शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

Modi Cabinet News: ३ मंत्रिपदे मागितलेली, मोदींनी एकच दिले; नितीश कुमार तरीही खूश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 09:20 IST

Narendra Modi Cabinet Reshuffle: नितीश कुमार स्वत:च सांगतात, जेव्हा ते पुड्या बांधून फेकतात तेव्हा त्या उघडत नाहीत. मग त्यांनी २०१९ मध्ये एक मंत्रिपद मिळत असल्याने नाराजी व्यक्त करून मोदी सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. मात्र, तेच सांकेतिक पद त्यांना दोन वर्षांनी मान्य झाले आहे, यामागे मोठे कारण आहे. 

Cabinet expansion: नवी दिल्ली: बिहार निवडणुकीत कमी जागा निवडून आल्या तरीदेखील नितीश कुमार (Nitish Kumar) यांना भाजपाने मुख्यमंत्री पदी ठेवले होते. बिहारमध्ये (Bihar Politics) तापलेले कुरघोडीचे वातावरण शमले आहे. परंतू, कालच्या मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्येनितीश कुमार सहभागी होणार की नाही यावरून संभ्रम होता. कारण नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदींकडे (PM Narendra Modi) तीन मंत्रिपदे देण्याची अट ठेवली होती. मात्र, मोदींनी त्यांना एकावरच समाधान मानायला लावले आहे. तरीदेखील नितीश कुमार नाराज नाही तर खूश असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Nitish kumar's party JDU got 1 minister post in modi cabinet expansion, they want 3.)

Cabinet reshuffle: मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाची आज मोठी बैठक; मंत्रीदेखील पदभार स्वीकारणार

नितीश कुमार स्वत:च सांगतात, जेव्हा ते पुड्या बांधून फेकतात तेव्हा त्या उघडत नाहीत. मग त्यांनी २०१९ मध्ये एक मंत्रिपद मिळत असल्याने नाराजी व्यक्त करून मोदी सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. मात्र, तेच सांकेतिक पद त्यांना दोन वर्षांनी मान्य झाले आहे, यामागे मोठे कारण आहे. 

मोदी सरकारच्या कॅबिनेट विस्तारानंतर नितीश कुमारांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे. नितीश यांनी चिराग पासवानला दुसरा झटका देण्यासाठी दोन मंत्रिपदांचा बळी दिल्याचे म्हटले जात आहे. पशुपति पारस यांना केंद्र सरकारमध्ये सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हाच नितीश यांनी चिराग पासवानना पहिला झटका दिला होता. 

Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात 38 नवे चेहरे; नारायण राणे कॅबिनेट मंत्री; भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार राज्यमंत्री

पारस यांना केंद्र सरकारमध्ये सहभागी करण्याचा सरळ अर्थ असा होता की, भाजपाने पारस यांच्या नेतृत्वातील एलजेपीला स्वीकारले आहे. नितीश कुमारांनादेखील हेच हवे होते. बिहार विधानसभा निवडणुकीत चिरागमुळे नितीश कुमारांना २० जागा गमवाव्या लागल्या होत्या. याचा बदला त्यांना घ्यायचा होता. मात्र, चिराग पंतप्रधान मोदींचा हनुमान म्हणत त्याची ढाल बनवून नितीश कुमारांसमोर उभे ठाकत होते. यामुळे पारस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणे हा नितीश कुमार यांचाच विजय मानला जात आहे. 

हार के भी जीत....एक फिल्मी डायलॉग आहे, 'हार कर जीतने वाले को ही बाजीगर कहते हैं'. चिराग पासवानला दोन झटके देण्यासाठी नितीश कुमारांनी दोन मंत्रिपदांवर पाणी सोडले. हरूनही जिंकल्याची भावना आता नितीश कुमारांच्या गोटात आहे. 

२५ राज्यांना मिळाले प्रतिनिधीत्वकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात २५ राज्यांना प्रतिनिधीत्व मिळाले आहे. ज्या पंधरा कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यांच्यात आठ नवे चेहरे असून सात जणांना बढती मिळाली आहे.

आता भाजप संघटनेतही होणार मोठे बदल; जावडेकरांसह 'या' नेत्यांना मिळू शकते मोठी जबाबदारी

१२ मंत्र्यांचे राजीनामेकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या काही तास आधी केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे मंंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद या मंत्र्यांसह १२ केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामध्ये शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, संतोषकुमार गंगवार, देबश्री चौधरी, रतनलाल कटारिया, संजय धोत्रे, थावरचंद गेहलोत, डी. व्ही. सदानंद गौडा, प्रतापचंद्र सारंगी, आदींचीही नावे आहेत.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार