शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मुस्लीम असल्यानं पक्षात डावललं, काँग्रेस नेत्या नूरी खानचा राजीनामा, त्यानंतर २ तासांतच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 10:12 IST

मी संघटनेत काम करण्याच्या हेतून पक्षाशी जोडली गेली. परंतु पक्षात काम करुनही मुस्लीम असल्याने मला डावलण्यात आले असा आरोप त्यांनी केला.

भोपाळ – मध्य प्रदेशातील काँग्रेस प्रवक्ता नूरी खान यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. रविवारी संध्याकाळी नूरी खान यांनी ट्विटरवरुन याबाबत घोषणा केली. परंतु अवघ्या २ तासांत नूरी खान यांनी राजीनामा परत घेतला आहे. राजीनामा देताना नूरी खान यांनी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप करत पक्षात धर्मावरुन भेदभाव करत असल्याची नाराजी व्यक्त केली.

नूरी खान यांनी मी मुस्लीम असल्या कारणाने पक्षात डावलण्यात येत असल्याचं म्हटलं. त्यांनी ट्विटमध्ये सांगितले की, काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा मी राजीनामा देत आहे. काँग्रेस पक्षात राहून अल्पसंख्याक कार्यकर्ते आणि आपल्या माणसांना राजकीय आणि सामाजिक न्याय देऊ शकत नाही. माझ्यासोबत भेदभाव केला जात आहे. त्यामुळे मी सर्व पदांचा राजीनामा देत आहे असं त्यांनी सांगितले होते.

तसेच मी संघटनेत काम करण्याच्या हेतून पक्षाशी जोडली गेली. परंतु पक्षात काम करुनही मुस्लीम असल्याने मला डावलण्यात आले. त्यासाठी मी राजीनाम्यासारखं पाऊल उचललं आहे. काँग्रेसमध्ये मी जवळपास २२ वर्ष काम करतेय. परंतु जर मला तिकीट हवं तर मुस्लीम बहुल भागात निवडणूक लढव. त्यामुळे काँग्रेसमध्ये धर्मनिरपेक्षता राहिली नाही. भाजपा आणि काँग्रेसमध्ये काय अंतर नाही का? असा प्रश्न मला प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना विचारायचा आहे असंही नूरी खान यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत म्हटलं.

दरम्यान, अवघ्या २ तासांत नूरी खान यांच्या राजीनाम्यानंतर पक्षातील वरिष्ठांनी त्यांच्या नाराजीची दखल घेतली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यांच्यासमोर मी माझं म्हणणं मांडलं. २२ वर्षात मी पहिल्यांदाच राजीनामा दिला आहे. माझ्या मनात जी खंत होती ती मी बोलून दाखवली आहे. मात्र कमलनाथ यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मी राजीनामा परत घेत असल्याचं नूरी खान यांनी स्पष्ट केले.

राजीनाम्यानंतर हायकमांडनं घेतली दखल

नूरी खान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस हायकमांड सक्रीय झाल्या. नूरी खान म्हणाल्या की, प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्याशी माझं बोलणं झालं. माझ्या तक्रारीवर तोडगा काढला जाईल असं आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर नूरी खान यांनी राजीनामा परत घेतला. ९ डिसेंबरला कमलनाथ यांनी मला भोपाळला बोलावलं असून पुढील रणनीतीबाबत निर्णय घेणार आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसMuslimमुस्लीम