शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मोदी, फडणवीसांनी देशाला राष्ट्रवाद शिकवण्याची गरज नाही - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 06:56 IST

पाच वर्षे दुसऱ्यांवर टीका करण्यातच घालविल्याचा आरोप

डोंबिवली : मोदी व फडणवीस हे राष्ट्रवादाच्या नावावर मतांचा जोगवा मागत आहेत; मात्र या देशातील नागरिकांना त्यांनी राष्ट्रवाद शिकवण्याची गरज नाही. वेळ आली तर प्रत्येक नागरिक देशासाठी कुर्बानी देण्याकरिता सज्ज आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथे केली.कल्याण लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारार्थ कल्याण-शीळ रोडलगत असलेल्या प्रीमिअर ग्राउंडवर जाहीर प्रचारसभेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. याप्रसंगी पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. या वेळी माजी पालकमंत्री गणेश नाईक, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, अरुण गुजराथी, आमदार ज्योती कलानी, संजीव नाईक, संतोष केणे, महेश तपासे उपस्थित होते. 

देशातील १२ हजार शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांत आत्महत्या केल्या. काँग्रेसच्या कारकिर्दीत शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ७० हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आली होती. मोदी सरकारने शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कोणतेही पाऊल उचललेले नाही. देशातील कारखानदारी बंद झाली आहे. तरुणांच्या हाताला काम मिळत नाही. महिलांवर अत्याचार होत आहे. त्यांच्या सुरक्षिततेची हमी सरकारने दिली नाही. सत्तेवर येण्यापूर्वी मोदी सरकारने दिलेल्या कोणत्याही आश्वासनांची पूर्तता केलेली नाही, याचा पुनरुच्चार पवार यांनी केला. गेली पाच वर्षे मोदी सरकारने केवळ नेहरू, गांधी घराण्यांतील नेत्यांवर टीका करण्यात खर्च घातली. जनतेचे प्रश्न व समस्यांविषयी बेफिकिरी दाखवली. त्याच जनतेपुढे मतांचा जोगवा ते मागत आहेत. त्यांचा निकाल लावल्याशिवाय गप्प बसू नका, असे आवाहन पवार यांनी केले.
नाशिकच्या लोकांना आई, वडील नाहीत का?राज्याचे मुख्यमंत्री भाषणे चांगली करतात; मात्र दोन दिवसांपूर्वी ते नाशिकला गेले, तेव्हा त्यांनी नाशिक दत्तक घेण्याचे जाहीर केले. दोन दिवसांनी मीदेखील नाशिकला गेलो. तेव्हा नाशिककरांना प्रश्न विचारला की, मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला दत्तक घेतले. तुम्हाला काही आई, वडील नाहीत का? त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.राष्ट्रवादीच्या सभेतही, लावरे तो व्हिडीओ!राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाषणाला उभे राहिले. त्यांनी ‘लावरे ती क्लिप’ असे म्हणून क्लिप सुरू करण्यास सांगितले. तेव्हा उपस्थितांमधून ‘लावरे तो व्हिडीओ’ असा आवाज आला; मात्र ती आपली भाषा नाही, असे पाटील यांनी नम्रपणे सांगितले. नितीन गडकरी, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची महायुती होण्यापूर्वी व सत्तेवर येण्यापूर्वीची वक्तव्ये असलेले व्हिडीओ चालवून त्यांनी महायुतीची पोलखोल केली.राजकारण सोडून देईन - नाईकबाबाजी पाटील यांचे डिपॉझिट जप्त करण्याचा दावा महायुतीच्या उमेदवारांकडून केला जात आहे. पाटील यांचे डिपॉझिट जप्त झाले, तर मी राजकारण सोडून देईल, असे आव्हान महायुतीला माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी जाहीर सभेत दिले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019kalyan-pcकल्याणSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी