शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

"ही तर ठाणे, नवी मुंबई, मुंबई महानगरपालिकेतील विजयाची पायाभरणी,"

By बाळकृष्ण परब | Updated: January 18, 2021 20:05 IST

Maharashtra Gram Panchayat Election Results Update : सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आता पूर्ण होत आली आहे. तसेच राज्यातील ग्रामीण राजकारणाचे चित्रही स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. कोकणातील जनतेने भाजपाला भरभरून यश दिलं जिलेबी फाफडाचे राजकारण करू पाहत होते, नौटंकी करू पाहत होते. त्याला मालवणी खाजाने उत्तर दिले आहेरत्नागिरी सिंधुदुर्गात केवळ भाजप याचा अर्थ आता नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये केवळ भाजपचाच झेंडा फडकणार

मुंबई - सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आता पूर्ण होत आली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांना कडवी टक्कर देत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या विजयानंतर भाजपाच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेले भरघोस यश हे नवी मुंबई, ठाणे, मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील भाजपाच्या विजयाची पायाभरणी आहे, असा दावा भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.ग्रामपंयाचत निववडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आशिष शेलार म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. कोकणातील जनतेने भाजपाला भरभरून यश दिलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचा विजय झाला आहे. तर केवळ २० ठिकाणी शिवसेना जिंकली आहे. रत्नागिरीमध्ये सुमारे ५३६ ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले आहेत. जिलेबी फाफडाचे राजकारण करू पाहत होते, नौटंकी करू पाहत होते. त्याला मालवणी खाजाने उत्तर दिले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गात केवळ भाजप याचा अर्थ आता नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये केवळ भाजपचाच झेंडा फडकणार आहे, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला. कणकवली विधानसभा मतदार संघात ३९ पैकी २७ तर सावंतवाडी १६ पैकी ९ तसेच कुडाळ १५ पैकी ९ अशा एकूण ७० पैकी भाजपाने ४५ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत, तर सेनेला केवळ २० आणि राष्ट्रवादीला एक ग्रामपंचायत जिंकता आली. सिंधुदुर्गात भाजपाचाच आवाज! कोकण म्हणजे "आम्हीच" म्हणणाऱ्यांचे कोकणी माणसाकडून गर्वहरण झाले आहे, असा टोलाही शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारgram panchayatग्राम पंचायत