शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Maharashtra Gram Panchayat Election Results:जयंत पाटलांच्या सासरवाडीत गावकऱ्यांचा राष्ट्रवादीला दे धक्का; मेव्हणे अन् पाहुणे सगळेच हरले

By प्रविण मरगळे | Updated: January 18, 2021 14:31 IST

Maharashtra Gram Panchayat Election Results: म्हैसाळ ही जयंत पाटील यांची सासरवाडी आहे, याठिकाणी भाजपानं मुसंडी मारत राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड दिली आहे.

ठळक मुद्देजयंत पाटील यांचे मेव्हणे मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होतीसांगलीतील म्हैसाळ ग्रामपंचायतीत भाजपानं तब्बल १५ जागांवर विजय मिळवला आहे.१७ जागांपैकी केवळ २ जागांवर राष्ट्रवादीला समाधान मानावं लागलं आहे.

सांगली – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत, या निवडणुकीच्या निकालांमध्ये गावकऱ्यांनी अनेक धक्कादायक निकाल दिले आहेत, यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनाही त्यांच्या सासरवाडीच्या गावकऱ्यांनी मोठा धक्का दिला आहे. सांगलीतील म्हैसाळ ग्रामपंचायतीत भाजपानं तब्बल १५ जागांवर विजय मिळवला आहे.

म्हैसाळ ही जयंत पाटील यांची सासरवाडी आहे, याठिकाणी भाजपानं मुसंडी मारत राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड दिली आहे. १७ जागांपैकी १५ जागांवर भाजपानं एकतर्फी विजय मिळवला आहे. तर केवळ २ जागांवर राष्ट्रवादीला समाधान मानावं लागलं आहे. जयंत पाटील यांचे मेव्हणे मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती, मात्र लहान मेव्हणा, मोठ्या मेव्हण्याची पत्नी अन् मुलगी हे सगळेच पाहुणे पराभूत झाले आहेत. या निवडणुका स्थानिक पातळीवरील असल्या तरी जयंत पाटलांचे सर्वच पाहुणे पराभूत झाल्याने गावात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान, दुसरीकडे भाजपा नेते आशिष शेलार यांनी सासरवाडीत भाजपाची लाज राखली आहे. सिंधुदुर्गात सावंतवाडी तालुक्यातील दांडेली ग्रामपंचायत शिवसेनेकडून हिसकावून घेण्यात भाजपला यश आहे. दांडेली या गावात भाजपाचे नेते तथा आमदार आशिष शेलार यांची सासरवाडी असून दांडेली ग्रामपंचायत बरीच वर्षे शिवसेनेकडे होती मात्र यावेळी ती ग्रामपंचायत भाजपाकडे आली आहे. भाजपा नेते आशिष शेलार स्वत: या ठिकाणी प्रचारासाठी आले होते. त्यामुळेच या ग्रामपंचायतवर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.

राज्यातील सहा हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये कमळ फुलेलभाजपा

राज्यातील १४ हजारांपैकी सुमारे सहा हजार ग्रामपंचायतींवर भाजपाला यश मिळेल, संध्याकाळपर्यंत हा आकडा वाढेल, या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा वापर केला, कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जाते. मात्र या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला चांगले मतदान झालेले दिसत आहे. उदाहरणच द्यायचं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्या आहेत. अगदी शिवसेनेच्या खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावामध्येही भाजपाने विजय मिळवला आहे, देवगड, वैभववाडी, मालवण आदी तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचा विजय झाला आहे अशी प्रतिक्रिया भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केली.

भास्कर पेरे पाटलांच्या मुलीला गावकऱ्यांनी नाकारलं

आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदा खंडीत झाली, या निवडणुकीत आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या संपूर्ण पॅनेलला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भास्करराव पेरे पाटील यांच्या कन्या अनुराधा पेरे यांनाही गावकऱ्यांनी नाकारलं आहे. अनुराधा पाटील यांना १८३ मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला २०८ मते मिळाल्याने त्यांचा विजय झाला. पाटोदा ग्रामपंचायतील ८ सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत, तर उर्वरित ३ जागांसाठी मतदान घेण्यात आलं, त्यातील एका जागेवर अनुराधा पाटील उभ्या होत्या.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा