शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

"...तर भाजपाचे अनेक नेते पक्षात प्रवेश करतील"; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा दावा

By प्रविण मरगळे | Updated: November 3, 2020 11:22 IST

NCP, BJP News: त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यातही भाजपाला नाराजीचा फटका बसत आहे.

ठळक मुद्देजिल्हा आणि तालुका कार्यकारणीत डावलल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे श्रीरामपूर येथे भाजपाला खिंडार पडलं.नगर जिल्ह्यातील या राजकीय घडामोडीवर राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाष्य केलेमहाविकास आघाडीचं सरकार आमचं ५ वर्ष पूर्ण करणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही

अहमदनगर – काही दिवसांपूर्वीच भाजपाला सोडचिठ्ठी देत उत्तर महाराष्ट्रातील मोठे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हातात बांधलं, एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपाला धक्का बसला त्याचसोबत खडसेंनी भाजपामधील नाराजांना मोकळी वाट करून दिली. जळगाव जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपातून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणं पसंत केले.

त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यातही भाजपाला नाराजीचा फटका बसत आहे. श्रीरामपूर येथील भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्यावर पक्ष संपवण्याचा आरोप करत भाजपाच्या २३१ पैकी २१३ बूथ प्रमुखांनी शनिवारी राजीनामा दिला. अनेकांना जिल्हा आणि तालुका कार्यकारणीत डावलल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे श्रीरामपूर येथे भाजपाला खिंडार पडलं. नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष किरण लुणिया आणि अभिजीत कुलकर्णी यांनी नाराजांचा मेळावा घेत राजेंद्र गोंदकर यांच्यावर निशाणा साधला.

नगर जिल्ह्यातील या राजकीय घडामोडीवर राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाष्य केले आहे. याबाबत त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचं सरकार आमचं ५ वर्ष पूर्ण करणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही, ५ वर्ष व्यवस्थित पूर्ण होणार असून त्यापुढीलही ५ वर्ष आमचं सरकार असणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळात नगर जिल्ह्यातील भाजपाचे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्रीरामपूर येथे भाजपाला २०१४ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती, भाऊसाहेब वाकचौरे ४६ हजार मतांनी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. असे असताना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी तीस वर्ष संघर्ष करून श्रीरामपुरात पक्ष वाढविला. ज्यांच्यावर विविध आंदोलनात अनेक गुन्हे दाखल झाले, त्याच लोकांना कार्यकारणीतून वगळले. ज्यांचा समावेश केला त्यांच्याबरोबर मात्र पक्षाचे कोणतेही बूथ प्रमुख अथवा कार्यकर्ते नाहीत. त्यांच्याकडे जनाधार नाही त्यांना पदे दिली गेली. मात्र केवळ निष्ठावंतांना संपवण्यासाठी राजकारण केले, असा गंभीर ठपका राजेंद्र गोंदकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. नाराज गटाने श्रीरामपूर संचलन समिती स्थापन केली असून त्या माध्यमातून पुढील काळात कामकाज करणार आहेत.

अप्रत्यक्षरीत्या माजी मंत्री राम शिंदे यांच्यावरही खापर फोडण्यात आले आहे. उत्तरेत श्रीरामपूरमध्ये भाजपाचे मोठे संघटन आहे. श्रीरामपुरातील कार्यकारिणी निवडीचा वाद थेट प्रदेशस्तरावर पोहोचला होता. जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी घोषित झाल्या. मात्र तरीही श्रीरामपूरच्या निवडी मात्र होऊ शकल्या नव्हत्या. मात्र जिल्ह्यातील या राजकारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळणार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस