शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

पाकिस्तानवरील हल्ला, राष्ट्रवाद हे असणार भाजपाच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 04:41 IST

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग ८ मार्च रोजी जाहीर करणार असल्याची चर्चा आहे.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग ८ मार्च रोजी जाहीर करणार असल्याची चर्चा आहे. हे लक्षात घेऊन भाजपा आपल्या निवडणूक रणनीतीला अंतिम स्वरुप देण्यात व्यग्र आहे. पुलवामा हल्ल्याला सडेतोड उत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला व राष्ट्रवाद हे भाजपाच्या प्रचाराचे दोन प्रमुख मुद्दे असण्याची शक्यता आहे.यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, राष्ट्रवाद या विषयावर एक प्रेरक गीत भाजपाच्या प्रचारमोहिमेसाठी प्रसून जोशी लिहीत आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ‘सौगंध मुझे इस मिट्टी की मै देश नही मिटने दूंगा' हे गीत भाजपा व मोदींच्या प्रचारासाठी खास तयार करण्यात आले होते. त्याच्याच धर्तीवर आगामी लोकसभा निवडणुकांसाठीही प्रचारगीते लिहून घेण्यात येत आहेत. त्या प्रचारगीतांच्या व्हिडिओफितींमध्ये मोदींच्या भाषणांच्या दृश्यांचीही पेरणी केलेली असेल. पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने हल्ले चढविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची राजस्थानातील चुरू येथे जी सभा झाली त्यात त्यांनी ‘सौंगध मुझे इस मिट्टी की' या गाण्याच्या काही ओळी म्हणून दाखविल्या होत्या. देश सुरक्षित हातांमध्ये आहे याची खात्री बाळगा असे पंतप्रधान या सभेत म्हणाले होते.>मोदी है तोमुमकीन है...‘नामुमकीन अब मुमकीन है' अशी घोषणा भाजपाने याआधी प्रचलित केली होती. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी ‘मोदी है तो मुमकीन है' अशी घोषणाही पक्षातर्फे दिली जाण्याची शक्यता आहे. भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात किती दहशतवादी ठार झाले याचा आकडा मोदी सरकारने करावा अशी भाजपाचा मित्रपक्ष शिवसेना व इतर विरोधी पक्षांनी केलेली मागणी सरकारने मान्य केली नाही. बालाकोट हल्ल्यात किती जण मारले गेले असावेत याविषयी काहीही भाष्य करण्यास भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांनी नकार दिला आहे.या हल्ल्यात २०० ते ४०० दहशतवादी ठार झाले असावेत अशी माहिती केंद्र सरकारमधील मंत्री खासगीत देत आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी २५० दहशतवादी ठार झाल्याचे जाहीर विधान केले होते. त्यामुळे बालाकोट हल्ल्यात पाकिस्तानची नेमकी किती हानी झाली याबाबत गुढ निर्माण झाले आहे. त्या मुद्द्याचा वापर विरोधी पक्षांकडून निवडणूक प्रचारात होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९