शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

विद्यमान पंतप्रधानांना शिव्या देणारे राजीव गांधींबद्दल बोलताच संतापतात- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 11:02 IST

राजीव गांधींबद्दलच्या विधानावर पंतप्रधान मोदी ठाम

नवी दिल्ली: माजी पंतप्रधानराजीव गांधींबद्दलच्या विधानावरुन काँग्रेसनंपंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. यावर भाष्य करताना आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. राजीव गांधींबद्दल मी केवळ तथ्य सांगितलं. त्यावरुन इतकं आकांडतांडव कशासाठी, असा सवाल मोदींनी काँग्रेसला विचारला. ते 'नवभारत टाईम्स'शी बोलत होते. उत्तर प्रदेशात शनिवारी (4 मे) एका जनसभेला संबोधित करताना मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली होती. त्यावेळी मोदींनी राजीव गांधींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्यांनी राजीव गांधींना भ्रष्टाचारी नंबर वन असं म्हटलं होतं. याबद्दल मोदींना मुलाखतीत प्रश्न विचारला. त्यावर मी केवळ तथ्य सांगितलं, असं उत्तर मोदींनी दिलं. 'मी केवळ माहिती दिली. मात्र त्यावरुन संपूर्ण काँग्रेस पक्षाला इतका राग का आला, ते मला समजत नाही. जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष एका विद्यमान पंतप्रधानाला शिव्या देतात, त्याच्या कुटुंबाची, गरिबीची टिंगल करतात, तेव्हा हाच काँग्रेस पक्ष टाळ्या वाजवत असतो,' अशा शब्दांमध्ये मोदींनी अप्रत्यक्षपणे 'चौकीदार चोर है'वर भाष्य केलं. काँग्रेस अध्यक्ष विद्यमान पंतप्रधानावर टीका करतात. मात्र त्यांच्या वडिलांबद्दल काही तथ्य सांगितल्यास त्यांचा संपूर्ण पक्ष संतापतो, असं मोदी म्हणाले. 'विशेष म्हणजे काँग्रेस पक्षातल्या कोणीही राजीव गांधी भ्रष्ट नव्हते किंवा मी चुकीचं तथ्य सांगितलं असं म्हटलेलं नाही. काँग्रेसनं दिल्लीत राजीव गांधींच्या नावावर निवडणूक लढवावी, असं आव्हान मी आधीही काँग्रेसला दिलं होतं आणि आता त्याचा पुनरुच्चार करतो,' अशा शब्दांमध्ये मोदी काँग्रेसवर बरसले. उत्तर प्रदेशातल्या प्रतापगढमध्ये शनिवारी झालेल्या रॅलीत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना लक्ष्य करताना त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधींवरदेखील टीका केली. 'तुमच्या (राहुल गांधींच्या) वडिलांना त्यांच्या राजदरबारातील लोकांनी मोठा गाजावाजा करत मिस्टर क्लीन म्हटलं होतं. मात्र हळूहळू भ्रष्टाचारी नंबर वनच्या रुपात त्यांचं आयुष्य संपलं. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुकीला क्षमा करतो. मात्र फसवणूक करणाऱ्याला कधीही माफ करत नाही,' अशा शब्दांमध्ये मोदींनी राजीव गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली होती. मोदींच्या या टीकेला राहुल यांनी उत्तर दिलं होतं. 'मोदीजी, लढाई संपली आहे. तुमची कर्म तुमची वाट पाहत आहेत. माझ्या वडिलांवर आरोप करुन तुम्ही वाचू शकणार नाही,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीprime ministerपंतप्रधानRajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेस