शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

"रामाचं दर्शन घ्यायला आपण जगलो पाहिजे; उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असतील तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 14:49 IST

माणूस जगला पाहिजे, कोरोनाबाबत केंद्र सरकार अपयशी ठरल्यामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे असं सांगत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.

ठळक मुद्देरामाचं दर्शन घेण्यासाठी आपण जगलो पाहिजेकोरोनाबाबत केंद्र सरकार अपयशी ठरल्यामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हातीबाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका

मुंबई – देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असताना आता राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. या मुद्द्यावरुन शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीकेचं लक्ष्य केले. त्यानंतर आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर घणाघात केला आहे.

याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, रामाचं दर्शन घेण्यासाठी आपण जगलो पाहिजे, आपण जगलो पाहिजे मग दर्शन घ्यायला जाऊ, माणूस जगला पाहिजे, कोरोनाबाबत केंद्र सरकार अपयशी ठरल्यामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे असं सांगत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असतील तर त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. तर भूमिपूजनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला जात आहेत. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरली असेल, तर कोणाकोणाला निमंत्रण पाठवली जातात, त्यामुळे राजकीय सोशल डिस्टेसिंग किती पाळतात बघावं लागेल असा टोला खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.

तर उद्धव ठाकरे अयोध्येला नेहमीच जातात, मुख्यमंत्री झाल्यानंतरही गेले, नसतानाही गेले, शिवसेना आणि अयोध्येचं नातं आहे, राजकारणासाठी आम्ही अयोध्येला कधीच गेलो नाही, राम मंदिराचा रस्ता शिवसेनेने तयार केला आहे, मंदिरामध्ये येणारे मुख्य अडथळे शिवसेनेने दूर केले, ते राजकारण म्हणून नाही तर श्रद्धा आणि हिंदुत्व याच भावनेने आम्ही केले, ते नातं कायम आहे असं स्पष्ट शब्दात शिवसेना नेते संजय राऊतांनी भूमिका मांडली आहे.

कोरोनाची लढाई ही पांढऱ्या कपड्यातील आमचे डॉक्टर आहेत ज्यांना आम्ही देवदूत म्हणतो, ते लढतायेत, धर्मावर आणि देवावर श्रद्धा कायम असते, या देशातील लाखो डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी या सर्वांचे बलिदान कोरोनाशी लढताना झालेलं आहे, आणि ही लढाई तेच लढतील तेही देवाच्या आशीवार्दाने अशा शब्दात शरद पवारांच्या विधानावर  शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.  

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे