शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

युतीचा निष्ठावंतांवर, तर स्वाभिमानचा नाराजांवर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 05:11 IST

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निष्ठावंत विरुद्ध नाराज अशाच पद्धतीने रंगू लागली आहे.

- मनोज मुळ्येरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निष्ठावंत विरुद्ध नाराज अशाच पद्धतीने रंगू लागली आहे. विकासाच्या मुद्द्यांपेक्षा नाराजी आणि फोडाफोडी याचीच चर्चा अधिक जोमाने सुरू आहे. शिवसेना आणि भाजप यांचे मनोमिलन झाले असले तरी ते तळागाळापर्यंत झिरपलेले नाही आणि राष्ट्रवादीसोबत जुळवून घेत प्रचार करण्याची हातोटी अजून काँग्रेसला जमलेली नाही. त्यामुळे ही निवडणूक निष्ठांवत विरुद्ध नाराज अशाच वळणावर थांबली आहे.शिवसेनेचे कार्यकर्ते आणि मतदार हे प्रत्येक निवडणुकीत ठाम असल्याचे चित्र आजवर अनेकदा दिसले आहे. पण भाजपमध्ये शिवसेनेबद्दल असलेली नाराजी उघडपणे जाहीर झाली आहे. ही नाराजी मिटवून मनोमिलन करण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांकडून केले गेले आणि त्याचा बऱ्याच अंशी परिणाम दिसला. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेना उमेदवार राऊत यांच्या प्रचारात सहभागी झाले. मात्र हे मनोमिलन १00 टक्के नाही. पाच वर्षांत आपल्याला काहीच मिळाले नाही, हा सल भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात भाजपमधील नाराजी टिकून आहे.जी स्थिती युतीमध्ये आहे, तीच स्थिती आघाडीमध्ये आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात या आघाडीत एकवाक्यता नाही. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्र प्रचार करताना दिसत नाहीत. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला केलेल्या मदतीची परतफेड आता लोकसभा निवडणुकीत होणार का? शरद पवार-नारायण राणे यांच्या मध्यंतरीच्या भेटीचा लाभ नीलेश राणे यांना होणार का? असे काही प्रश्न अनुत्तरित आहेत.युतीमधील नाराजी आणि आघाडीतील बिघाडी यावर राणेंच्या महाराष्टÑ स्वाभिमान पक्षाची मदार आहे. सिंधुदुर्गात स्वत:ची ताकद असलेल्या स्वाभिमानला रत्नागिरीत अधिक परिश्रम घ्यावे लागत आहेत.या लढतीत काँग्रेस मात्र अजूनही आक्रमकपणे पुढे आलेली नाही. काँग्रेसच्या पातळीवर मोठ्या प्रमाणात शांतताच आहे. आधीच पक्षाची झालेली असाहाय्य स्थिती आणि त्यात राष्ट्रवादीचा संभ्रम यामुळे मुख्य लढतीत काँग्रेस आपला सहभाग टिकवणार कसा, हा प्रश्नच आहे.>गत निवडणुुकीत दीड लाखाच्या फरकाने विजय मिळाला असला तरी आम्ही गाफील नाही. जिल्हा परिषद गटनिहाय प्रचार आम्ही नेटाने सुरू ठेवला आहे. शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकदिलाने काम करीत आहेत. हे निष्ठावंत कार्यकर्तेच युतीची प्रतिष्ठा कायम ठेवतील, याचा मला विश्वास आहे.- विनायक राऊत, शिवसेनापाच वर्षांत रत्नागिरी-सिंधुदुर्गात कोणतीही कामे झाली नाहीत. एकतर आराखड्यांइतके पैसेच आले नाहीत आणि आले ती रक्कमही खर्ची पडली नाही. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांचा विकास ठप्प झाला आहे. सामान्य माणसाच्या हाताला काम देण्याचे ध्येय घेऊन मी रिंगणात उतरलो आहे.- नीलेश राणे, स्वाभिमान>कळीचे मुद्देभाजपची शिवसेनेबद्दलची नाराजी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभ्रमावस्था हा सर्वांत कळीचा मुद्दादोन जिल्ह्यांच्या विकासावर बोलण्याऐवजी शिवसेना-स्वाभिमानकडून वैयक्तिक आरोपांवर अधिक भर

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Vinayak Rautविनायक राऊत Nilesh Raneनिलेश राणे ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग