शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

...तर हिटलरनेही आत्महत्या केली असती, ममतांनी साधला मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 16:50 IST

लोकशाहीत प्रत्येकाला एकमेकांवर चिखलफेक करण्याचा अधिकार असतो.

नवी दिल्ली- लोकशाहीत प्रत्येकाला एकमेकांवर चिखलफेक करण्याचा अधिकार असतो. प्रचार रॅली आणि सभेदरम्यान नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. त्यातच अनेक नेते एकमेकांवर टीका करताना पातळीही सोडतात. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मोदींवर निशाणा साधला आहे. त्या व्यक्तीचं राजकारण हे हिंसा आणि दंगलींनी रंगलेलं आहे. मोदी ज्या पद्धतीनं काम करतात, कदाचित ते पाहिल्यावर एडॉल्फ हिटलरनेही आत्महत्या केली असती, असंही ममता म्हणाल्या आहेत.भाजपासारख्या देशातील सर्वात मोठ्या पक्षाशी लढण्याचा काँग्रेस दावा करत आहे. परंतु काँग्रेस मनोमन पराभूत झालेली आहे. मोदींचा सामना करण्याचा काँग्रेस नेत्यांमध्ये दम नाही. मोदी हे समाज सत्तावादीविरोधी असल्याचंही ममता म्हणाल्या आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत कोणालाही आवडत नाही. त्यांच्या भीतीपायीच भाजपामधला कोणताही नेता त्यांच्याविरोधात बोलत नाही. काँग्रेस पक्ष कमकुवत असल्यानंच भाजपा वाढत चालला आहे. राहुल गांधींना सरकार बनवण्यासाठी इतर पक्षांचा पाठिंबा लागणार आहे. त्यामुळे एकदा का मोदी सत्तेतून बाहेर गेले, तर नव्या भारताचं निर्माण करता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्ता व राजकारणातून हद्दपार करा तसेच त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावायला हवी, असे उद्गार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सोमवारी काढले होते.येथील प्रचारसभेत त्या म्हणाल्या होत्या, मोदी यांनी आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीतील साडेचार वर्षे विदेश दौरे करण्यातच घालविले. त्यांना देशातील शेतकरी, मध्यमवर्गाकडे लक्ष देण्यास अजिबात वेळ नव्हता. निवडणुका तोंडावर आल्यानंतर मोदी आता प्रत्येकाला धमकावत आहेत आणि सर्रास खोटा प्रचार करत आहेत. धडधडीत खोटे बोलण्याच्या स्पर्धेत मोदी नक्कीच प्रथम क्रमांक पटकावतील. त्या पुढे म्हणाल्या, मोदी यांनी खोटे बोलू नये म्हणून आता जनतेनेच त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावायला हवी. देशाच्या भल्यासाठी त्यांना केवळ पंतप्रधानपदावरूनच नव्हेतर, राजकारणातूनही हद्दपार करायला हवे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी