शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंपाठोपाठ राज्यातील आणखी एका खासदाराचं अमित शहांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 19:19 IST

Navneet Rana demands president rule in Maharashtra: खासदार नवनीत कौर राणा यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांच्यानंतर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. त्यांनी या पत्रात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा आणि मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा उल्लेख केला आहे. (mp navneet rana demands president rule in Maharashtra)मुकेश अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली. त्यानंतर कारचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत ठाण्यातल्या रेतीबंदर परिसरात आढळून आला. या सगळ्या घटनाक्रमाचा उल्लेख राणा यांनी पत्रात केला आहे. 'अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. ही कार मनसुख हिरेन यांची होती. ही कार चोरीला गेल्याची तक्रारही त्यांनी पोलीस ठाण्यात केली होती. तीच कार अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्यासह सापडली होती,' असं राणा यांनी पत्रात लिहिलं आहे.या संपूर्ण प्रकरणात हिरेन यांची चौकशी करण्यात आली होती. ते चौकशीला सहकार्य करत होते. त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात होती. त्याबाबत हिरेन यांनी ठाकरे सरकारकडे तक्रारही केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणीदेखील केली होती. मात्र त्यानंतर हिरेन यांचा मृत्यू झाला, असा संपूर्ण घटनाक्रम नवनीत राणा यांनी पत्रात नमूद केला आहे.

राज्यात सगळेच असुरक्षित; राष्ट्रपती राजवट लागू कराअंबानी हे देशातील मोठे उद्योगपती आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांचं योगदान मोठं आहे. देशातील हजारो तरुणांना ते रोजगार देतात. एवढ्या मोठ्या उद्योगपतीला धमकी मिळते. त्यावरून उद्योगपतींसह सामान्य लोकांचं रक्षण करण्यास ठाकरे सरकार अपयशी ठरत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास एनआयएकडे द्यावा आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राणा यांनी केली आहे.  

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाNarayan Raneनारायण राणे Mansukh Hirenमनसुख हिरणMukesh Ambaniमुकेश अंबानी