शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'केंद्र आणि राज्याच्या भांडणात माझ्या सारख्या आमदाराचा बळी', प्रताप सरनाईकांचा पुनरुच्चार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 15:58 IST

Pratap Sarnaik : माझ्यावर जे काही आरोप करण्यात आलेले आहेत, त्या विरोधात मी न्यायालयात धाव घेतली असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. 

ठाणे  : केंद्र आणि राज्य सरकाराच्या भांडणात माझ्या  सारख्या आमदाराचा बळी जात असल्याचा पुनरुच्चार शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. परंतु मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रबाबत त्यांना छेडले असता, त्याला आता भरपूर पावसाळा, वादळ, वारा होऊन गेला असल्याचे सांगत त्यांनी या पत्राबाबत माघार घेत आता माझा विचार बदलले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्यात दहीहांडी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांना मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रबाबत छेडले असता, तो विषय आता माझ्या  दृष्टीने जुना झाला आहे. त्यानंतर भरपूर पावसाळा आणि वादळ वारा देखील होऊन गेला आहे. त्यामुळे त्यावर आता बोलणे अयोग्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ईडीच्या माध्यमातून सुरु असलेल्या चौकशीला मी माझे कुटुंब संपूर्णपणे सहकार्य करीत आहे. परंतु या सर्वात माझी आणि माझ्या कुटुंबाची फरफट झाली आहे. तसेच माझ्यावर जे काही आरोप करण्यात आलेले आहेत, त्या विरोधात मी न्यायालयात धाव घेतली असल्याचेही त्यांनी पुन्हा सांगितले. 

त्यानुसार, या प्रक्रियेत मला संरक्षण देखील मिळाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या परिस्थिती बाबत त्यांना छेडले असता, यापूर्वी महाराष्ट्र हे संस्कृती प्रिय असे राज्य होते. परंतु मागील दीड ते दोन वर्षात त्यात खुप बदल झाला आहे, त्यामुळे तरुण पिढी देखील आता राजकारणात यायचे की नाही, याबाबत विचार करतांना दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्राची पुन्ही ती संस्कृती टिकविण्यासाठी किंबहुना ते दिवस पुन्हा आणण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांनी ठाणे  जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत जे वक्यव्य केले त्याबाबत सरनाईक यांना छेडले असता, मी एक लहान आमदार असून मी छोटा कार्यकर्ता त्यामुळे त्यावर मला बोलता येणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी यातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या भुमिकेबाबत नाराज आहात का? यावर त्यांना विचारले असता, मी शिवसेनेबाबत नाराज नसल्याचे त्यांनी सांगत, तसे असते तर माझ्या कार्यक्रमांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आले असते का? असा उलट सवाल त्यांनी केला आहे. 

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकthaneठाणेPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना