शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

मोदींकडून अच्छे दिनचा शब्दप्रयोग बंद का?-सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 00:19 IST

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला धर्मनिरपेक्ष विचार दिले.

मुरुड : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला धर्मनिरपेक्ष विचार दिले. जातीयवादी शक्तींपासून देशाचे संरक्षण केले. हे धर्मनिरपेक्ष विचार जोपासत जातीयवादी शक्तीला सामोरे जाण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र आले. नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांनी देशाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा देशाचे नेतृत्व त्यांनी उत्तमपणे पार पाडले. आधुनिक तंत्रज्ञान राजीव गांधींनी देशात आणले. मनमोहन सिंगांनी दहा वर्षांत नेत्रदीपक प्रगती केली. देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली. २०१४ ला मोदींनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवले; पण आता ते हा शब्दप्रयोग वापरत नाहीत, असे प्रतिपादन महाआघाडीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनील तटकरे यांनी केले. ते मुरु ड येथील नांदगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप तसेच इतर मित्रपक्षांच्या महाआघाडीच्या प्रचाराच्या सभेत बोलत होते.मोदी सरकारने पाच वर्षांपूर्वी जनधन खाती उघडा, १५ लाख येतील, असे सांगून लोकांचा अपेक्षाभंग केला. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन तरु णांना दिले. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नोटाबंदीने आर्थिक व्यवसायाला फटका बसला. शेतकऱ्यांना दीडपट आधारभूत किंमत देण्याचे सांगण्यात आले. मात्र, असे काहीही झाले नाही. महाराष्ट्र व दिल्लीतील सरकारच्या अपयशामुळे आज देश पिछाडीवर गेला आहे. या सरकारने लोकशाही असलेल्या आपल्या देशात व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणली, असे आरोप त्यांनी केले. १९९३ मध्ये अडवाणींनी राममंदिर बांधू असे सांगितले. उद्धव ठाकरेंनी अयोध्येत जाऊन कुंभकर्णाला उठवायला आलोय असे सांगितले. आता यांच्यात काय तडजोड झाली ते कळत नाही, असेही तटकरे म्हणाले.शिवसेनेचे खासदार अनंत गीते यांनी निधी संपवणे एवढेच कर्तव्य मानले; पण त्या व्यतिरिक्त काही केले नाही, अशी टीका त्यांनी गीते यांच्यावर केली. मुरुड परिसरात कोणतीही विकासकामे त्यांनी केली नाहीत. गीतेंनी मुरुडमध्ये १५ लाखांच्या शौचालयांव्यतिरिक्त काहीही केले नाही. दहा वर्षांपूर्वी मुरुडला पर्यटनाचा दर्जा मी मिळवून दिला. आज गीते हे आपल्या नावावर सांगत आहेत. अवजड उद्योगमंत्री असून मतदारसंघात खा. गीतेंनी एकही कारखाना आणला नाही, असे सांगतानाच येथे रोजगार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. मला मुंबई-गोवा महामार्ग टोलमुक्त करायचा आहे. रेल्वेचे प्रश्न सोडवायचे आहेत, असे सांगितले. या वेळी काँग्रेसचे माजी आमदार मधू ठाकूर, जि.प. उपाध्यक्ष आस्वाद पाटील, श्रद्धा ठाकूर आदी उपस्थित होते.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीraigad-pcरायगड