शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane: नारायण राणेंना अटक झाल्यास जनआशीर्वाद यात्रेचे काय होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 14:05 IST

Narayan Rane News: नारायण राणेंना अटक झाल्यास जनआशीर्वाद यात्रेचे काय होणार अशी विचारणा होत आहे. दरम्यान, या प्रश्नाचं उत्तर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहे.

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेले वक्तव्य आणि त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांना अटकेची कारवाई सुरू केल्याने राज्यात शिवसेना आणि भाजपामध्ये वाद पेटला आहे. एकीकडे शिवसैनिक नारायण राणेंविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनी राणेंच्या वक्तव्यापासून अंतर राखत नारायण राणे (Narayan Rane) यांच्यामागे ठामपण उभे राहणार असल्याचे स्पष्ट केली आहे. दरम्यान, नारायण राणेंना अटक झाल्यास जनआशीर्वाद यात्रेचे काय होणार अशी विचारणा होत आहे. दरम्यान, या प्रश्नाचं उत्तर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहे. (Narayan Rane: What will happen to Jana Aashirwad Yatra if Narayan Rane is arrested? Devendra Fadnavis clearly stated what he did)

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, नारायण राणेंच्या विधानाचं समर्थन करता येणार नाही. मात्र त्यांच्याविरोधात सरकार ज्याप्रकारे कारवाई करत आहे. त्याचंही समर्थन करता येणार नाही. भाजपा नारायण राणेंच्या वक्तव्याच्या मागे उभा नसला तरी पक्ष भाजपाच्या मागे उभा आहे. यावेळी नारायण राणेंना अटक झाल्यास जनआशीर्वाद यात्रेचा काय होणार, असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नारायण राणेंना अटक झाली म्हणून जनआशीर्वाद यात्रा थांबणार नाही. जनआशीर्वाद यात्रा सुरूच राहील. जनआशीर्वाद यात्रा रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, प्रवीण दरेकर या नेत्यांच्या उपस्थितीत पार पडेल.

यावेळी परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरजिल उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारतमातेला शिव्या देतो. त्याच्यावर कारवाई करण्याची तुमची हिंमत नाही. परंतु नारायण राणे यांना पकडण्यासाठी अख्खं पोलीस दल कामाला लावलं आहे. कायद्याच्या भाषेत नारायण राणेंनी कुठलाही गुन्हा केला नाही. पण त्याचं गुन्ह्यात जबरदस्ती रूपांतर करायचं? पोलीस आयुक्तांच्या पत्रात मुसक्या बांधा, हजर करा ते स्वत:ला समजतात काय? नारायण राणेंची बाजू ऐकून न घेता कलमं कशी लावली? पोलिसांचा गैरवापर केला जात आहे. पोलिसांबद्दल नितांत आदर आहे. निष्पक्ष पोलीस दल म्हणून महाराष्ट्र पोलिसांची ख्याती आहे. सरकारपुढे काहीजण लोटांगण घालत आहे. केवळ सरकारला खूश करण्यासाठी पोलीस दल कारवाई करायला लागलं तर महाराष्ट्राची प्रतिमा चांगली राहणार नाही असं त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे