ वर्षांचा इतिहास पाहता, या मतदारसंघात तीनवेळा शिवसेनेचे दौलत दरोडा, एकवेळा कै. महादू बरोरा निवडून आले.सध्या राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. गेल्या आठवड्यात कुणबीसेनेच्या सभेत पांडुरंग बरोरा यांनी व्यासपीठावर उपस्थिती लावून, भविष्यातील राजकीय समीकरणांचे संकेत दिले. काँग्रेसने सुरेश टावरे यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केलेली असतानाही हा प्रकार घडला होता. त्यामुळे नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यानच्या काळात कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी सहा कलमी कार्यक्र मास मुख्यमंत्र्यांचा होकार घेऊन महायुतीला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली आहे.शहापूर विधानसभा मतदारसंघ हा कुणबीबहुल मतदारसंघ आहे. कुणबीसेना स्थापन झाल्यापासून आजपर्यंत या मतदारसंघातील मतदार कुणबीसेनेबरोबर उभे राहिलेत. त्यांनी अनेकदा सेनेलाच पाठिंबा दिला.२०१४ मध्ये भिवंडी लोकसभेसाठी शहापूर विधानसभेतून एकूण दोन लाख ३० हजार २५९ मतदानापैकी एक लाख ४२ हजार ५५६ मतदान झाले. त्यापैकी भाजपचे कपिल पाटील यांना ५३ हजार २७०, काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना ४९ हजार ८०९, तर मनसेने तिसऱ्या क्र मांकाची २२ हजार ४४२ मते मिळवली होती. कुणबीसेनेचा जोर पाहता, विश्वनाथ पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी देऊनही ते शहापुरात आघाडी घेऊ शकले नाही. या मतदारसंघात कपिल पाटील यांनी तीन हजार ४६१ ची आघाडी घेऊन विजय मिळवला. तो कदाचित मोदीलाटेचा परिणाम होता. कारण, त्यानंतर लगेचच झालेल्या शहापूर विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार पांडुरंग बरोरा हे ५४४४ मतांनी विजयी झाले. त्यावेळी भाजप-शिवसेना युती नसल्याने भाजपचे अशोक इरनक यांना तिसºया क्र मांकाची १८ हजार २२२, तर शिवसेनेचे दौलत दरोडा यांना ५१ हजार १७४ मते मिळाली होती. पांडुरंग बरोरा हे ५६ हजार ७०२ मते घेऊन विजयी झाले होते.सद्य:स्थितीत या विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे येथील मतदार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. तालुक्यातील शहापूर नगरपंचायतीवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे. १७ सदस्यीय या नगरपंचायतीत शिवसेनेचे ११, तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी तीन नगरसेवक आहेत; मात्र नगरपंचायतीच्या सत्तेमध्ये शिवसेनेने भाजपला बाजूला सारण्याचा सतत प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा जाधव या शिवसेनेच्या, तर उपाध्यक्ष सुभाष पवार हे राष्ट्रवादीचे आहेत. शहापूर पंचायत समितीमध्येही हीच परंपरा कायम ठेवण्यात आली आहे.>कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम : भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारसभेच्या वेळी शिवसैनिकांच्या रोषाला पालकमंत्र्यांसह सर्वांना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आयात उमेदवार नको, असा ठराव मंजूर करून तो शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवल्याने आयारामांची गोची झाली. एकूणच प्रकारामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते गोंधळून गेले आहेत.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणbhiwandi-pcभिवंडीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019