शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Modi Cabinet News: ३ मंत्रिपदे मागितलेली, मोदींनी एकच दिले; नितीश कुमार तरीही खूश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 09:20 IST

Narendra Modi Cabinet Reshuffle: नितीश कुमार स्वत:च सांगतात, जेव्हा ते पुड्या बांधून फेकतात तेव्हा त्या उघडत नाहीत. मग त्यांनी २०१९ मध्ये एक मंत्रिपद मिळत असल्याने नाराजी व्यक्त करून मोदी सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. मात्र, तेच सांकेतिक पद त्यांना दोन वर्षांनी मान्य झाले आहे, यामागे मोठे कारण आहे. 

Cabinet expansion: नवी दिल्ली: बिहार निवडणुकीत कमी जागा निवडून आल्या तरीदेखील नितीश कुमार (Nitish Kumar) यांना भाजपाने मुख्यमंत्री पदी ठेवले होते. बिहारमध्ये (Bihar Politics) तापलेले कुरघोडीचे वातावरण शमले आहे. परंतू, कालच्या मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्येनितीश कुमार सहभागी होणार की नाही यावरून संभ्रम होता. कारण नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदींकडे (PM Narendra Modi) तीन मंत्रिपदे देण्याची अट ठेवली होती. मात्र, मोदींनी त्यांना एकावरच समाधान मानायला लावले आहे. तरीदेखील नितीश कुमार नाराज नाही तर खूश असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Nitish kumar's party JDU got 1 minister post in modi cabinet expansion, they want 3.)

Cabinet reshuffle: मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाची आज मोठी बैठक; मंत्रीदेखील पदभार स्वीकारणार

नितीश कुमार स्वत:च सांगतात, जेव्हा ते पुड्या बांधून फेकतात तेव्हा त्या उघडत नाहीत. मग त्यांनी २०१९ मध्ये एक मंत्रिपद मिळत असल्याने नाराजी व्यक्त करून मोदी सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. मात्र, तेच सांकेतिक पद त्यांना दोन वर्षांनी मान्य झाले आहे, यामागे मोठे कारण आहे. 

मोदी सरकारच्या कॅबिनेट विस्तारानंतर नितीश कुमारांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे. नितीश यांनी चिराग पासवानला दुसरा झटका देण्यासाठी दोन मंत्रिपदांचा बळी दिल्याचे म्हटले जात आहे. पशुपति पारस यांना केंद्र सरकारमध्ये सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हाच नितीश यांनी चिराग पासवानना पहिला झटका दिला होता. 

Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात 38 नवे चेहरे; नारायण राणे कॅबिनेट मंत्री; भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार राज्यमंत्री

पारस यांना केंद्र सरकारमध्ये सहभागी करण्याचा सरळ अर्थ असा होता की, भाजपाने पारस यांच्या नेतृत्वातील एलजेपीला स्वीकारले आहे. नितीश कुमारांनादेखील हेच हवे होते. बिहार विधानसभा निवडणुकीत चिरागमुळे नितीश कुमारांना २० जागा गमवाव्या लागल्या होत्या. याचा बदला त्यांना घ्यायचा होता. मात्र, चिराग पंतप्रधान मोदींचा हनुमान म्हणत त्याची ढाल बनवून नितीश कुमारांसमोर उभे ठाकत होते. यामुळे पारस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणे हा नितीश कुमार यांचाच विजय मानला जात आहे. 

हार के भी जीत....एक फिल्मी डायलॉग आहे, 'हार कर जीतने वाले को ही बाजीगर कहते हैं'. चिराग पासवानला दोन झटके देण्यासाठी नितीश कुमारांनी दोन मंत्रिपदांवर पाणी सोडले. हरूनही जिंकल्याची भावना आता नितीश कुमारांच्या गोटात आहे. 

२५ राज्यांना मिळाले प्रतिनिधीत्वकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात २५ राज्यांना प्रतिनिधीत्व मिळाले आहे. ज्या पंधरा कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यांच्यात आठ नवे चेहरे असून सात जणांना बढती मिळाली आहे.

आता भाजप संघटनेतही होणार मोठे बदल; जावडेकरांसह 'या' नेत्यांना मिळू शकते मोठी जबाबदारी

१२ मंत्र्यांचे राजीनामेकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या काही तास आधी केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे मंंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद या मंत्र्यांसह १२ केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामध्ये शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, संतोषकुमार गंगवार, देबश्री चौधरी, रतनलाल कटारिया, संजय धोत्रे, थावरचंद गेहलोत, डी. व्ही. सदानंद गौडा, प्रतापचंद्र सारंगी, आदींचीही नावे आहेत.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार