शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

घराणेशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जाईल- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 11:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा ब्लॉग लिहिला आहे. या ब्लॉगमध्ये त्यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा ब्लॉग लिहिला आहे. या ब्लॉगमध्ये त्यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी लिहितात, आमच्या सरकारनं कौटुंबिकतंत्रापेक्षा प्रामाणिकपणाला निवडलं. संसद, संविधान, सरकारी संस्थान, सेना आदीचा काँग्रेसच्या कार्यकाळात दुरुपयोग करण्यात आला. काँग्रेसनं लष्कराला नेहमीच कमाईचं साधन समजलं.  2014मध्ये जनतेनं भ्रष्टाचारातून मुक्ती मिळवण्यासह चांगल्या भविष्यासाठी मतदान केलं.एनडीए सरकार ‘Family First’ ऐवजी ‘India First’ या भावनेनं काम करतं. काँग्रेसवर मोदींनी वंशवादाचा आरोप केला आहे. काँग्रेसनं देशाच्या संस्थांना कमकुवत केलं आहे. मोदींनी यावेळी जनतेसाठी राबवलेल्या योजनांचाही उल्लेख केला आहे. मोदी म्हणाले, स्वच्छता 2014मध्ये फक्त 38 टक्के होती, पण आता ती वाढून 98 टक्के झाली आहे. तसेच थेट फायदा, कर्ज मिळण्याची सुलभ प्रक्रिया, पछाडलेल्या वर्गांसाठी चालवलेल्या योजनांचाही हवाला दिला आहे.आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करण्यात आली. एखादी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास थेट तुरुंगात टाकण्याचा कायदा काँग्रेसनं आणला होता, आणीबाणी लावून काँग्रेसनं संविधान आणि न्यायालयांचा अवमान केला होता. यूपीए सरकारनं सीबीआय, आयबी आणि रॉ सारख्या गुप्तचर संस्थांचा वेळोवेळी दुरुपयोग केला. मोदी यांनी योजना आयोगावरही टीका केली आङे. माजी पंतप्रधान राजीव गांधींनी योजना आयोगाला A bunch of jokers म्हणजेच जोकरांचा समूह असं म्हटलं होतं. त्यावेळी योजना आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. मनमोहन सिंग होते. काँग्रेस सरकार संस्थांबाबत काय विचार करते, हे यावरून स्पष्ट होत आहे.काँग्रेसनं लष्कराला नेहमीच कमाईचं एक साधन समजलं. त्यामुळेच जवानांना काँग्रेसनं कधीही सन्मान दिला नाही. ज्याचे ते पात्र आहेत. पुलवामा हल्ल्यावर मोदी म्हणतात, आमचं हवाई दल दहशतवाद्यांवर हल्ले करत आहेत, पण काँग्रेस त्यांच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. मोदींनी एकंदरीतच त्यांच्या ब्लॉगमधून काँग्रेसचे वाभाडे काढले आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक