शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

मोदी, फडणवीसांनी देशाला राष्ट्रवाद शिकवण्याची गरज नाही - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 06:56 IST

पाच वर्षे दुसऱ्यांवर टीका करण्यातच घालविल्याचा आरोप

डोंबिवली : मोदी व फडणवीस हे राष्ट्रवादाच्या नावावर मतांचा जोगवा मागत आहेत; मात्र या देशातील नागरिकांना त्यांनी राष्ट्रवाद शिकवण्याची गरज नाही. वेळ आली तर प्रत्येक नागरिक देशासाठी कुर्बानी देण्याकरिता सज्ज आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथे केली.कल्याण लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारार्थ कल्याण-शीळ रोडलगत असलेल्या प्रीमिअर ग्राउंडवर जाहीर प्रचारसभेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. याप्रसंगी पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. या वेळी माजी पालकमंत्री गणेश नाईक, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, अरुण गुजराथी, आमदार ज्योती कलानी, संजीव नाईक, संतोष केणे, महेश तपासे उपस्थित होते. 

देशातील १२ हजार शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांत आत्महत्या केल्या. काँग्रेसच्या कारकिर्दीत शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ७० हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आली होती. मोदी सरकारने शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कोणतेही पाऊल उचललेले नाही. देशातील कारखानदारी बंद झाली आहे. तरुणांच्या हाताला काम मिळत नाही. महिलांवर अत्याचार होत आहे. त्यांच्या सुरक्षिततेची हमी सरकारने दिली नाही. सत्तेवर येण्यापूर्वी मोदी सरकारने दिलेल्या कोणत्याही आश्वासनांची पूर्तता केलेली नाही, याचा पुनरुच्चार पवार यांनी केला. गेली पाच वर्षे मोदी सरकारने केवळ नेहरू, गांधी घराण्यांतील नेत्यांवर टीका करण्यात खर्च घातली. जनतेचे प्रश्न व समस्यांविषयी बेफिकिरी दाखवली. त्याच जनतेपुढे मतांचा जोगवा ते मागत आहेत. त्यांचा निकाल लावल्याशिवाय गप्प बसू नका, असे आवाहन पवार यांनी केले.
नाशिकच्या लोकांना आई, वडील नाहीत का?राज्याचे मुख्यमंत्री भाषणे चांगली करतात; मात्र दोन दिवसांपूर्वी ते नाशिकला गेले, तेव्हा त्यांनी नाशिक दत्तक घेण्याचे जाहीर केले. दोन दिवसांनी मीदेखील नाशिकला गेलो. तेव्हा नाशिककरांना प्रश्न विचारला की, मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला दत्तक घेतले. तुम्हाला काही आई, वडील नाहीत का? त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.राष्ट्रवादीच्या सभेतही, लावरे तो व्हिडीओ!राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाषणाला उभे राहिले. त्यांनी ‘लावरे ती क्लिप’ असे म्हणून क्लिप सुरू करण्यास सांगितले. तेव्हा उपस्थितांमधून ‘लावरे तो व्हिडीओ’ असा आवाज आला; मात्र ती आपली भाषा नाही, असे पाटील यांनी नम्रपणे सांगितले. नितीन गडकरी, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची महायुती होण्यापूर्वी व सत्तेवर येण्यापूर्वीची वक्तव्ये असलेले व्हिडीओ चालवून त्यांनी महायुतीची पोलखोल केली.राजकारण सोडून देईन - नाईकबाबाजी पाटील यांचे डिपॉझिट जप्त करण्याचा दावा महायुतीच्या उमेदवारांकडून केला जात आहे. पाटील यांचे डिपॉझिट जप्त झाले, तर मी राजकारण सोडून देईल, असे आव्हान महायुतीला माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी जाहीर सभेत दिले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019kalyan-pcकल्याणSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी