शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

"...तर भाजपाचे अनेक नेते पक्षात प्रवेश करतील"; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा दावा

By प्रविण मरगळे | Updated: November 3, 2020 11:22 IST

NCP, BJP News: त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यातही भाजपाला नाराजीचा फटका बसत आहे.

ठळक मुद्देजिल्हा आणि तालुका कार्यकारणीत डावलल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे श्रीरामपूर येथे भाजपाला खिंडार पडलं.नगर जिल्ह्यातील या राजकीय घडामोडीवर राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाष्य केलेमहाविकास आघाडीचं सरकार आमचं ५ वर्ष पूर्ण करणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही

अहमदनगर – काही दिवसांपूर्वीच भाजपाला सोडचिठ्ठी देत उत्तर महाराष्ट्रातील मोठे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हातात बांधलं, एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपाला धक्का बसला त्याचसोबत खडसेंनी भाजपामधील नाराजांना मोकळी वाट करून दिली. जळगाव जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपातून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणं पसंत केले.

त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यातही भाजपाला नाराजीचा फटका बसत आहे. श्रीरामपूर येथील भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्यावर पक्ष संपवण्याचा आरोप करत भाजपाच्या २३१ पैकी २१३ बूथ प्रमुखांनी शनिवारी राजीनामा दिला. अनेकांना जिल्हा आणि तालुका कार्यकारणीत डावलल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे श्रीरामपूर येथे भाजपाला खिंडार पडलं. नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष किरण लुणिया आणि अभिजीत कुलकर्णी यांनी नाराजांचा मेळावा घेत राजेंद्र गोंदकर यांच्यावर निशाणा साधला.

नगर जिल्ह्यातील या राजकीय घडामोडीवर राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाष्य केले आहे. याबाबत त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचं सरकार आमचं ५ वर्ष पूर्ण करणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही, ५ वर्ष व्यवस्थित पूर्ण होणार असून त्यापुढीलही ५ वर्ष आमचं सरकार असणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळात नगर जिल्ह्यातील भाजपाचे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्रीरामपूर येथे भाजपाला २०१४ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती, भाऊसाहेब वाकचौरे ४६ हजार मतांनी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. असे असताना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी तीस वर्ष संघर्ष करून श्रीरामपुरात पक्ष वाढविला. ज्यांच्यावर विविध आंदोलनात अनेक गुन्हे दाखल झाले, त्याच लोकांना कार्यकारणीतून वगळले. ज्यांचा समावेश केला त्यांच्याबरोबर मात्र पक्षाचे कोणतेही बूथ प्रमुख अथवा कार्यकर्ते नाहीत. त्यांच्याकडे जनाधार नाही त्यांना पदे दिली गेली. मात्र केवळ निष्ठावंतांना संपवण्यासाठी राजकारण केले, असा गंभीर ठपका राजेंद्र गोंदकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. नाराज गटाने श्रीरामपूर संचलन समिती स्थापन केली असून त्या माध्यमातून पुढील काळात कामकाज करणार आहेत.

अप्रत्यक्षरीत्या माजी मंत्री राम शिंदे यांच्यावरही खापर फोडण्यात आले आहे. उत्तरेत श्रीरामपूरमध्ये भाजपाचे मोठे संघटन आहे. श्रीरामपुरातील कार्यकारिणी निवडीचा वाद थेट प्रदेशस्तरावर पोहोचला होता. जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी घोषित झाल्या. मात्र तरीही श्रीरामपूरच्या निवडी मात्र होऊ शकल्या नव्हत्या. मात्र जिल्ह्यातील या राजकारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळणार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस