शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

Maharashtra Gram Panchayat Election Results:जयंत पाटलांच्या सासरवाडीत गावकऱ्यांचा राष्ट्रवादीला दे धक्का; मेव्हणे अन् पाहुणे सगळेच हरले

By प्रविण मरगळे | Updated: January 18, 2021 14:31 IST

Maharashtra Gram Panchayat Election Results: म्हैसाळ ही जयंत पाटील यांची सासरवाडी आहे, याठिकाणी भाजपानं मुसंडी मारत राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड दिली आहे.

ठळक मुद्देजयंत पाटील यांचे मेव्हणे मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होतीसांगलीतील म्हैसाळ ग्रामपंचायतीत भाजपानं तब्बल १५ जागांवर विजय मिळवला आहे.१७ जागांपैकी केवळ २ जागांवर राष्ट्रवादीला समाधान मानावं लागलं आहे.

सांगली – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत, या निवडणुकीच्या निकालांमध्ये गावकऱ्यांनी अनेक धक्कादायक निकाल दिले आहेत, यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनाही त्यांच्या सासरवाडीच्या गावकऱ्यांनी मोठा धक्का दिला आहे. सांगलीतील म्हैसाळ ग्रामपंचायतीत भाजपानं तब्बल १५ जागांवर विजय मिळवला आहे.

म्हैसाळ ही जयंत पाटील यांची सासरवाडी आहे, याठिकाणी भाजपानं मुसंडी मारत राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड दिली आहे. १७ जागांपैकी १५ जागांवर भाजपानं एकतर्फी विजय मिळवला आहे. तर केवळ २ जागांवर राष्ट्रवादीला समाधान मानावं लागलं आहे. जयंत पाटील यांचे मेव्हणे मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती, मात्र लहान मेव्हणा, मोठ्या मेव्हण्याची पत्नी अन् मुलगी हे सगळेच पाहुणे पराभूत झाले आहेत. या निवडणुका स्थानिक पातळीवरील असल्या तरी जयंत पाटलांचे सर्वच पाहुणे पराभूत झाल्याने गावात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान, दुसरीकडे भाजपा नेते आशिष शेलार यांनी सासरवाडीत भाजपाची लाज राखली आहे. सिंधुदुर्गात सावंतवाडी तालुक्यातील दांडेली ग्रामपंचायत शिवसेनेकडून हिसकावून घेण्यात भाजपला यश आहे. दांडेली या गावात भाजपाचे नेते तथा आमदार आशिष शेलार यांची सासरवाडी असून दांडेली ग्रामपंचायत बरीच वर्षे शिवसेनेकडे होती मात्र यावेळी ती ग्रामपंचायत भाजपाकडे आली आहे. भाजपा नेते आशिष शेलार स्वत: या ठिकाणी प्रचारासाठी आले होते. त्यामुळेच या ग्रामपंचायतवर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.

राज्यातील सहा हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये कमळ फुलेलभाजपा

राज्यातील १४ हजारांपैकी सुमारे सहा हजार ग्रामपंचायतींवर भाजपाला यश मिळेल, संध्याकाळपर्यंत हा आकडा वाढेल, या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा वापर केला, कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जाते. मात्र या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला चांगले मतदान झालेले दिसत आहे. उदाहरणच द्यायचं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्या आहेत. अगदी शिवसेनेच्या खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावामध्येही भाजपाने विजय मिळवला आहे, देवगड, वैभववाडी, मालवण आदी तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचा विजय झाला आहे अशी प्रतिक्रिया भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केली.

भास्कर पेरे पाटलांच्या मुलीला गावकऱ्यांनी नाकारलं

आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदा खंडीत झाली, या निवडणुकीत आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या संपूर्ण पॅनेलला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भास्करराव पेरे पाटील यांच्या कन्या अनुराधा पेरे यांनाही गावकऱ्यांनी नाकारलं आहे. अनुराधा पाटील यांना १८३ मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला २०८ मते मिळाल्याने त्यांचा विजय झाला. पाटोदा ग्रामपंचायतील ८ सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत, तर उर्वरित ३ जागांसाठी मतदान घेण्यात आलं, त्यातील एका जागेवर अनुराधा पाटील उभ्या होत्या.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा