शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

घराणेशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जाईल- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 11:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा ब्लॉग लिहिला आहे. या ब्लॉगमध्ये त्यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा ब्लॉग लिहिला आहे. या ब्लॉगमध्ये त्यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी लिहितात, आमच्या सरकारनं कौटुंबिकतंत्रापेक्षा प्रामाणिकपणाला निवडलं. संसद, संविधान, सरकारी संस्थान, सेना आदीचा काँग्रेसच्या कार्यकाळात दुरुपयोग करण्यात आला. काँग्रेसनं लष्कराला नेहमीच कमाईचं साधन समजलं.  2014मध्ये जनतेनं भ्रष्टाचारातून मुक्ती मिळवण्यासह चांगल्या भविष्यासाठी मतदान केलं.एनडीए सरकार ‘Family First’ ऐवजी ‘India First’ या भावनेनं काम करतं. काँग्रेसवर मोदींनी वंशवादाचा आरोप केला आहे. काँग्रेसनं देशाच्या संस्थांना कमकुवत केलं आहे. मोदींनी यावेळी जनतेसाठी राबवलेल्या योजनांचाही उल्लेख केला आहे. मोदी म्हणाले, स्वच्छता 2014मध्ये फक्त 38 टक्के होती, पण आता ती वाढून 98 टक्के झाली आहे. तसेच थेट फायदा, कर्ज मिळण्याची सुलभ प्रक्रिया, पछाडलेल्या वर्गांसाठी चालवलेल्या योजनांचाही हवाला दिला आहे.आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करण्यात आली. एखादी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास थेट तुरुंगात टाकण्याचा कायदा काँग्रेसनं आणला होता, आणीबाणी लावून काँग्रेसनं संविधान आणि न्यायालयांचा अवमान केला होता. यूपीए सरकारनं सीबीआय, आयबी आणि रॉ सारख्या गुप्तचर संस्थांचा वेळोवेळी दुरुपयोग केला. मोदी यांनी योजना आयोगावरही टीका केली आङे. माजी पंतप्रधान राजीव गांधींनी योजना आयोगाला A bunch of jokers म्हणजेच जोकरांचा समूह असं म्हटलं होतं. त्यावेळी योजना आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. मनमोहन सिंग होते. काँग्रेस सरकार संस्थांबाबत काय विचार करते, हे यावरून स्पष्ट होत आहे.काँग्रेसनं लष्कराला नेहमीच कमाईचं एक साधन समजलं. त्यामुळेच जवानांना काँग्रेसनं कधीही सन्मान दिला नाही. ज्याचे ते पात्र आहेत. पुलवामा हल्ल्यावर मोदी म्हणतात, आमचं हवाई दल दहशतवाद्यांवर हल्ले करत आहेत, पण काँग्रेस त्यांच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. मोदींनी एकंदरीतच त्यांच्या ब्लॉगमधून काँग्रेसचे वाभाडे काढले आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक