शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Narayan Rane: नारायण राणेंना अटक झाल्यास जनआशीर्वाद यात्रेचे काय होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 14:05 IST

Narayan Rane News: नारायण राणेंना अटक झाल्यास जनआशीर्वाद यात्रेचे काय होणार अशी विचारणा होत आहे. दरम्यान, या प्रश्नाचं उत्तर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहे.

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेले वक्तव्य आणि त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांना अटकेची कारवाई सुरू केल्याने राज्यात शिवसेना आणि भाजपामध्ये वाद पेटला आहे. एकीकडे शिवसैनिक नारायण राणेंविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनी राणेंच्या वक्तव्यापासून अंतर राखत नारायण राणे (Narayan Rane) यांच्यामागे ठामपण उभे राहणार असल्याचे स्पष्ट केली आहे. दरम्यान, नारायण राणेंना अटक झाल्यास जनआशीर्वाद यात्रेचे काय होणार अशी विचारणा होत आहे. दरम्यान, या प्रश्नाचं उत्तर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहे. (Narayan Rane: What will happen to Jana Aashirwad Yatra if Narayan Rane is arrested? Devendra Fadnavis clearly stated what he did)

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, नारायण राणेंच्या विधानाचं समर्थन करता येणार नाही. मात्र त्यांच्याविरोधात सरकार ज्याप्रकारे कारवाई करत आहे. त्याचंही समर्थन करता येणार नाही. भाजपा नारायण राणेंच्या वक्तव्याच्या मागे उभा नसला तरी पक्ष भाजपाच्या मागे उभा आहे. यावेळी नारायण राणेंना अटक झाल्यास जनआशीर्वाद यात्रेचा काय होणार, असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नारायण राणेंना अटक झाली म्हणून जनआशीर्वाद यात्रा थांबणार नाही. जनआशीर्वाद यात्रा सुरूच राहील. जनआशीर्वाद यात्रा रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, प्रवीण दरेकर या नेत्यांच्या उपस्थितीत पार पडेल.

यावेळी परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरजिल उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारतमातेला शिव्या देतो. त्याच्यावर कारवाई करण्याची तुमची हिंमत नाही. परंतु नारायण राणे यांना पकडण्यासाठी अख्खं पोलीस दल कामाला लावलं आहे. कायद्याच्या भाषेत नारायण राणेंनी कुठलाही गुन्हा केला नाही. पण त्याचं गुन्ह्यात जबरदस्ती रूपांतर करायचं? पोलीस आयुक्तांच्या पत्रात मुसक्या बांधा, हजर करा ते स्वत:ला समजतात काय? नारायण राणेंची बाजू ऐकून न घेता कलमं कशी लावली? पोलिसांचा गैरवापर केला जात आहे. पोलिसांबद्दल नितांत आदर आहे. निष्पक्ष पोलीस दल म्हणून महाराष्ट्र पोलिसांची ख्याती आहे. सरकारपुढे काहीजण लोटांगण घालत आहे. केवळ सरकारला खूश करण्यासाठी पोलीस दल कारवाई करायला लागलं तर महाराष्ट्राची प्रतिमा चांगली राहणार नाही असं त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे