शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

कुणबीसेनेच्या भूमिकेने राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 01:10 IST

कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेला पाठिंबा देत आगामी विधानसभेसाठी नवी खेळी खेळल्याचे चित्र दिसत आहे.

- जनार्दन भेरे भातसानगर : कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेला पाठिंबा देत आगामी विधानसभेसाठी नवी खेळी खेळल्याचे चित्र दिसत आहे. या खेळीमुळे भविष्यात राष्ट्रवादीसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या शहापूर विधानसभा मतदारसंघात कधी शिवसेना, तर कधी राष्ट्रवादीचे प्राबल्य दिसून येते. गेल्या २५ वर्षांचा इतिहास पाहता, या मतदारसंघात तीनवेळा शिवसेनेचे दौलत दरोडा, एकवेळा कै. महादू बरोरा निवडून आले.सध्या राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. गेल्या आठवड्यात कुणबीसेनेच्या सभेत पांडुरंग बरोरा यांनी व्यासपीठावर उपस्थिती लावून, भविष्यातील राजकीय समीकरणांचे संकेत दिले. काँग्रेसने सुरेश टावरे यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केलेली असतानाही हा प्रकार घडला होता. त्यामुळे नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यानच्या काळात कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी सहा कलमी कार्यक्र मास मुख्यमंत्र्यांचा होकार घेऊन महायुतीला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली आहे.शहापूर विधानसभा मतदारसंघ हा कुणबीबहुल मतदारसंघ आहे. कुणबीसेना स्थापन झाल्यापासून आजपर्यंत या मतदारसंघातील मतदार कुणबीसेनेबरोबर उभे राहिलेत. त्यांनी अनेकदा सेनेलाच पाठिंबा दिला.२०१४ मध्ये भिवंडी लोकसभेसाठी शहापूर विधानसभेतून एकूण दोन लाख ३० हजार २५९ मतदानापैकी एक लाख ४२ हजार ५५६ मतदान झाले. त्यापैकी भाजपचे कपिल पाटील यांना ५३ हजार २७०, काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना ४९ हजार ८०९, तर मनसेने तिसऱ्या क्र मांकाची २२ हजार ४४२ मते मिळवली होती. कुणबीसेनेचा जोर पाहता, विश्वनाथ पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी देऊनही ते शहापुरात आघाडी घेऊ शकले नाही. या मतदारसंघात कपिल पाटील यांनी तीन हजार ४६१ ची आघाडी घेऊन विजय मिळवला. तो कदाचित मोदीलाटेचा परिणाम होता. कारण, त्यानंतर लगेचच झालेल्या शहापूर विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार पांडुरंग बरोरा हे ५४४४ मतांनी विजयी झाले. त्यावेळी भाजप-शिवसेना युती नसल्याने भाजपचे अशोक इरनक यांना तिसºया क्र मांकाची १८ हजार २२२, तर शिवसेनेचे दौलत दरोडा यांना ५१ हजार १७४ मते मिळाली होती. पांडुरंग बरोरा हे ५६ हजार ७०२ मते घेऊन विजयी झाले होते.सद्य:स्थितीत या विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे येथील मतदार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. तालुक्यातील शहापूर नगरपंचायतीवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे. १७ सदस्यीय या नगरपंचायतीत शिवसेनेचे ११, तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी तीन नगरसेवक आहेत; मात्र नगरपंचायतीच्या सत्तेमध्ये शिवसेनेने भाजपला बाजूला सारण्याचा सतत प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा जाधव या शिवसेनेच्या, तर उपाध्यक्ष सुभाष पवार हे राष्ट्रवादीचे आहेत. शहापूर पंचायत समितीमध्येही हीच परंपरा कायम ठेवण्यात आली आहे.>कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम : भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारसभेच्या वेळी शिवसैनिकांच्या रोषाला पालकमंत्र्यांसह सर्वांना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आयात उमेदवार नको, असा ठराव मंजूर करून तो शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवल्याने आयारामांची गोची झाली. एकूणच प्रकारामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते गोंधळून गेले आहेत.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणbhiwandi-pcभिवंडीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019