शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

युतीचा निष्ठावंतांवर, तर स्वाभिमानचा नाराजांवर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 05:11 IST

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निष्ठावंत विरुद्ध नाराज अशाच पद्धतीने रंगू लागली आहे.

- मनोज मुळ्येरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निष्ठावंत विरुद्ध नाराज अशाच पद्धतीने रंगू लागली आहे. विकासाच्या मुद्द्यांपेक्षा नाराजी आणि फोडाफोडी याचीच चर्चा अधिक जोमाने सुरू आहे. शिवसेना आणि भाजप यांचे मनोमिलन झाले असले तरी ते तळागाळापर्यंत झिरपलेले नाही आणि राष्ट्रवादीसोबत जुळवून घेत प्रचार करण्याची हातोटी अजून काँग्रेसला जमलेली नाही. त्यामुळे ही निवडणूक निष्ठांवत विरुद्ध नाराज अशाच वळणावर थांबली आहे.शिवसेनेचे कार्यकर्ते आणि मतदार हे प्रत्येक निवडणुकीत ठाम असल्याचे चित्र आजवर अनेकदा दिसले आहे. पण भाजपमध्ये शिवसेनेबद्दल असलेली नाराजी उघडपणे जाहीर झाली आहे. ही नाराजी मिटवून मनोमिलन करण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांकडून केले गेले आणि त्याचा बऱ्याच अंशी परिणाम दिसला. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेना उमेदवार राऊत यांच्या प्रचारात सहभागी झाले. मात्र हे मनोमिलन १00 टक्के नाही. पाच वर्षांत आपल्याला काहीच मिळाले नाही, हा सल भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात भाजपमधील नाराजी टिकून आहे.जी स्थिती युतीमध्ये आहे, तीच स्थिती आघाडीमध्ये आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात या आघाडीत एकवाक्यता नाही. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्र प्रचार करताना दिसत नाहीत. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला केलेल्या मदतीची परतफेड आता लोकसभा निवडणुकीत होणार का? शरद पवार-नारायण राणे यांच्या मध्यंतरीच्या भेटीचा लाभ नीलेश राणे यांना होणार का? असे काही प्रश्न अनुत्तरित आहेत.युतीमधील नाराजी आणि आघाडीतील बिघाडी यावर राणेंच्या महाराष्टÑ स्वाभिमान पक्षाची मदार आहे. सिंधुदुर्गात स्वत:ची ताकद असलेल्या स्वाभिमानला रत्नागिरीत अधिक परिश्रम घ्यावे लागत आहेत.या लढतीत काँग्रेस मात्र अजूनही आक्रमकपणे पुढे आलेली नाही. काँग्रेसच्या पातळीवर मोठ्या प्रमाणात शांतताच आहे. आधीच पक्षाची झालेली असाहाय्य स्थिती आणि त्यात राष्ट्रवादीचा संभ्रम यामुळे मुख्य लढतीत काँग्रेस आपला सहभाग टिकवणार कसा, हा प्रश्नच आहे.>गत निवडणुुकीत दीड लाखाच्या फरकाने विजय मिळाला असला तरी आम्ही गाफील नाही. जिल्हा परिषद गटनिहाय प्रचार आम्ही नेटाने सुरू ठेवला आहे. शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकदिलाने काम करीत आहेत. हे निष्ठावंत कार्यकर्तेच युतीची प्रतिष्ठा कायम ठेवतील, याचा मला विश्वास आहे.- विनायक राऊत, शिवसेनापाच वर्षांत रत्नागिरी-सिंधुदुर्गात कोणतीही कामे झाली नाहीत. एकतर आराखड्यांइतके पैसेच आले नाहीत आणि आले ती रक्कमही खर्ची पडली नाही. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांचा विकास ठप्प झाला आहे. सामान्य माणसाच्या हाताला काम देण्याचे ध्येय घेऊन मी रिंगणात उतरलो आहे.- नीलेश राणे, स्वाभिमान>कळीचे मुद्देभाजपची शिवसेनेबद्दलची नाराजी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभ्रमावस्था हा सर्वांत कळीचा मुद्दादोन जिल्ह्यांच्या विकासावर बोलण्याऐवजी शिवसेना-स्वाभिमानकडून वैयक्तिक आरोपांवर अधिक भर

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Vinayak Rautविनायक राऊत Nilesh Raneनिलेश राणे ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग