शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

Mumbai Electricity: पॉवर ग्रिड तज्ज्ञ आता कुठे गेलेत? मुंबईतील खंडित वीजपुरवठ्यावरून भाजपा नेत्याचा सवाल

By बाळकृष्ण परब | Updated: October 12, 2020 14:10 IST

mumbai electricity news : आज मुंबईत झालेल्या पॉवर ग्रिडमधील बिघाडावरून भाजपा नेते अमित मालवीय यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना टोला लगावला आहे.

ठळक मुद्देनरेंद्र मोदींनी दहा मिनिटे लाईट बंद करून दिवे पेटवण्याचा सल्ला दिला होता तेव्हा भरपूर सल्ले देणारे पॉवर ग्रिड तज्ज्ञ आता कुठे आहेतया मंडळींकडे पॉवर ग्रिड कसा सांभाळावा याबाबत उद्धव ठाकरेंना देण्यासाठी कुठलाच सल्ला नाही आहे का?आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता

नवी दिल्ली - पॉवर ग्रिड फेल झाल्याने मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरामधील वीजपुरवठा आज सकाळपासून खंडित झाला होता. आता काही भागातील वीज आली असली तरी वीजपुरवठा पूर्णपणे सुरळीत होऊ शकलेला नाही. दरम्यान, आज मुंबईत झालेल्या पॉवर ग्रिडमधील बिघाडावरून भाजपा नेते अमित मालवीय यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना टोला लगावला आहे.जेव्हा नरेंद्र मोदींनी दहा मिनिटे लाईट बंद करून दिवे पेटवण्याचा सल्ला दिला होता तेव्हा भरपूर सल्ले देणारे पॉवर ग्रिड तज्ज्ञ आता कुठे आहेत, आता या मंडळींकडे पॉवर ग्रिड कसा सांभाळावा याबाबत उद्धव ठाकरेंना देण्यासाठी कुठलाच सल्ला नाही आहे का? असा सवाल अमित मालविय यांनी विचारला आहे.

आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे उद्योगधंदे, कार्यालये तसेच लोकलसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. अर्ध्यावरच लोकल बंद झाल्याने अत्यावश्यक सेवेमधील कर्मचाऱ्यांना पायपीट करावी लागली. दरम्यान सुमारे अडीच तासांनंतर मुंबईतील काही भागांमधील वीजपुरवठा हा सुळळीत झाला. रीस्टोरेशनचे बहुतांश काम संपले असून, काही ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत दिल्या सूचनावीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली आणि मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. रुग्णालयांना वीजपुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या. या सर्व काळात वीजपुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे आणि तात्काळ मदत करावी, असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले. उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.

टॅग्स :MumbaiमुंबईelectricityवीजBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार