शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Narayan Rane: नारायण राणेंना अटक झाल्यास जनआशीर्वाद यात्रेचे काय होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 14:05 IST

Narayan Rane News: नारायण राणेंना अटक झाल्यास जनआशीर्वाद यात्रेचे काय होणार अशी विचारणा होत आहे. दरम्यान, या प्रश्नाचं उत्तर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहे.

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेले वक्तव्य आणि त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांना अटकेची कारवाई सुरू केल्याने राज्यात शिवसेना आणि भाजपामध्ये वाद पेटला आहे. एकीकडे शिवसैनिक नारायण राणेंविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनी राणेंच्या वक्तव्यापासून अंतर राखत नारायण राणे (Narayan Rane) यांच्यामागे ठामपण उभे राहणार असल्याचे स्पष्ट केली आहे. दरम्यान, नारायण राणेंना अटक झाल्यास जनआशीर्वाद यात्रेचे काय होणार अशी विचारणा होत आहे. दरम्यान, या प्रश्नाचं उत्तर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहे. (Narayan Rane: What will happen to Jana Aashirwad Yatra if Narayan Rane is arrested? Devendra Fadnavis clearly stated what he did)

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, नारायण राणेंच्या विधानाचं समर्थन करता येणार नाही. मात्र त्यांच्याविरोधात सरकार ज्याप्रकारे कारवाई करत आहे. त्याचंही समर्थन करता येणार नाही. भाजपा नारायण राणेंच्या वक्तव्याच्या मागे उभा नसला तरी पक्ष भाजपाच्या मागे उभा आहे. यावेळी नारायण राणेंना अटक झाल्यास जनआशीर्वाद यात्रेचा काय होणार, असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नारायण राणेंना अटक झाली म्हणून जनआशीर्वाद यात्रा थांबणार नाही. जनआशीर्वाद यात्रा सुरूच राहील. जनआशीर्वाद यात्रा रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, प्रवीण दरेकर या नेत्यांच्या उपस्थितीत पार पडेल.

यावेळी परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरजिल उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारतमातेला शिव्या देतो. त्याच्यावर कारवाई करण्याची तुमची हिंमत नाही. परंतु नारायण राणे यांना पकडण्यासाठी अख्खं पोलीस दल कामाला लावलं आहे. कायद्याच्या भाषेत नारायण राणेंनी कुठलाही गुन्हा केला नाही. पण त्याचं गुन्ह्यात जबरदस्ती रूपांतर करायचं? पोलीस आयुक्तांच्या पत्रात मुसक्या बांधा, हजर करा ते स्वत:ला समजतात काय? नारायण राणेंची बाजू ऐकून न घेता कलमं कशी लावली? पोलिसांचा गैरवापर केला जात आहे. पोलिसांबद्दल नितांत आदर आहे. निष्पक्ष पोलीस दल म्हणून महाराष्ट्र पोलिसांची ख्याती आहे. सरकारपुढे काहीजण लोटांगण घालत आहे. केवळ सरकारला खूश करण्यासाठी पोलीस दल कारवाई करायला लागलं तर महाराष्ट्राची प्रतिमा चांगली राहणार नाही असं त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे