शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
7
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
8
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
11
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
12
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
13
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
14
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
15
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
16
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
17
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
18
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
19
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
20
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम

'केंद्र आणि राज्याच्या भांडणात माझ्या सारख्या आमदाराचा बळी', प्रताप सरनाईकांचा पुनरुच्चार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 15:58 IST

Pratap Sarnaik : माझ्यावर जे काही आरोप करण्यात आलेले आहेत, त्या विरोधात मी न्यायालयात धाव घेतली असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. 

ठाणे  : केंद्र आणि राज्य सरकाराच्या भांडणात माझ्या  सारख्या आमदाराचा बळी जात असल्याचा पुनरुच्चार शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. परंतु मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रबाबत त्यांना छेडले असता, त्याला आता भरपूर पावसाळा, वादळ, वारा होऊन गेला असल्याचे सांगत त्यांनी या पत्राबाबत माघार घेत आता माझा विचार बदलले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्यात दहीहांडी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांना मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रबाबत छेडले असता, तो विषय आता माझ्या  दृष्टीने जुना झाला आहे. त्यानंतर भरपूर पावसाळा आणि वादळ वारा देखील होऊन गेला आहे. त्यामुळे त्यावर आता बोलणे अयोग्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ईडीच्या माध्यमातून सुरु असलेल्या चौकशीला मी माझे कुटुंब संपूर्णपणे सहकार्य करीत आहे. परंतु या सर्वात माझी आणि माझ्या कुटुंबाची फरफट झाली आहे. तसेच माझ्यावर जे काही आरोप करण्यात आलेले आहेत, त्या विरोधात मी न्यायालयात धाव घेतली असल्याचेही त्यांनी पुन्हा सांगितले. 

त्यानुसार, या प्रक्रियेत मला संरक्षण देखील मिळाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या परिस्थिती बाबत त्यांना छेडले असता, यापूर्वी महाराष्ट्र हे संस्कृती प्रिय असे राज्य होते. परंतु मागील दीड ते दोन वर्षात त्यात खुप बदल झाला आहे, त्यामुळे तरुण पिढी देखील आता राजकारणात यायचे की नाही, याबाबत विचार करतांना दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्राची पुन्ही ती संस्कृती टिकविण्यासाठी किंबहुना ते दिवस पुन्हा आणण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांनी ठाणे  जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत जे वक्यव्य केले त्याबाबत सरनाईक यांना छेडले असता, मी एक लहान आमदार असून मी छोटा कार्यकर्ता त्यामुळे त्यावर मला बोलता येणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी यातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या भुमिकेबाबत नाराज आहात का? यावर त्यांना विचारले असता, मी शिवसेनेबाबत नाराज नसल्याचे त्यांनी सांगत, तसे असते तर माझ्या कार्यक्रमांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आले असते का? असा उलट सवाल त्यांनी केला आहे. 

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकthaneठाणेPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना