शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

“प्रश्न खूप पण निर्णयांचा अभाव”; राज ठाकरेंनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट

By प्रविण मरगळे | Updated: October 29, 2020 11:12 IST

Raj Thackeray meet Governor Bhagat Singh Koshyari News: प्रश्न खूप आहेत, पण त्याबाबत काही तरी निर्णय घेणं गरजेचं आहे, एक दोन दिवसात या विषयावर निर्णय घ्यावा, पण सरकारचे आणि राज्यपालांचे एकूण सगळं बघता, तो निर्णय होईल का याबाबत साशंकता आहे.

ठळक मुद्देवीजबिल कमी करू शकतो असं कंपन्यांचे म्हणणं आहे पण राज्य सरकारकडून यावर निर्णय होत नाहीकोणतीही गोष्ट सांगितली तर त्यावर काम सुरु आहे असं उत्तर मिळतं पण निर्णय होत नाहीलॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले, वीजबिल भरमसाठ येत आहेत, लोक बिल कुठून भरणार?

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली, या भेटीत वाढील वीज बिल आणि दूध दरवाढ या दोन मुद्द्यावर प्रामुख्याने राज ठाकरेंनी राज्यपालांशी चर्चा केली. वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने जनतेला दिलासा द्यावा, याबाबत गरज पडल्यास मुख्यमंत्री, शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली, ट्रेन कधी सुरु होणार, रेस्टॉरंट उघडली आहेत, मंदिरं सुरु नाहीत, धरसोडपणा सोडून कधी काय होणार आहे ते सांगावं, लोकांना जिथे २ हजार बिल येत होतं तिथे १० हजार बिले येतंय, लोकांना वीजबिलाचा मोठा फटका बसतोय, राज्य सरकारला या विषयाशी कल्पना आहे. लवकरात लवकर या समस्येवर तोडगा निघावा, याबाबत लवकरच शरद पवार यांच्याशी बोलणार आहे, गरज पडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही भेटणार आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच प्रश्न खूप आहेत, पण त्याबाबत काही तरी निर्णय घेणं गरजेचं आहे, एक दोन दिवसात या विषयावर निर्णय घ्यावा, पण सरकारचे आणि राज्यपालांचे एकूण सगळं बघता, तो निर्णय होईल का याबाबत साशंकता आहे. वीजबिलाचा विषय मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलन करतायेत. वीजबिल कमी करू शकतो असं कंपन्यांचे म्हणणं आहे पण राज्य सरकारकडून यावर निर्णय होत नाही. राज्य सरकारने तात्काळ वीजबिलासंदर्भात निर्णय घ्यायला हवा. कोणतीही गोष्ट सांगितली तर त्यावर काम सुरु आहे असं उत्तर मिळतं पण निर्णय होत नाही, लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले, वीजबिल भरमसाठ येत आहेत, लोक बिल कुठून भरणार? बिल नाही भरलं तर वीज कापणार त्यामुळे सरकारने यावर लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

 

दरम्यान, रेल्वे सुरु होत नाही, ११ वीचे प्रवेश रखडले, रस्त्यावर सगळीकडे वाहतूक कोंडी दिसतेय, लोकल सुरु नाही, हॉटेल सुरु झाले मंदिरे सुरु झाली नाही, सरकारने या सर्व गोष्टींचा एकदा खुलासा करणं गरजेचे आहे. प्रश्नांची कमतरता नाही पण निर्णयाची कमतरता आहे, कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, कधी काय सुरु होणार हे सरकारने एकदा सांगावे अशा शब्दात राज ठाकरेंनी राज्य सरकारला फटकारलं आहे.

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दूध दरात वाढ करा

आज दूध संकलन करणाऱ्या मोठ्या संस्था शेतकऱ्याला एका लिटरमागे १७ ते १८ रुपये देतात पण स्वत: मात्र भरघोस नफा कमवतात. कधी सुका दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ यामुळे आधीच शेतकरी गांजलेला असतो, मात्र वाढत्या महागाईमुळे गुरांची देखभालदेखील खूप महाग झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला एका लिटरमागे किमान २७ ते २८ रुपये मिळायला हवे आणि यासाठी राज्य सरकारने लक्ष घालावे

वाढीव वीजबिलांनी सर्वसामान्यांना शॉक

लॉकडाऊनदरम्यान ग्राहकांना पाठवलेली वाढीव वीजबिलं, आधीच उदरनिर्वाहाची साधन बंद, त्यात मुंबईसारख्या ठिकाणी रेल्वे ७ महिने बंद असल्याने अनेकांनी रोजगार गमावला आहे. अनेक आस्थापने बंद आहेत, अशा परिस्थितीत वीज बिलांनी दिलेला शॉक जबरदस्त आहे. सरकारने वीज ग्राहकांना गेल्या महिन्यांच्या वीजबिलातील वाढीव रक्कम लोकांना परत करायला हवी. या दोन्ही विषयाबाबत राज्यपालांनी सरकारला सूचना द्याव्यात अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना निवेदनाद्वारे केली आहे.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार