शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मोदींकडून अच्छे दिनचा शब्दप्रयोग बंद का?-सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 00:19 IST

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला धर्मनिरपेक्ष विचार दिले.

मुरुड : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला धर्मनिरपेक्ष विचार दिले. जातीयवादी शक्तींपासून देशाचे संरक्षण केले. हे धर्मनिरपेक्ष विचार जोपासत जातीयवादी शक्तीला सामोरे जाण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र आले. नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांनी देशाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा देशाचे नेतृत्व त्यांनी उत्तमपणे पार पाडले. आधुनिक तंत्रज्ञान राजीव गांधींनी देशात आणले. मनमोहन सिंगांनी दहा वर्षांत नेत्रदीपक प्रगती केली. देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली. २०१४ ला मोदींनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवले; पण आता ते हा शब्दप्रयोग वापरत नाहीत, असे प्रतिपादन महाआघाडीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनील तटकरे यांनी केले. ते मुरु ड येथील नांदगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप तसेच इतर मित्रपक्षांच्या महाआघाडीच्या प्रचाराच्या सभेत बोलत होते.मोदी सरकारने पाच वर्षांपूर्वी जनधन खाती उघडा, १५ लाख येतील, असे सांगून लोकांचा अपेक्षाभंग केला. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन तरु णांना दिले. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नोटाबंदीने आर्थिक व्यवसायाला फटका बसला. शेतकऱ्यांना दीडपट आधारभूत किंमत देण्याचे सांगण्यात आले. मात्र, असे काहीही झाले नाही. महाराष्ट्र व दिल्लीतील सरकारच्या अपयशामुळे आज देश पिछाडीवर गेला आहे. या सरकारने लोकशाही असलेल्या आपल्या देशात व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणली, असे आरोप त्यांनी केले. १९९३ मध्ये अडवाणींनी राममंदिर बांधू असे सांगितले. उद्धव ठाकरेंनी अयोध्येत जाऊन कुंभकर्णाला उठवायला आलोय असे सांगितले. आता यांच्यात काय तडजोड झाली ते कळत नाही, असेही तटकरे म्हणाले.शिवसेनेचे खासदार अनंत गीते यांनी निधी संपवणे एवढेच कर्तव्य मानले; पण त्या व्यतिरिक्त काही केले नाही, अशी टीका त्यांनी गीते यांच्यावर केली. मुरुड परिसरात कोणतीही विकासकामे त्यांनी केली नाहीत. गीतेंनी मुरुडमध्ये १५ लाखांच्या शौचालयांव्यतिरिक्त काहीही केले नाही. दहा वर्षांपूर्वी मुरुडला पर्यटनाचा दर्जा मी मिळवून दिला. आज गीते हे आपल्या नावावर सांगत आहेत. अवजड उद्योगमंत्री असून मतदारसंघात खा. गीतेंनी एकही कारखाना आणला नाही, असे सांगतानाच येथे रोजगार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. मला मुंबई-गोवा महामार्ग टोलमुक्त करायचा आहे. रेल्वेचे प्रश्न सोडवायचे आहेत, असे सांगितले. या वेळी काँग्रेसचे माजी आमदार मधू ठाकूर, जि.प. उपाध्यक्ष आस्वाद पाटील, श्रद्धा ठाकूर आदी उपस्थित होते.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीraigad-pcरायगड