शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
2
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
3
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
4
Munbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय महिलेसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
5
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
6
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
7
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
8
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
9
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
10
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
11
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
12
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
13
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
14
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
15
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
16
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
17
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
18
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
19
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
20
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?

"अभिषेक बॅनर्जींनी धक्का देऊन रॉय यांना बाहेर काढलं, आता चाऊमिन खायला पुन्हा तृणमूलमध्ये गेले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 19:34 IST

Mukul Roy Joins TMC West Bengal: मुकुल रॉय यांच्या तृणमूल काँग्रेस प्रवेशावरून भाजपची टीका. भाजपची अंतर्गत माहिती तृणमूल काँग्रेसला देत असल्याचा भाजपचा आरोप.

ठळक मुद्देमुकुल रॉय यांच्या तृणमूल काँग्रेस प्रवेशावरून भाजपची टीका. भाजपची अंतर्गत माहिती तृणमूल काँग्रेसला देत असल्याचा भाजपचा आरोप.

 पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या तृणमूल काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी असलेल्या मुकुल रॉय (Mukul roy) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी केली. मुकुल रॉय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुकुल रॉय हे आपल्या घरचेच सदस्य आहेत. ते आपल्या घरी परतले आहेत. त्यांचे अभिनंदन करते, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी पुन्हा त्यांचं स्वागत केलं. (Mukul roy joining tmc in presence of west bengal cm mamata banerjee in kolkata) परंतु यानंतर भाजपनं मात्र मुकुल रॉय यांच्यावर जोरदार टीका केली. 

भाजप पश्चिम बंगालचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांनी मुकुल रॉय यांच्या आरोप करत ते भाजपच्या अंतर्गत सूचना तृणमूल काँग्रेसपर्यंत पोहोचवत असल्याचं म्हटलं. तसंच यामुळे भाजपचा निवडणुकांमध्ये पराभव झाला. "ते पहिल्यांदा भाजपच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक जिंकले होते. जाण्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला असता तर बरं झालं असतं," असंही त्यांनी नमूद केलं. "राजकारणात सोयीस्कर भूमिका घेणारी लोकंही असतात. तेच अशी कामं करतात. जेव्हा तृणमूल काँग्रेसमध्ये अभिषेक बॅनर्जी यांचं वर्चस्व वाढलं तेव्हा त्यांच्यासोबत रॉय यांची शाब्दीक चकमक झाली. अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांना धक्का देऊन घराच्या बाहेर काढलं होतं," असं सिंह म्हणाले.पुन्हा चाऊमिन खाण्यासाठी गेले"त्या प्रकरणानंतर ते भाजपत आले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते पुन्हा चाऊमिन खाण्यासाठी गेले. चाऊमिन खाऊन ते तृणमूल काँग्रेसमध्ये गेले, नंतर पुन्हा भाजपत आले," असं म्हणत सिंग यांनी मुकुल रॉय यांच्यावर निशाणा साधला. "त्यांची आयाराम गयाराम सारखी कहाणी आहे. ज्या ठिकाणी सोयीस्कर वाटेल त्या ठिकाणी ते राहतील. पहिल्यांदा त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक जिंकली होती. त्यांना जायचं होतं तर त्यांनी किमान राजीनामा देऊन जायचं होतं. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी किमान आदर तरी राहिला असता," असंही त्यांनी नमूद केलं.जनतेचे नेते नाही"मुकुल रॉय हे कधीही जनतेचे नेते नव्हते. पश्चिम बंगालमध्ये एसी रूममध्ये बसून राजकारण होऊ शकत नाही. राजकारणातील त्यांची वेळ ही आता संपली आहे. त्यांच्यावर कोणीही आता विश्वास करत नाही. भाजपचीं अंतर्गत माहिती ते टीएमसीला देत होते हे सर्वांना माहित होतं. जर विरोधकाला तुमच्या सर्व योजना माहित असतील तर ते पराभवाचं कारण बनतं," असंही सिंह म्हणाले.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपा