शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

'केंद्र आणि राज्याच्या भांडणात माझ्या सारख्या आमदाराचा बळी', प्रताप सरनाईकांचा पुनरुच्चार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 15:58 IST

Pratap Sarnaik : माझ्यावर जे काही आरोप करण्यात आलेले आहेत, त्या विरोधात मी न्यायालयात धाव घेतली असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. 

ठाणे  : केंद्र आणि राज्य सरकाराच्या भांडणात माझ्या  सारख्या आमदाराचा बळी जात असल्याचा पुनरुच्चार शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. परंतु मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रबाबत त्यांना छेडले असता, त्याला आता भरपूर पावसाळा, वादळ, वारा होऊन गेला असल्याचे सांगत त्यांनी या पत्राबाबत माघार घेत आता माझा विचार बदलले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्यात दहीहांडी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांना मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रबाबत छेडले असता, तो विषय आता माझ्या  दृष्टीने जुना झाला आहे. त्यानंतर भरपूर पावसाळा आणि वादळ वारा देखील होऊन गेला आहे. त्यामुळे त्यावर आता बोलणे अयोग्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ईडीच्या माध्यमातून सुरु असलेल्या चौकशीला मी माझे कुटुंब संपूर्णपणे सहकार्य करीत आहे. परंतु या सर्वात माझी आणि माझ्या कुटुंबाची फरफट झाली आहे. तसेच माझ्यावर जे काही आरोप करण्यात आलेले आहेत, त्या विरोधात मी न्यायालयात धाव घेतली असल्याचेही त्यांनी पुन्हा सांगितले. 

त्यानुसार, या प्रक्रियेत मला संरक्षण देखील मिळाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या परिस्थिती बाबत त्यांना छेडले असता, यापूर्वी महाराष्ट्र हे संस्कृती प्रिय असे राज्य होते. परंतु मागील दीड ते दोन वर्षात त्यात खुप बदल झाला आहे, त्यामुळे तरुण पिढी देखील आता राजकारणात यायचे की नाही, याबाबत विचार करतांना दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्राची पुन्ही ती संस्कृती टिकविण्यासाठी किंबहुना ते दिवस पुन्हा आणण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांनी ठाणे  जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत जे वक्यव्य केले त्याबाबत सरनाईक यांना छेडले असता, मी एक लहान आमदार असून मी छोटा कार्यकर्ता त्यामुळे त्यावर मला बोलता येणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी यातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या भुमिकेबाबत नाराज आहात का? यावर त्यांना विचारले असता, मी शिवसेनेबाबत नाराज नसल्याचे त्यांनी सांगत, तसे असते तर माझ्या कार्यक्रमांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आले असते का? असा उलट सवाल त्यांनी केला आहे. 

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकthaneठाणेPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना