शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मोदींकडून अच्छे दिनचा शब्दप्रयोग बंद का?-सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 00:19 IST

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला धर्मनिरपेक्ष विचार दिले.

मुरुड : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला धर्मनिरपेक्ष विचार दिले. जातीयवादी शक्तींपासून देशाचे संरक्षण केले. हे धर्मनिरपेक्ष विचार जोपासत जातीयवादी शक्तीला सामोरे जाण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र आले. नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांनी देशाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा देशाचे नेतृत्व त्यांनी उत्तमपणे पार पाडले. आधुनिक तंत्रज्ञान राजीव गांधींनी देशात आणले. मनमोहन सिंगांनी दहा वर्षांत नेत्रदीपक प्रगती केली. देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली. २०१४ ला मोदींनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवले; पण आता ते हा शब्दप्रयोग वापरत नाहीत, असे प्रतिपादन महाआघाडीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनील तटकरे यांनी केले. ते मुरु ड येथील नांदगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप तसेच इतर मित्रपक्षांच्या महाआघाडीच्या प्रचाराच्या सभेत बोलत होते.मोदी सरकारने पाच वर्षांपूर्वी जनधन खाती उघडा, १५ लाख येतील, असे सांगून लोकांचा अपेक्षाभंग केला. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन तरु णांना दिले. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नोटाबंदीने आर्थिक व्यवसायाला फटका बसला. शेतकऱ्यांना दीडपट आधारभूत किंमत देण्याचे सांगण्यात आले. मात्र, असे काहीही झाले नाही. महाराष्ट्र व दिल्लीतील सरकारच्या अपयशामुळे आज देश पिछाडीवर गेला आहे. या सरकारने लोकशाही असलेल्या आपल्या देशात व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणली, असे आरोप त्यांनी केले. १९९३ मध्ये अडवाणींनी राममंदिर बांधू असे सांगितले. उद्धव ठाकरेंनी अयोध्येत जाऊन कुंभकर्णाला उठवायला आलोय असे सांगितले. आता यांच्यात काय तडजोड झाली ते कळत नाही, असेही तटकरे म्हणाले.शिवसेनेचे खासदार अनंत गीते यांनी निधी संपवणे एवढेच कर्तव्य मानले; पण त्या व्यतिरिक्त काही केले नाही, अशी टीका त्यांनी गीते यांच्यावर केली. मुरुड परिसरात कोणतीही विकासकामे त्यांनी केली नाहीत. गीतेंनी मुरुडमध्ये १५ लाखांच्या शौचालयांव्यतिरिक्त काहीही केले नाही. दहा वर्षांपूर्वी मुरुडला पर्यटनाचा दर्जा मी मिळवून दिला. आज गीते हे आपल्या नावावर सांगत आहेत. अवजड उद्योगमंत्री असून मतदारसंघात खा. गीतेंनी एकही कारखाना आणला नाही, असे सांगतानाच येथे रोजगार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. मला मुंबई-गोवा महामार्ग टोलमुक्त करायचा आहे. रेल्वेचे प्रश्न सोडवायचे आहेत, असे सांगितले. या वेळी काँग्रेसचे माजी आमदार मधू ठाकूर, जि.प. उपाध्यक्ष आस्वाद पाटील, श्रद्धा ठाकूर आदी उपस्थित होते.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीraigad-pcरायगड