शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

‘त्या’  गावांचा कारभार आता तरुणांच्या हाती; मतदारांची तरुणांना पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 00:01 IST

राजकीय जीवनातील ग्रामपंचायत सदस्य ही पहिली पायरी मानली जाते. त्यांच्यातील गावाच्या विकासाच्या संकल्पना आता सत्तेत उतरणार आहेत.

सुनील घरतपारोळ : कोरोनाचे नियम पाळत ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. मतदारांनीही कोरोनाला बाजूला सारत, लोकशाहीच्या या उत्सवात भाग घेत मतदान केले. वसई तालुक्यात सत्पाळा व पाली या दोन ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक पार पडली, पण यावेळी मात्र मतदारांनी तरुण उमेदवारांवर विश्वास टाकत त्यांना निवडून दिले. हेच तरुण कारभारी आता गावाचा कारभार करण्यासाठी सज्ज झाले आहे. सर्वात तरुण २६ वर्षांच्या उमेदवाराला सत्पाळा गावातील गावकऱ्यांनी निवडून दिले आहे.

नवीन वर्षातील ही पहिली निवडणूक असल्याने, सर्व राजकीय पक्षांनी पाली व सत्पाळा ग्रामपंचायत निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते. कोरोनाच्या काळात मुदत संपलेल्या पालघर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. पालघर तालुक्यातील सांगावे तर वसईतील पाली आणि सत्पाळा या ग्रामपंचायतींचा यात समावेश होता. ग्रामपंचायत सत्तेत या वर्षी निवडून आलेल्यांत तरुणांचा वाटा मोठा आहे. यात महिलांचाही मोठा वाटा आहे. राजकीय जीवनातील ग्रामपंचायत सदस्य ही पहिली पायरी मानली जाते. त्यांच्यातील गावाच्या विकासाच्या संकल्पना आता सत्तेत उतरणार आहेत.

सरपंच लाभणार तरुण? यावेळी निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांनी गावातील तरुणांना संधी देत, त्यांना राजकारणाची वाट मोकळी करून दिली. आता सरपंचदाचे नवीन आरक्षण जाहीर होणार असल्याचे यात नक्कीच तरुण उमेदवारांचा सरपंच म्हणून विचार होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

महत्त्वाची निवडणूक विधानसभा निवडणुकीनंतर कोरोनामुळे कोणतीही निवडणूक झाली नव्हती. त्यानंतरची ग्रामपंचायत निवडणूक पहिली ठरली. त्यामुळे सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्ते यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. राजकीय पक्षांनाही निवडणूक जिंकण्यासाठी मोठे हातपाय मारावे लागले. 

मतदारांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही पूर्ण करून, गावात जी काही विकासकामे आहेत, ती करण्याचा प्रयत्न करू, तसेच गावातील समस्या आहेत, त्यांचे निवारण करणे आमचे प्रथम प्राधान्य असेल. - रोहित प्रकाश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य, पाली.

गावच्या विकासकामांना गती देऊ. गावातील गटारे, पाणी समस्या किंवा रोड लाइट असेल, अशी कामे आम्ही पूर्ण करू, तसेच महिलांसाठीच्या योजना आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. वाचनालय, व्यायामशाळा यासाठीही आमचे प्राधान्य असेल.- संगीता मेघराज भंडार,ग्रामपंचायत सदस्य, सत्पाळा

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकPoliticsराजकारण