शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका राष्ट्रवादीनं स्पॉन्सर्ड केल्यात, फडणवीसांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 17:18 IST

देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मोठा आरोप केला आहे. 

सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकार आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण सुरू झालं आहे. राज्य सरकारनं निष्काळजीपणा दाखवल्यामुळे हाती निराशा लागल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यावर राज्य सरकारनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री अशोक चव्हाण आणि नवाब मलिक यांनी फडणवीस जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत असल्याचं म्हटलं. याच्या प्रत्युत्तरात देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मोठा आरोप केला आहे. (Maratha Reservation Devendra Fadnavis Allegations Against Ashok Chavan And Nawab Malik)मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पॉन्सर्ड आहेत, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्या होत्या, असं फडणवीस म्हणाले. 

फडणवीसांनी केलेला कायदा सुप्रीम कोर्टानं रद्द केलाय, जनतेची दिशाभूल करू नये; अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर

राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी याआधी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्या होत्या. त्यांच्या काही लोकांशी बैठका देखील झाल्या होत्या. राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांना खोटं बोलण्याचा रोग जडला आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्य सरकारच्या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेत सरकारला प्रत्युत्तर दिलं आहे. 

"मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली तेव्हा फडणवीसांची आठवण झाली. त्याआधी चर्चेला बोलवलं नाही. आम्ही कायदा कोर्टात टिकवला होता. पण हे लोक टिकवू शकले नाहीत. आम्ही योग्य समन्वय साधून मराठा आरक्षण कायदा टिकवला असता", असा दावाही फडणवीस यांनी यावेळी केला आहे. 

भाजपने केलेला कायदा घटनादुरुतीपूर्वीचाचकेंद्र सरकारच्या अ‌ॅटर्नी जनरल यांनी १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर राज्यांना आता अधिकार नाहीत. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद सरकारनं पुढाकार घेऊन निर्णय घ्यावा, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी 102 वी घटनादुरुस्तीपूर्वी भाजप सरकारने हा कायदा केला होता. आम्ही त्या कायद्याला अमेंड करतोय. आम्ही हा जो कायदा केला आहे तो 102 व्या घटनादुरुस्तीने बाधित होत नाही. कारण ते कायदा घटनादुरुस्ती करण्यापूर्वीचा आहे. आता आम्ही तो फक्त अमेंड करतोय. त्यामुळे अशोक चव्हाण आणि नवाब मलिक खोटं बोलत आहेत, असा दावाही फडणवीस यांनी केलाय. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणAshok Chavanअशोक चव्हाण