शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

Maharashtra Election 2019: भाजपाची मोठी खेळी; नव्या मित्रांचा वापर करून जुन्या मित्राला देणार धक्का?

By प्रविण मरगळे | Updated: October 7, 2019 19:53 IST

राष्ट्रीय समाज पक्षवगळता इतर मित्र पक्षांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली.

प्रविण मरगळे

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना-भाजपा मित्रपक्षाची महायुती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. राज्यात मोठा भाऊ म्हणून भाजपाने शिवसेनेला १२४ जागा देत स्वत:कडे १५० जागा घेतल्या आणि मित्रपक्ष रासपा, रयतक्रांती, आरपीआय, शिवसंग्राम यांना १४ जागा सोडण्याचं जाहीर केलं. पण प्रत्यक्षात मित्रपक्षांच्या नावे भाजपाने मित्रपक्षांच्या उमेदवारांना कमळाच्या चिन्हावर लढण्यास भाग पाडलं. 

राष्ट्रीय समाज पक्षवगळता इतर मित्र पक्षांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली. ज्या २ जागा महायुतीमध्ये रासपला सोडण्यात आल्या त्याठिकाणीही भाजपाने महायुतीच्या उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म देऊन भाजपाच्या चिन्हावर लढविण्याची तयारी केली. याची कल्पना येताच महायुतीत रासप पक्ष नाराज झाला पण इकडं आड अन् तिकडं विहीर अशी परिस्थिती रासपची झाली असल्याचं महादेव जानकर यांनी मान्य केलं. युतीत राहूनही रासप आणि इतर मित्रपक्षांना नावापुरत्या जागा सोडण्यात आल्या पण प्रत्यक्षात याठिकाणी असलेले सर्व उमेदवार कमळ चिन्हावर लढणार असल्याने मित्रपक्षाच्या हाती भोपळाच आला असचं चित्र पाहायला मिळत आहे. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपात यांच्यात तडजोडीचं राजकारण झालं. अमित शहा यांनी  मातोश्रीवर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत एक जागा वाढवून देण्यात आली. या भेटीतच विधानसभा निवडणुकीच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याचं दोन्ही पक्षाचे नेते सांगतात. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभुतपूर्व यशानंतर भाजपाने पुन्हा एकदा शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या काळात समसमान जागावाटप होईल असं बोलणाऱ्या शिवसेनेचाही सूर नरमल्याचं पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुकीत १२४ जागांवर शिवसेना, भाजपा १५० जागांवर तर मित्रपक्ष १४ जागांवर निवडणूक लढणार असून महायुती झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन केली. 

आरपीआयचे रामदास आठवले, शिवसंग्रामचे विनायक मेटे, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आणि रासपचे महादेव जानकर यांना १४ जागा देण्याचं आश्वासन भाजपाने दिले. मात्र या १४ जागांवरही महायुतीचे उमेदवार कमळ चिन्हावर लढणार आहेत. त्यामुळे या १४ मतदारसंघात निवडून येणारे उमेदवार हे नावापुरते मित्रपक्षांचे आमदार असतील पण प्रत्यक्षात कागदोपत्री ते भाजपाचेच आमदार म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपा १६४ तर शिवसेना १२४ अशाच प्रकारे जागांचे वाटप ग्राह्य धरता येणार आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना वेगवेगळे लढल्याने त्यांना प्रत्येकी १२२ आणि ६३ जागा मिळाल्या होत्या. बहुमत न मिळाल्याने भाजपाला मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता चालविण्यासाठी सोबत घ्यावं लागलं.

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील सभेत बहुमत नसतानाही देवेंद्र फडणवीस यांनी ५ वर्ष सरकार चालविलं असं कौतुक केलं पण आगामी निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांना पूर्ण बहुमत द्यावं असं आवाहन करत एकप्रकारे शिवसेनेला इशारा दिला होता. तरीही शिवसेनेला सोबत घेऊन जास्तीत जास्त भाजपाच्या जागा निवडून आणण्याचा हा भाजपाची खेळी आहे. त्यामुळे भाजपा आमदारांच्या संख्येत वाढ होऊन भविष्यात कमळाचं बहुमत आलं तर यापुढे शिवसेना भाजपाच्या दबावाखालीच राहील अशी पुरेपुर काळजी भाजपाच्या नेत्यांनी घेतली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाMahadev Jankarमहादेव जानकरRamdas Athawaleरामदास आठवलेSadabhau Khotसदाभाउ खोत Vinayak Meteविनायक मेटेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019